शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

मोळ परिसराला गारांनी झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:48 IST

पुसेगाव : दक्षिण कोकण ते विदर्भापर्यंत असलेल्या चक्रीय स्थितीमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे गुरुवारी दुपारी चारच्या ...

पुसेगाव : दक्षिण कोकण ते विदर्भापर्यंत असलेल्या चक्रीय स्थितीमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ गावात गारांचा सुमारे दोन तास पाऊस झाला. शेतीशिवार, अंगणात सर्वत्र गारांचा खच पडला होता. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

शेतात ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके उभी आहेत. काही ठिकाणी त्यांची काढणी सुरू आहे. कांदा पिकाची काटणी सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मोळ भागात विजेच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी हैराण झाला. रब्बी हंगाम हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. घातलेले भांडवलही काही शेतकऱ्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील पिकावर होत्या. मात्र गुरुवारी झालेल्या पावसाच्या पाण्याबरोबर त्या वाहून गेल्या. ज्वारी, गव्हासारखी पिके सध्या काढण्याच्या अवस्थेत आली आहेत. काहीजणांची पिके काढून ठेवली आहेत. कांदा पिकाला चांगला दर मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी आठ-दहा दिवस अगोदरच कांद्याच्या काढणीला सुरुवात केली आहे. गुरुवारच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले.

घरातील लोकांचा वर्षभराचा खाण्याचा, सालभराचा पसा-कुडताही पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून कमालीची चिंता व्यक्त होत आहे. दिवाळीपासून सुरू असलेल्या वीट व्यवसायालाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. वीट उत्पादनासाठी लागणारे बगॅस, राख, चुरी, कोळसा, माती यांच्या किमतीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. तसेच नांदेड, लातूर, बीड आदी ठिकाणांहून आणलेल्या वीट कामगारांना दिलेल्या मोठ्या रकमेच्या उचली यांमुळे आधीच वीट उत्पादक मालक अडचणीत आले होते.

त्यातच या अवकाळी पावसाचा फटका फडातील उभ्या विटांना बसला आहे. गारांच्या पावसाने या थापलेल्या विटांचा अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे मोठी भांडवल गुंतवणूक करून वीट उत्पादकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

चौकट :

तातडीने पंचनामे करावेत

मोळ भागात गुरुवारी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीट उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत, अशी मागणी मोळचे सरपंच वैभव आवळे यांनी केली आहे.

खटाव तालुक्यातील मोळ गावात गुरुवारी दुपारी चार वाजता तब्बल दोन तास गारांचा मोठा पाऊस झाला. शेतीशिवार तसेच अंगणांत गारांचा खच पडला होता. (छाया : केशव जाधव)