शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; जिल्हा परिषदेसमोर निदर्शने अन् घोषणाबाजी 

By नितीन काळेल | Updated: February 26, 2024 16:45 IST

पाणीपुरवठा थांबणार अन् कचरा साठणार 

सातारा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे यासह विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे गावातील पाणीपुरवठा थांबणार असून कचराही साठणार आहे. तर बंदमधील कर्मचाऱ्यांनी मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून घोषणाबाजी केली.  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले.  यामध्ये राज्य अध्यक्ष राजन लिंगाडे, सातारा जिल्हाध्यक्ष प्रभाकर नेवसे, कार्याध्यक्ष रमेश भोसले, सचिव रनजित वरखडे, प्रसिद्धीप्रमुख जे. के. काळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. याबाबत जिल्हा परिषद ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.  त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील हजारो ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता कामगार, पाणीपुरवठा अन् वीजपुरवठा तसेच लिपिक पदावर अनेक कामगार काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. त्यावेळी आश्वासन देण्यात आले. परंतु त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे २६ ते २९ फेब्रुवारी यादरम्यान राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचारी यांच्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, निवृत्त वेतन अन् उपदान लागू करावे.  वेतनासाठी लाभलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी, आकृतीबंध सुधारणा कराव्यात. जिल्हा परिषद सेवेत एकूण रिक्तच्या दहा टक्के जागांवर आणि वर्ग तीन व चारच्या पदावर नियुक्ती करावी अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात. यासाठी आंदोलन करत आहोत.दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतच्या कामावर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांनी पाणी सोडणे बंद केले आहे. तसेच दिवाबत्ती आणि स्वच्छतेचे कामही थांबवण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीशी सामना करावा लागणार आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलन