शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही, कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच होणार- मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 17:04 IST

राज ठाकरे, फडणवीस, महेश शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार

सातारा : मराठा समाजाच्या लेकरांपेक्षा माझी तब्येत महत्त्वाची नाही. पुढील सर्व नियोजित रॅली, सभा ठरल्यापुसार पार पडतील. जिथे रॅली असेल तिथे मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. दरम्यान, त्यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नितेश राणे तसेच आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.सातारा येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून प्रकृती स्थीर असल्याची माहिती देत पुढील नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली.

नितेश राणे यांनी आधुनिक मोहम्मद जीना असल्याचे तसेच दाढीवर आक्षेप घेतला असल्याचे विचारताच जरांगे-पाटील म्हणाले, त्यांनी सर्वच दाढी राखणाऱ्यांवर आक्षेप घेतला असेल. दाढी राखणं हे मर्दाचे लक्षण आहे. त्यांचा सन्मान करतो, परंतु, सन्मान शब्दाचा अर्थ त्यांना कळत नाही. ते बोलतात, पण शब्द फडणवीस यांचे आहेत. फडणवीस हे मराठ्यांच्या अंगावर मराठ्यांना सोडत आहेत.

जरांगे यांच्या आडून शरद पवार राजकारण खेळत असून दंगलीची शक्यता राज ठाकरे यांनी वर्तवली असल्याबाबत जरांगे-पाटील म्हणाले, त्यांनी वर्तवली म्हणून थोडीच दंगल होणार आहे ? गाड्या-फोडणाऱ्यांच्या विचारांनी राज्य चालत नाही. कोठेही दंगली होणार नाहीत. राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नसेल परंतु, गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. एअर कंडिशनमध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत कळणार नाही. त्यांनी मराठा युवकांनाच विचारावं की आरक्षणाची गरज आहे की नाही. प्रत्येकवेळी तुमचे विचार जनतेवर लादू नका.

महेश शिदे यांची टीव्ही त्यावेळी जळली असेलबारामतीकरांचे सरकार होते, तेव्हापासून तीव वर्षे तुम्ही झोपेत होता अशी टिका आमदार महेश शिंदे यांनी केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता जरांगे-पाटील म्हणाले, त्यावेळी महेश शिंदे यांची टीव्ही जळली असेल, त्यामुळे कदाचित त्यांना माहित नसेल. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळीही सध्याच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त फजिती केली होती. त्यांना जातीपेक्षा पक्ष मोठा वाटतो. पण जेव्हा निवडणुकीत पडतील, तेव्हा जातीची किंमत कळेल. जितके मराठ्यांच्या मागे लागेल तितका त्रास होईल, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.

जरांगे-पाटील म्हणाले...

- पहिल्या दिवसांपासून ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. मराठा पूर्वीपासून ओबीसीत आहे.- अजित पवार वर्ष झाले तरी आरक्षणावर तोडगा काढताहेत. तुमच्या हातातच सत्ता.

- शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे वंशज, त्यांच्याविरोधात उमेदवार नसेल.- ११३ आमदार पाडणार पण नेमके कोण हे आताच सांगणार नाही.

- प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत नेहमीच आदर आहे. त्यांनी जनभावना लक्षात घ्यावी.- सगेसोयऱ्यांना आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्तीची अधिसुचना, तातडीने अंमलबजावणी व्हावी.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलsatara-pcसाताराMaratha Reservationमराठा आरक्षण