शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
4
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
5
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
6
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
7
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
8
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
9
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
10
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
11
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
12
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
13
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
14
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
15
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
16
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
17
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
18
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
19
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
20
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

पालकमंत्र्यांचा रोख कोणावर?

By admin | Updated: January 13, 2015 00:09 IST

पालकमंत्र्यांनी घेतलेल्या कानपिचक्या नक्की कोणत्या अधिकाऱ्यांसाठी होत्या, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

सातारा : सातारचे नूतन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी साताऱ्यात पहिलीच बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून राजकारण केले जात असल्याचा जाहीर आरोप केला. या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या कानपिचक्या नक्की कोणत्या अधिकाऱ्यांसाठी होत्या, याचीच चर्चा सुरू झाली आहे.गेल्या १५ ते २० वर्षांपासून खुर्च्या अडवून बसलेल्या अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये, असे पालकमंत्र्यांनी थेट भाषेत सांगितले. ‘काँगे्रस व राष्ट्रवादीच्याच लोकप्रतिनिधींचे ऐकायचं, बाकी कुणाची कामे करायची नाहीत, हे आता चालणार नाही. जो जास्त काळ एकाच ठिकाणी असेल; पण तो प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. पण कुणी जाणीवपूर्वक राजकारण करत असेल तर त्यांच्या बदल्या निश्चित आहे,’ असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. ‘दादागिरी करणे, कामात अडथळे आणणे, आमदारांच्या दबावानुसार वागणे, असं करत राहाल तर बदली ठरलेलीच आहे,’ असंही पालकमंत्री म्हणाले. दरम्यान, पालकमंत्री पहिल्याच बैठकीत असं म्हणाल्याने अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली असणार, यात शंकाच उरलेली नाही. पण पालकमंत्री नेमके कुठल्या अधिकाऱ्यांबाबत बोलले याची उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. काही अधिकारी वर्गातच आपण किती वर्षे एकाच ठिकाणी आहे, याची मोजदाद सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे सर्व नव्याने दाखल झालेले अधिकारी आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त गुळाला चिटकून राहिलेल्या मुंग्यांसारखे अनेक अधिकारी आहेत. आता हे अधिकारी कोण हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. लोकाभिमुख आणि वेगवान प्रशासकीय कामासाठी पालकमंत्री आग्रही आहेत. ही कामे झाली नाहीत तर येत्या काही दिवसांतच पालकमंत्र्यांची गर्जना ‘भीष्म प्रतिज्ञा’ म्हणून समोर येईल, हे मात्र नक्की दिसत आहे. (प्रतिनिधी)