शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

पालकमंत्र्यांचा रोख कोणावर?

By admin | Updated: January 13, 2015 00:09 IST

पालकमंत्र्यांनी घेतलेल्या कानपिचक्या नक्की कोणत्या अधिकाऱ्यांसाठी होत्या, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

सातारा : सातारचे नूतन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी साताऱ्यात पहिलीच बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून राजकारण केले जात असल्याचा जाहीर आरोप केला. या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या कानपिचक्या नक्की कोणत्या अधिकाऱ्यांसाठी होत्या, याचीच चर्चा सुरू झाली आहे.गेल्या १५ ते २० वर्षांपासून खुर्च्या अडवून बसलेल्या अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये, असे पालकमंत्र्यांनी थेट भाषेत सांगितले. ‘काँगे्रस व राष्ट्रवादीच्याच लोकप्रतिनिधींचे ऐकायचं, बाकी कुणाची कामे करायची नाहीत, हे आता चालणार नाही. जो जास्त काळ एकाच ठिकाणी असेल; पण तो प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. पण कुणी जाणीवपूर्वक राजकारण करत असेल तर त्यांच्या बदल्या निश्चित आहे,’ असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. ‘दादागिरी करणे, कामात अडथळे आणणे, आमदारांच्या दबावानुसार वागणे, असं करत राहाल तर बदली ठरलेलीच आहे,’ असंही पालकमंत्री म्हणाले. दरम्यान, पालकमंत्री पहिल्याच बैठकीत असं म्हणाल्याने अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली असणार, यात शंकाच उरलेली नाही. पण पालकमंत्री नेमके कुठल्या अधिकाऱ्यांबाबत बोलले याची उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. काही अधिकारी वर्गातच आपण किती वर्षे एकाच ठिकाणी आहे, याची मोजदाद सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे सर्व नव्याने दाखल झालेले अधिकारी आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त गुळाला चिटकून राहिलेल्या मुंग्यांसारखे अनेक अधिकारी आहेत. आता हे अधिकारी कोण हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. लोकाभिमुख आणि वेगवान प्रशासकीय कामासाठी पालकमंत्री आग्रही आहेत. ही कामे झाली नाहीत तर येत्या काही दिवसांतच पालकमंत्र्यांची गर्जना ‘भीष्म प्रतिज्ञा’ म्हणून समोर येईल, हे मात्र नक्की दिसत आहे. (प्रतिनिधी)