शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

भुजबळांकडून आंदोलनाची नौटंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

सातारा : राज्य शासनाच्या बेजाबदारपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. देशात इतर राज्यांत मिळत असलेले हे आरक्षण महाराष्ट्रातच ...

सातारा : राज्य शासनाच्या बेजाबदारपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. देशात इतर राज्यांत मिळत असलेले हे आरक्षण महाराष्ट्रातच रद्द झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष येत्या २६ जूनला राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. छगन भुजबळ यांनी केवळ आंदोलनाची नौटंकी करण्याऐवजी सत्ता सोडून बाहेर पडावे, असे आव्हान भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने २६ जूनला आम्ही ओबीसी आरक्षणाचा विषय घेऊन लढा उभारला आहे. त्याच पध्दतीने मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी हाच घोळ केलेला आहे. त्यांनी कोर्टात व्यवस्थित भूमिका मांडली नाही. टेक्निकल गोष्टी होत्या, त्या समोर आणल्या नाहीत. गायकवाड आयोगाच्या अहवालाचे भाषांतर त्यांना करता आले नाही. न्यायालयात सरकार व्यवस्थित भूमिका मांडत नसल्याची नोंद कोर्टाने नोंदवली आहे. मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीमधील असलेले आरक्षण मिळत नाही. हा प्रश्न हे सरकार व्यवस्थित हाताळत नाही. एकूणच सरकार मागासवर्गीयाबाबत उदासीन असल्याने आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहोत.

आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या सरकारला जाग आणण्यासाठी व तातडीने कार्यवाही करावी, यासाठी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर एक हजार ठिकाणी आंदोलन होणार आहे. राज्य शासनाने आरक्षण रद्द होऊ नये, यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही. याउलट सत्तेत असलेले ओबीसी नेते आंदोलनाचे नाटक करत आहेत. वडेट्टीवार मागासवर्गीय आयोग स्थापन करू असे सांगितले होते. तो अजून स्थापन झालेला नाही. मंत्री छगन भुजबळ हे समता परिषदेचे नेते आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे तशी सरकामध्ये असल्याने भुजबळांचीही देखील आहे. पण ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची नौटंकी करत आहेत. समाजाचा वापर सत्तेसाठी करताना समाजासाठी काही देणं लागतो. पण सरकार त्यांचे ऐकत नसल्यानेच त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे, असेही आ. गोरे म्हणाले.

चौकट..

निवडणूक घेऊ देणार नाही..

जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण पुन्हा देत नाहीत, मागासवर्गीय पदोन्नतीचे आरक्षण पुनर्स्थापित करत नाही. तोपर्यंत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही घेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

चौकट

जिल्ह्यात जिल्हाधिकारीच पालकमंत्री...

जिल्ह्यात पालकमंत्री कोण? हा संशोधनाचा विषय असून मला वाटते की जिल्हाधिकारी शेखर सिंह हेच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसमावेशक पध्दतीने काम करणे अपेक्षित होते. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वत: डॉक्टर असल्यासारखे निर्णय घेतले. गृहविलगीकरणामुळे रुग्णसंख्या वाढेल, याची भीती सुरुवातीपासूनच आम्ही मांडत होतो, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, असा दावा आ. गोरे यांनी केला.