शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांमध्ये दीडशेजण ‘लेटकमर्स’...

By admin | Updated: January 9, 2017 00:33 IST

कऱ्हाड नगरपालिका : मुख्याधिकाऱ्यांकडून कारवाई; सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक गैरहजेरीचे प्रमाण

कऱ्हाड : वेळेचे नियमीत पालन न केल्याप्रकरणी तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कऱ्हाड पालिकेतील ३६५ जणांपैकी १६७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सहा महिन्यांत जूनपासून नोव्हेंबरपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांनी ‘बिन पगारी, फुल्ल अधिकारी’ म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे, गुलाबपुष्प देत सत्कार करूनही कर्मचाऱ्यांमध्ये काहीच फरक पडलेला दिसून येत नाही. कऱ्हाड पालिकेत यापूर्वी अनेक अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी पालिकेतील इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळेबाबत व कामाबाबत शिस्तही लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वर्षभरापूर्वी रूजू झालेले मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या कामाबाबत शिस्त व नियमांची चांगली सवय लावण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र कर्मचाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसून येत आहे. कारण अनेकवेळा कामावर उशिरा येणे, कामात कसूर करणे, नागरिकांनी मागितलेली माहिती वेळेवर न देणे अशा प्रकारांमुळे अनेक कर्मचारी चौकशीच्या अडचणीत सापडलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे. सहा महिन्यांत १६७ जणांच्या पगारात कपात करण्यात आली आहे.कऱ्हाड पालिकेत सुमारे पंचवीस विभागात एकूण साडेतीनशे कर्मचारी काम करतात. यामध्ये नगर अभियंता, जलअभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य अभियंता, लेखापाल, अन्ननिरीक्षक, आरोग्य अधिकारी, करवसुली, सहायक खरेदी पर्यवेक्षक, समाजकल्याण अधिकारी, ग्रंथपाल, आस्थापना अशा विभागांचा समावेश आहे. पालिकेत उशिरा येणाऱ्यांना वेळेबाबत भान राहावे तसेच त्यांना योग्य शासन मिळावे म्हणून कार्यालयीन वेळेत उशिरा येणाऱ्यांना गुलाबपुष्प देत त्यांच्यात परिवर्तन घडविण्याचा अनोखा उपक्रमही राबविला आहे. त्याचा काही प्रमाणात कर्मचाऱ्यावर परिणामही जाणवलेला दिसून आला. मात्र, ‘ये रे माझ्या मागल्या’ याप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून पुन्हा दांडी मारण्याचे प्रकार केले जाऊ लागले. त्यांच्यावर योग्य कारवाईही करण्यात आली. वास्तविक, शासकीय कामाच्यावेळी उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याला दंड करणे तसेच शिक्षा करणे याबाबत कायद्यातही तरतूद आहे. ती म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ नुसार जो शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी विनापरवानगी उशिरा आल्यास तसेच गैरहजर राहिल्यास त्याचे एक दिवसाचे वेतन कपात करणे होय. तसेच सलग दोन दिवस उशिरा आल्यास त्यांना कामाच्या दर्जाबाबत पत्रही दिले जाते. त्याचा वापरही कऱ्हाड पालिकेत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे. सध्या मात्र, वेळेबाबत चालढकल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पालिकेत वेळेपूर्वी उपस्थिती लावली जात आहे. त्यांच्यात काहीशा प्रमाणात बदलही घडला आहे. शाळेत बोलले जाणारे राष्ट्रगीत कर्मचारी आता पालिकेत आल्यावर म्हणू लागले आहेत. कऱ्हाड नगरपालिकेत उशिरा येणाऱ्या व नियमित काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तीची सवय लागावी म्हणून पालिकेतील सुमारे ३८८ कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रिक मशीन बसविण्याचा निर्णय मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी घेतला आहे. त्याला नुकतेच वर्ष झाले आहे. वर्षभरात कर्मचाऱ्यांना मशीनचा वापर करणे समजू लागले असून त्यांच्यात वेळेबाबत गांभीर्यही पाळले जात आहे. (प्रतिनिधी)