शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

करणीच्या बाहुल्यांना अंनिस घालणार हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:28 IST

सातारा : हिरव्यागार वनराजाला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाºया प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकलेआहे. शनिवारी (दि. ३० डिसेंबर) वाई तालुक्यातील मांढरगडा वर झाडांना खिळे मारून ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकल्या जाणार आहेत.मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा दि. १, २ व ३ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. इथे पशुबळी ...

सातारा : हिरव्यागार वनराजाला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाºया प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकलेआहे. शनिवारी (दि. ३० डिसेंबर) वाई तालुक्यातील मांढरगडावर झाडांना खिळे मारून ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकल्या जाणार आहेत.मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा दि. १, २ व ३ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. इथे पशुबळी अथवा लिंबू, बिबे ठेवणे, झाडाला खिळे मारणे, वाद्य वाजविणे हा या कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील मांढरदेवगडावर असे प्रकार होताना सर्रासपणे दिसतात.मांढरदेवी मंदिराच्या मागील बाजूस बरीचशी झाडे आहेत. त्या झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, लिंबू, चिठ्ठ्या लावून खिळे ठोकले जातात. अशा अघोरी प्रथा करून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. यामुळे जास्त प्रमाणात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे. तरी या प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ अंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याला दक्षता अधिकारी नेमण्यात आला आहे. असे अघोरी प्रकार होत असतील तरत्याला प्रतिबंध करण्याचाअधिकार पोलिसांना आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेता येऊ शकतो.या पार्श्वभूमीवर अंनिसतर्फे वाई पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले असून, ३० डिसेंबर रोजी करणीच्या नावाने झाडांना ठोकलेल्या बाहुल्या काढण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.मांढरदेव परिसरात नारळ फोडण्यास आणि तेल वाहण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी आधीच स्पष्ट केले आहे. आता तरीही असा अघोरी प्रकार होत असेल तर पोलिसांनाच संबंधितांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना आखावी अशी मागणी होत आहे.दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनासाठी अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट यांची ३०० लोकांची प्रशिक्षित टीम येथे २४ तास असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्व विभागांचा या यात्रेदरम्यान योग्य तो समन्वय राहावा, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने एकूण सोळा वॉकीटॉकी संचही दिले जाणार आहेत. देवस्थान विश्वस्थांमार्फत नियंत्रण कक्ष स्थापने, पशुहत्या बंदीबाबत सर्वत्र फलक लावण्यात येणार असून, यात्रेनिमित्त मांढरगडावर साफसफाईसाठी कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.हिरवी झाडे घायाळहिरव्या झाडांना खिळे ठोकून करणीच्या काळ्या बाहुल्या लावल्या जातात. हा प्रकार अतिशय अघोरी आहे. तसेच तो भय उत्पन्न करणाराही आहे. हिरवीगार वनराई घायाळ होत आहे.