शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

दादा, राजे, आबांनी लावली लोणंदची वाट!

By admin | Updated: April 6, 2016 00:21 IST

बाळासाहेब बागवान यांचा घणाघात : नगरपंचायत रद्द करण्याचा खटाटोप करणाऱ्या राष्ट्रवादीला धडा शिकवणार

लोणंद : ‘राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, रामराजे नाईक-निंबाळकर आणि मकरंद पाटील यांनी लोणंद शहराची वाट लावली,’ अशा शब्दांत काँग्रेसप्रणीत आघाडीचे नेते बाळासाहेब बागवान यांनी संताप व्यक्त केला. ‘नगरपंचायत रद्द करण्यासाठी ठराव करणाऱ्या अन फाईल अडविणाऱ्यांना धडा शिकविणार,’ असा चंग बांधला आहे.लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील वातावरण तापून उन्हाळा आणखी तीव्र जाणवत आहे. अशा वातावरणात ‘लोकमत टीम’ने पॅनेलप्रमुखांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना बोलते केले. ‘अजितदादा एवढे मोठे राजकारणी असूनही लहानात लहान सोसायटीच्या राजकारणातही लक्ष घालतात,’ असे नमूद करतानाच ही तारीफ अधिक टीका असल्याचे बागवान यांनी स्पष्ट केले. ‘चोवीस तास पाणीयोजनेसाठी आम्ही पाठपुरावा करीत होतो तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. पाण्याचे मीटर नागरिकांना स्वखर्चाने घ्यावे लागू नयेत म्हणून मलकापूरप्रमाणे अनुदान मिळविण्याचा प्रयत्न होता. अनुदान नगरविकास खात्याकडून मिळत असल्याने नगरपंचायत स्थापन होणे गरजेचे होते. आम्ही सर्व खात्यांचे अभिप्राय घेऊन फाईल सादर केली. ग्रामपंचायत निवडणुकीला मोजके दिवस शिल्लक असताना ही फाईल मुद्दाम अडवून ठेवण्यात आली. तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवस फोनवरून आणि एकदा प्रत्यक्ष भेटून संवाद साधला; मात्र फाईल दाबून ठेवण्यात आली आणि आम्ही गाफिल असताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आम्हाला वेळ कमी मिळाल्याने राष्ट्रवादीने निवडणूक जिंकली; पण साडेतीन वर्षे त्यांनी असा कारभार केला आहे की, जनताच त्यांना आता सत्तेवर येऊ देणार नाही,’ असे बागवान यांनी सांगितले.काँग्रेस आघाडीतील बहुसंख्य उमेदवार तिशीच्या आतले आहेत. पासष्ट वर्षांचे बाळासाहेब बागवान यांनी मात्र आजअखेर कधीच स्वत: ग्रामपंचायत लढविली नव्हती. १९९२ पूर्वी बापूसाहेब खरात आणि नानासाहेब भंडलकर यांनी केलेल्या समाजकारणाचा, राजकारणाचा वारसा ते सांगतात. या नेत्यांनी लोणंद कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्याचा लाभ घेऊन ग्रामपंचायतीला जकातवसुलीची परवानगी मिळवून दिली आणि उत्पन्नवाढ करून अनेक सुधारणा केल्या. ४५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची इमारत उभारली आणि आठ किलोमीटरवरून नीरेचे पाणी आणले. १९९७, २००२ आणि २००७ च्या निवडणुकीत बागवान यांच्या पॅनेलला पूर्ण बहुमत मिळाले. यंदा त्यांच्यासमोर राष्ट्रवादी, भाजपबरोबरच काही अपक्षांचेही आव्हान असेल.अहिल्याबाई होळकर यांचे महाराष्ट्रातील दुसरे स्मारक आणि अद्ययावत स्मशानभूमी आपल्या कार्यकाळात साकारल्याचा ते अभिमान बाळगतात. चोवीस तास पाणीयोजनेचा दुसरा टप्पा मंजूर असतानाच सत्ता गमवावी लागल्याचे शल्य त्यांना टोचते. तंत्रसमृद्ध ही योजना राष्ट्रवादीमुळे रखडल्याबद्दल संताप व्यक्त करतानाच निवडणुकीत क्रमांक एकचा शत्रू राष्ट्रवादीच असल्याचे मानतात. (प्रतिनिधी)‘त्यांना’ गटात घेतले नाही...‘नगरपंचायतीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून चारजण फुटले. आम्ही त्यांना आमच्या गटात घ्यावे अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्यात विश्वासार्हता उरलेली नाही. पदाचा गैरवापर करून त्यांनी प्रतिमा गमावली आहे. त्यांचा अर्धा वेळ पोलिस ठाण्यातच खर्च होतो. त्यामुळेच त्यांना पॅनेलमध्ये घेण्यास आम्ही नकार दिला,’ असे बागवान यांनी नमूद केले.जाणाऱ्यांना जाऊ दिले...जाणाऱ्यांना जाऊ दिले...निवडणुकीच्या तोंडावर काही सोबतींनी बाळासाहेब बागवान यांची साथ सोडली आहे. त्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘माझ्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराला थारा नव्हता. कोणत्याही गोष्टीसाठी कुणाला पैसे द्यावे लागत नव्हते. यातून काही जणांच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाल्यानेच त्यांनी साथ सोडली. आम्ही शांतपणे त्यांना जाऊ दिले.’ंराष्ट्रवादीवर आरोपांच्या फैरीआम्ही पंधरा वर्षांत लोणंदमध्ये जी विकास कामे केली, त्यांचा राष्ट्रवादीने साडेतीन वर्षांत मुडदा पाडलाग्रामपंचायत जिंकल्यावर राष्ट्रवादीने पहिला ठराव केला तो नगरपंचायत रद्द करण्याचापाणीयोजनेच्या दुसऱ्या टप्प्याची पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बसविलेली कोनशिला राष्ट्रवादीने जेसीबी लावून उखडून टाकलीपाणीयोजनेसाठी आमच्या कार्यकाळात राखून ठेवलेल्या एक कोटी रुपयांची राष्ट्रवादीने झगमगाटासाठी उधळपट्टी केली