शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

भुजबळांकडून आंदोलनाची नौटंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

सातारा : राज्य शासनाच्या बेजाबदारपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. देशात इतर राज्यांत मिळत असलेले हे आरक्षण महाराष्ट्रातच ...

सातारा : राज्य शासनाच्या बेजाबदारपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. देशात इतर राज्यांत मिळत असलेले हे आरक्षण महाराष्ट्रातच रद्द झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष येत्या २६ जूनला राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. छगन भुजबळ यांनी केवळ आंदोलनाची नौटंकी करण्याऐवजी सत्ता सोडून बाहेर पडावे, असे आव्हान भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने २६ जूनला आम्ही ओबीसी आरक्षणाचा विषय घेऊन लढा उभारला आहे. त्याच पध्दतीने मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी हाच घोळ केलेला आहे. त्यांनी कोर्टात व्यवस्थित भूमिका मांडली नाही. टेक्निकल गोष्टी होत्या, त्या समोर आणल्या नाहीत. गायकवाड आयोगाच्या अहवालाचे भाषांतर त्यांना करता आले नाही. न्यायालयात सरकार व्यवस्थित भूमिका मांडत नसल्याची नोंद कोर्टाने नोंदवली आहे. मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीमधील असलेले आरक्षण मिळत नाही. हा प्रश्न हे सरकार व्यवस्थित हाताळत नाही. एकूणच सरकार मागासवर्गीयाबाबत उदासीन असल्याने आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहोत.

आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या सरकारला जाग आणण्यासाठी व तातडीने कार्यवाही करावी, यासाठी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर एक हजार ठिकाणी आंदोलन होणार आहे. राज्य शासनाने आरक्षण रद्द होऊ नये, यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही. याउलट सत्तेत असलेले ओबीसी नेते आंदोलनाचे नाटक करत आहेत. वडेट्टीवार मागासवर्गीय आयोग स्थापन करू असे सांगितले होते. तो अजून स्थापन झालेला नाही. मंत्री छगन भुजबळ हे समता परिषदेचे नेते आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे तशी सरकामध्ये असल्याने भुजबळांचीही देखील आहे. पण ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची नौटंकी करत आहेत. समाजाचा वापर सत्तेसाठी करताना समाजासाठी काही देणं लागतो. पण सरकार त्यांचे ऐकत नसल्यानेच त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे, असेही आ. गोरे म्हणाले.

चौकट..

निवडणूक घेऊ देणार नाही..

जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण पुन्हा देत नाहीत, मागासवर्गीय पदोन्नतीचे आरक्षण पुनर्स्थापित करत नाही. तोपर्यंत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही घेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

चौकट

जिल्ह्यात जिल्हाधिकारीच पालकमंत्री...

जिल्ह्यात पालकमंत्री कोण? हा संशोधनाचा विषय असून मला वाटते की जिल्हाधिकारी शेखर सिंह हेच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसमावेशक पध्दतीने काम करणे अपेक्षित होते. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वत: डॉक्टर असल्यासारखे निर्णय घेतले. गृहविलगीकरणामुळे रुग्णसंख्या वाढेल, याची भीती सुरुवातीपासूनच आम्ही मांडत होतो, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, असा दावा आ. गोरे यांनी केला.