शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सरकारचा फतवा म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार

By admin | Updated: September 5, 2015 23:33 IST

जयंत पाटील : दुष्काळी मदतीसाठी सरकारवर दबाव आणणार

सांगली : सरकारविरोधी टीका देशद्रोही ठरविण्याचा राज्य शासनाचा फतवा म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार आहे. अशाप्रकारचे फतवे काढून कोणाचे तोंड दाबता येते का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. सरकार किंवा सरकारशी संबंधित असलेले लोकप्रतिनिधी यांच्याविषयीची टीका आता देशद्रोह मानण्यात येईल, असे परिपत्रक गृहविभागाने काढले आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, अशाप्रकारचे फतवे काढून हुकूमशाहीचा कारभार दर्शविला जात आहे. या गोष्टी चुकीच्या आहेत. सरकार दुष्काळाच्या बाबतीतही गंभीर नाही. दुष्काळी परिस्थितीत जनतेला मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी म्हणून आम्ही आता या प्रश्नावर अधिक आक्रमक होणार आहोत. त्यासाठी, मोर्चे, निदर्शने, रास्ता-रोको असे सर्व प्रकारचे मार्ग अवलंबिले जातील. शासनस्तरावरही दबाव टाकण्यासाठी शक्य तेवढ्या गोष्टी केल्या जातील. दुष्काळी जनतेला मदत मिळेपर्यंत आम्ही झगडत राहू. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे नियोजन झाले आहे. सरकारला दुष्काळी मदत देण्यास भाग पाडू. (प्रतिनिधी)