शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

भुजबळांकडून आंदोलनाची नौटंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

सातारा : राज्य शासनाच्या बेजाबदारपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. देशात इतर राज्यांत मिळत असलेले हे आरक्षण महाराष्ट्रातच ...

सातारा : राज्य शासनाच्या बेजाबदारपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. देशात इतर राज्यांत मिळत असलेले हे आरक्षण महाराष्ट्रातच रद्द झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष येत्या २६ जूनला राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. छगन भुजबळ यांनी केवळ आंदोलनाची नौटंकी करण्याऐवजी सत्ता सोडून बाहेर पडावे, असे आव्हान भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने २६ जूनला आम्ही ओबीसी आरक्षणाचा विषय घेऊन लढा उभारला आहे. त्याच पध्दतीने मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी हाच घोळ केलेला आहे. त्यांनी कोर्टात व्यवस्थित भूमिका मांडली नाही. टेक्निकल गोष्टी होत्या, त्या समोर आणल्या नाहीत. गायकवाड आयोगाच्या अहवालाचे भाषांतर त्यांना करता आले नाही. न्यायालयात सरकार व्यवस्थित भूमिका मांडत नसल्याची नोंद कोर्टाने नोंदवली आहे. मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीमधील असलेले आरक्षण मिळत नाही. हा प्रश्न हे सरकार व्यवस्थित हाताळत नाही. एकूणच सरकार मागासवर्गीयाबाबत उदासीन असल्याने आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहोत.

आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या सरकारला जाग आणण्यासाठी व तातडीने कार्यवाही करावी, यासाठी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर एक हजार ठिकाणी आंदोलन होणार आहे. राज्य शासनाने आरक्षण रद्द होऊ नये, यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही. याउलट सत्तेत असलेले ओबीसी नेते आंदोलनाचे नाटक करत आहेत. वडेट्टीवार मागासवर्गीय आयोग स्थापन करू असे सांगितले होते. तो अजून स्थापन झालेला नाही. मंत्री छगन भुजबळ हे समता परिषदेचे नेते आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे तशी सरकामध्ये असल्याने भुजबळांचीही देखील आहे. पण ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची नौटंकी करत आहेत. समाजाचा वापर सत्तेसाठी करताना समाजासाठी काही देणं लागतो. पण सरकार त्यांचे ऐकत नसल्यानेच त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे, असेही आ. गोरे म्हणाले.

चौकट..

निवडणूक घेऊ देणार नाही..

जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण पुन्हा देत नाहीत, मागासवर्गीय पदोन्नतीचे आरक्षण पुनर्स्थापित करत नाही. तोपर्यंत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही घेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

चौकट

जिल्ह्यात जिल्हाधिकारीच पालकमंत्री...

जिल्ह्यात पालकमंत्री कोण? हा संशोधनाचा विषय असून मला वाटते की जिल्हाधिकारी शेखर सिंह हेच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसमावेशक पध्दतीने काम करणे अपेक्षित होते. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वत: डॉक्टर असल्यासारखे निर्णय घेतले. गृहविलगीकरणामुळे रुग्णसंख्या वाढेल, याची भीती सुरुवातीपासूनच आम्ही मांडत होतो, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, असा दावा आ. गोरे यांनी केला.