शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

पाणी द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:48 PM

कुकुडवाड : माण-खटाव तालुक्यांतील कुकुडवाड, विखळे, कलेढोण, मायणी, पुकळेवाडी, विरळीसह भागाला कायम दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या परिस्थितीवर ...

कुकुडवाड : माण-खटाव तालुक्यांतील कुकुडवाड, विखळे, कलेढोण, मायणी, पुकळेवाडी, विरळीसह भागाला कायम दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी टेंभू जलसिंचन योजनेचे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, नाहीतर आगामी काळातील निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार, असा एल्गार कुकुडवाड येथील पाणी परिषदेत टेंभू जलसिंचन योजनेतून वंचित राहिलेल्या गावांतील ग्रामस्थांनी केला. तसेच शासनाला आमच्या हक्काचे पाणी द्यायला लोकचळवळीच्या माध्यमातून भाग पाडू, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.माण-खटाव तालुक्यांतील एकूण ३२ गावांतील ग्रामस्थ एकत्र येत दुष्काळावर मात करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून पाण्यासाठी लोकचळवळ उभी केली आहे. टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे. त्यातून या परिसरातील शेतकºयांच्या दुष्काळी परिस्थितीत ढासळलेल्या वार्षिक आर्थिक उत्पन्नाला व उत्पादनाला कुठं तरी सावरता येईल, यासाठी सर्वसामान्यांना हा लढा उभारण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना सावरण्यासाठी टेंभू जलसिंचन योजनेचे पाणी परिसरातील शेतकºयांच्या शिवारात पोहोचणे गरजेचे आहे. तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाणी न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा ठाम निर्धार कुकुडवाड, पुकळेवाडी, विरळी, कलेढोण, विखळे, पाचवडसह परिसरातील लोकांनी एकत्र येऊन पाणी परिषदेत केला आहे. आमच्या हक्काचे पाणी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पाण्यासाठीचा लढा व लोकचळवळ अशीच चालू ठेवण्याचा निर्धारही पाणी परिषदेत केला.कुकुडवाड परिसरात पाणी उशाला; पण कोरड घशाला, अशी स्थिती झाली आहे. टेंभू जलसिंचन योजनेचे पाणी सांगली भागातील शिवारात पोहोचले आहे. उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी कुकुडवाड गावच्या खालच्या बाजूने गेले असून, त्याचा कोणताच उपयोग येथील शेतकºयांना होत नाही. तेच आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्यावे. ‘आता नाही तर कधीच नाही,’ असा नारा देत पाण्याच्या संघर्षाला सुरुवात केली आहे. तहानलेल्या दुष्काळी भागातील लोकांची कायमस्वरुपी तहान कधी भागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चळवळीच्या माध्यमातून परिसराला कायमचे टँकरमुक्त करायचे आहे. या परिषदेमध्ये आ. जयकुमार गोरे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अनिल देसाई, पंचायत समितीचे सदस्य तानाजी काटकर, तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, अनेक मान्यवर उपस्थित होते.