शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हापूस हंगाम उरला आठवडाभरच....

By admin | Updated: May 25, 2014 00:33 IST

दर कमी : एकाच दिवशी पावणेतीन लाख पेट्यांनी कोसळला हापूसचा दर

 प्रकाश वराडकर, रत्नागिरी : अवघ्या काही दिवसात कोकण, मुंबईसह राज्यभरात स्वस्ताईचा झिम्मा खेळणारा हापूस यंदाच्या हंगामाचा या आठवड्यातच निरोप घेणार आहे. येत्या ५ ते ६ दिवसांत हापूस हंगाम संपणार आहे. यंदा मुंबईत लोकसभा निवडणूक २४ एप्रिलला झाल्यानंतरच्या सुटीमुळे २८ एप्रिलला साचलेला २ लाख ६७ हजार पेट्या हापूस एकदम वाशी बाजारात दाखल झाला. एवढा हापूस विकण्याची वाशी मार्केटची क्षमता नसल्यानेच हापूसचा भाव कोसळला, असे मत प्रसिध्द आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. गेल्या चार वर्षांपासून कोकणातील हापूसवर या ना त्या कारणाने संकटे येत आहेत. त्याचा परिणाम हापूसचे दर कोसळण्यात होत आहे. २०११ साली वाहतूक व्यावसायिकांचा संप, २०१२ साली माथाडी कामगारांचा संप, २०१३ साली एलबीटीचा प्रश्न व यंदा हापूस पीक कमी असूनही अचानकपणे वाढलेल्या तापमानाने हापूस एकाचवेळी तयार झाला व भाव कोसळले. रत्नागिरी जिल्ह्यात नाखरे येथे १६, १७ एप्रिलला चक्रीवात निर्माण होऊन झालेले नुकसान व त्यानंतर पुन्हा उत्तर रत्नागिरीत वादळाचा तडाखा बसून झालेले नुकसान यामुळे धास्तावलेल्या आंबा बागायतदारांमध्ये हापूसची लवकर काढणी करून तो बाजारपेठेत पाठविण्याची स्पर्धा लागली. कोकणात यंदा मूळातच हापूस पीक ३० टक्केपर्यंत म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत कमी होते. २० एप्रिल २०१४ ते १० मे २०१४ या २० दिवसांच्या काळात त्यातील २० टक्के हापूस बाजारात आला. मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने हापूसचे दर घसरले व हापूस बागायतदारांचे नुकसान झाले. आता काही टक्के उरलेला हापूस बाजारात जात असून हजार ते १२०० रुपये पेटीचा दर आहे. येत्या आठवड्यात हापूस हंगाम खर्‍या अर्थाने संपेल. त्यानंतर किरकोळ स्वरुपात हापूस बाजारात असू शकेल, असे डॉ. भिडे म्हणाले. पोलिसांकडून लूट... वाशी बाजारात हापूसचे दर कोसळल्यानंतर जिल्ह्यातील काही आंबा बागायतदार व व्यापार्‍यांनी मुंबईत थेट हापूस नेऊन विकण्याचे तंत्र अवलंबिले. मात्र वाशी पूल नाका येथे मुंबईला जाणार्‍या हापूस वाहतूकदारांकडून तब्बल हजार ते दीड हजार रुपये पोलिसांकडून उकळण्यात येत असल्याच्या वाहतूकदारांच्या तक्रारी आहेत. पुण्याला थेट जाणार्‍या हापूस वाहनांना कात्रज येथे अडवून पैसे घेतले जात होते. मात्र डॉ. भिडे यांनी सचिवालयापर्यंत हा प्रश्न नेल्याने ही लूट थांबली.