शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: May 23, 2014 22:53 IST

वर्धापनदिन : ‘राजकारण सातारी’ अंकाचे प्रकाशन

  सातारा : ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचा आठवा वर्धापन दिन आज, शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यास सर्वच स्तरातील मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहून ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. वर्धापनदिनानिमित्त ‘राजकारण सातारी’ या विशेषांकाचे प्रकाशन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त हॉटेल राधिका पॅलेसच्या हिरवळीवर स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यास राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, उद्योग, व्यापार आणि अन्य सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मेळाव्यास हजेरी लावली होती. यावेळी गप्पांचे फडही चांगलेच रंगले होते. हा मेळावा रात्री उशिरापर्यंत रंगला होता. यावर्षी जिल्ह्यातील राजकीय प्रवाह, व्यक्ती, प्रभावी घटक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर परिणामकारक ठरलेल्या व्यक्ती आणि संघटना, सामाजिक चळवळी यांचा इतिहास, प्रभाव आणि परिणामकारकता दर्शविणारी ‘राजकारण सातारी’ ही संग्राह्य पुरवणी तयार करण्यात आली. तिचे औपचारिक प्रकाशन स्नेहमेळाव्याच्या प्रारंभी करण्यात आले. तत्पूर्वी अभिनव देशमुख यांच्यासह गौरीशंकर नॉलेज सिटीचे मदन जगताप, यशोदा शिक्षण संस्थेचे दशरथ सगरे, आम आदमी पक्षाचे राजेंद्र चोरगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, आवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे आणि जाहिरात विभागाचे सहायक व्यवस्थापक संतोष जाधव यावेळी उपस्थित होते. प्रारंभी ‘एबीसीडी डान्स स्टुडिओ’च्या कलावंतांनी नृत्यात्मक गणेश वंदना सादर केली. अमोल कदम, मारूफ नरवाडे, आकाश जाधव, वैभव कुंभार, अमित काळेल, अक्षय खांडेकर आणि विशाल निकम या कलावंतांनी यात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., कल्पनाराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून ‘लोकमत’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच ‘राजकारण सातारी’ अंकाबद्दल प्रशंसोद््गार काढले. खरेदीसाठी सातारकर मोठ्या शहरांना पसंती देत असल्यामुळे सातारच्या बाजारपेठेतील निरुत्साही वातावरण बदलण्यासाठी यावर्षी ‘आमची खरेदी सातार्‍यात’ ही मोहीम ‘लोकमत’ने राबविली होती. त्यामुळे दसरा-दिवाळीला बाजारपेठेतील हालचाल अनेक पटींनी वाढली. या मोहिमेबद्दलही उपस्थितांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. (प्रतिनिधी)