शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

गोंदवलेतील वाटांवरून, श्रींची सवारी पाटांवरून!

By admin | Updated: December 10, 2014 23:58 IST

रामनामाचा जयघोष : ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुकांची ग्रामप्रदक्षिणा

गोंदवले : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या १०१ व्या पुण्यतिथी महोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली असून, या निमित्ताने श्रींच्या पादुकांचा पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी रवाना झाला. पालखी वाहणाऱ्यांचे पाय जमिनीला टेकू द्यायचे नाहीत, हा नियम असल्याने पायाखाली पाट ठेवण्याची प्रथा गोंदवलेनगरीने आजून जपली आहे.गोंदवले येथील पालखीच्या ग्रामप्रदक्षिणेत पाटांची प्रथा कसोशीने पाळली जाते. पालखीला पुढे आणि मागे असे दोन पालखीधारक असतात. त्यांचे पाय जमिनीवर पडू दिले जात नाहीत. पूर्वीच्या काळी येथील रस्ते ओबडधोबड होते. रस्त्यावर दगड होते. त्यामुळे पालखी उचलणाऱ्यांचे पाय जमिनीवर पडू दिले जात नाहीत. त्याऐवजी त्यांच्या पायाखाली लाकडी पाट अंथरले जातात. पालखी जसजशी पुढे जाईल, तसतसे मागचे पाट उचलून पुढे आणले जातात. त्यासाठी पन्नास ते साठ युवकांचा गट कार्यरत असतो. पाट मागून पुढे आणण्यासाठी युवकांची साखळी तयार केली जाते. हा पालखी सोहळा सलग दहा दिवस चालणार असून, गावातल्या प्रत्येक मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. एकादशीला या सोहळ्याची सांगता होणार आहे. पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात कोठीपूजनाने झाली होती. मंगळवारी सकाळी समाधी परिसरात महाराजांच्या पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. आरतीनंतर भाविकांनी ‘श्रीराम जयराम जयजयराम’चा जयघोष मोठ्या उत्साहात केला. त्यानंतर या पादुका सजविलेल्या पालखीत विराजमान करण्यात आल्या. मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली. अग्रभागी बताशा अश्व आणि पताकाधारी भाविक तल्लीन होऊन रामनामाचा जयघोष करीत होते. पालखीमार्गावर महिलांनी सडा-रांगोळ्या घातल्या होत्या. जागोजागी पालखीचे औक्षण करण्यात आले. (प्रतिनिधी)पालखी उचलणाऱ्यांच्या पायाखाली ठेवले जाणारे पाट ग्रामस्थांनी स्वखुशीने दान केलेले आहेत. असे सुमारे पन्नास पाट ग्रामप्रदक्षिणेसाठी वापरले जातात. गेल्या चाळीस वर्षांपासून ही प्रथा सुरू असून, गेली तीस वर्षे या प्रथेचे नियोजन मी पाहतो. गावातील युवक दहा दिवस स्वयंप्रेरणेने पाट उचलण्याचे आणि अंथरण्याचे काम करतात. - सुरेश काटकर, सामाजिक कार्यकर्तेग्रामपंचायतीतर्फे स्वागतबाजार पटांगणावर श्रीराम मंदिरात पालखी आल्यावर आरती झाली. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. समाधी मंदिरात स्नेहश्री संगीत मंडळाच्या गायनाचा कार्यक्रम झाला. नीलिमा रणभोर, नलिनी आपटे यांची भक्तिगीते, रमेश रावतकर यांचे भक्तिसंगीत असा कार्यक्रम झाला. पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त समाधीचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी दहीवडीचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी नियोजन केले आहे.