शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मोळ परिसराला गारांनी झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:48 IST

पुसेगाव : दक्षिण कोकण ते विदर्भापर्यंत असलेल्या चक्रीय स्थितीमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे गुरुवारी दुपारी चारच्या ...

पुसेगाव : दक्षिण कोकण ते विदर्भापर्यंत असलेल्या चक्रीय स्थितीमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ गावात गारांचा सुमारे दोन तास पाऊस झाला. शेतीशिवार, अंगणात सर्वत्र गारांचा खच पडला होता. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

शेतात ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके उभी आहेत. काही ठिकाणी त्यांची काढणी सुरू आहे. कांदा पिकाची काटणी सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मोळ भागात विजेच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी हैराण झाला. रब्बी हंगाम हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. घातलेले भांडवलही काही शेतकऱ्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील पिकावर होत्या. मात्र गुरुवारी झालेल्या पावसाच्या पाण्याबरोबर त्या वाहून गेल्या. ज्वारी, गव्हासारखी पिके सध्या काढण्याच्या अवस्थेत आली आहेत. काहीजणांची पिके काढून ठेवली आहेत. कांदा पिकाला चांगला दर मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी आठ-दहा दिवस अगोदरच कांद्याच्या काढणीला सुरुवात केली आहे. गुरुवारच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले.

घरातील लोकांचा वर्षभराचा खाण्याचा, सालभराचा पसा-कुडताही पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून कमालीची चिंता व्यक्त होत आहे. दिवाळीपासून सुरू असलेल्या वीट व्यवसायालाही या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. वीट उत्पादनासाठी लागणारे बगॅस, राख, चुरी, कोळसा, माती यांच्या किमतीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. तसेच नांदेड, लातूर, बीड आदी ठिकाणांहून आणलेल्या वीट कामगारांना दिलेल्या मोठ्या रकमेच्या उचली यांमुळे आधीच वीट उत्पादक मालक अडचणीत आले होते.

त्यातच या अवकाळी पावसाचा फटका फडातील उभ्या विटांना बसला आहे. गारांच्या पावसाने या थापलेल्या विटांचा अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे मोठी भांडवल गुंतवणूक करून वीट उत्पादकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

चौकट :

तातडीने पंचनामे करावेत

मोळ भागात गुरुवारी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीट उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत, अशी मागणी मोळचे सरपंच वैभव आवळे यांनी केली आहे.

खटाव तालुक्यातील मोळ गावात गुरुवारी दुपारी चार वाजता तब्बल दोन तास गारांचा मोठा पाऊस झाला. शेतीशिवार तसेच अंगणांत गारांचा खच पडला होता. (छाया : केशव जाधव)