शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय; लवकरच राज्याच्या हिताचा निर्णय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:16 IST

: ‘सीएम’ म्हणजे कॉमन मॅन, जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले

सातारा : ‘सीएम’ म्हणजे फक्त चीफ मिनिस्टर नव्हे, तर कॉमन मॅन. मी कॉमन मॅन व जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले. अडीच वर्षांत जेवढ्या योजना राबविल्या, तेवढ्या आजपर्यंत कोणीही राबविल्या नसतील. माझ्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते. जनतेने भरभरून दिले आहे. त्यामुळे जनतेला काय देतोय हे महत्त्वाचे आहे. माझा निर्णय बुधवारी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना कळविला असून, मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांच्या निर्णयाला पाठिंबा आहे. त्यामुळे किंतु-परंतु नसावा,’ असे प्रतिपादन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दरे (ता. महाबळेश्वर) येथे दोन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या शिंदे यांनी रविवारी ठाण्याकडे रवाना होण्याच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. शिंदे म्हणाले, ‘अमित शाह यांच्यासमवेत एक बैठक झाली आहे. आणखी एक बैठक महायुतीच्या तिन्ही नेत्यांची होणार आहे. त्यातून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो

निर्णय आम्ही घेऊ. माझी भूमिका गेल्या बुधवारी स्पष्ट केली आहे. पुन:पुन्हा ती भूमिका मांडण्याची आवश्यकता वाटत नाही. आमच्यात चांगला समन्वय आहे.’

शनिवारी शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. उपचारानंतर रविवारी तब्येतीत सुधारणा झाल्यावर ते सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी हॅलिकॉप्टरने ठाण्याकडे रवाना झाले.

‘चर्चेने प्रश्न सुटतील’ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला माझा पाठिंबा असेल. याशिवाय गृहमंत्री, विधान परिषद सभापतिपद कोणाकडे याच्याही चर्चा सुरू असून, चर्चेने सर्व प्रश्न सुटतील; परंतु पत्रकारांच्याच चर्चा जास्त असतात, अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी मारली.

हे सरकार जनतेचा आवाज

महायुती सरकार हे जनतेचा आवाज आहे. आमचा अजेंडा विकासाचा होता. आमचे सरकार गोरगरिबांचे सरकार आहे. मी गरिबीतून आलेलाे आहे. मला गरिबीची जाणीव आहे. ज्या योजना आम्ही राबविल्या त्यांचा सर्वसामान्यांच्या जीवनात काही ना काही फायदा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

‘तेव्हा ईव्हीएम कसे चांगले?’

शिंदे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिले आहे. चांगले सरकार द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. त्यामुळे विरोधक काय बोलतात, याकडे लक्ष देत नाही.

विरोधकांकडे विरोधी पक्षनेता होण्याइतकेही संख्याबळ नाही. त्यामुळे आता ईव्हीएमची चर्चा सुरू आहे. झारखंडमध्ये जिंकले, लोकसभेला जिंकले, लोकसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा सदस्य निवडून आला आहे. तेलंगणातही यश आले आहे. त्यावेळी ईव्हीएम कसे चांगले, असा सवाल शिंदे यांनी केला.

दरेगावाहून थेट ठाण्यातील घरी

ठाणे : एकनाथ शिंदे रविवारी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास दरे गावाहून ठाण्यात परतले. शिंदे यांचे ठाण्यातील रेमंड कंपनीच्या हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर शिंदेसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

आपल्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर केसरकर यांच्यासमवेतच शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील नितीन कंपनीजवळील ‘शुभदीप’ या खासगी निवासस्थानी रवाना झाले. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीकांत शिंदे हेही होते.

खासदार शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार का, की ते शिंदेसेनेच्या अन्य आमदारांकडे दिले जाणार, यांपैकी कोणत्याही प्रश्नावर शिंदे यांनी उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे उपमुख्यमंत्री काेण हाेणार, गृहमंत्रिपदाबाबत काेणता निर्णय काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडून घेतला जाणार हे सर्व अद्यापही गुलदस्त्यात आहे.

फडणवीसांचा शिंदेंना फोन

मुंबई : साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी असलेल्या एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी फोनवर इतर राजकीय चर्चा झाली की नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे