शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

बचावासाठी रंगला लपवाछपवीचा खेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST

अभियंत्यांची इयत्ता भाग ३ नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा परिषदेतील कार्यरत काही शाखा व कनिष्ठ अभियंत्यांनी ...

अभियंत्यांची इयत्ता भाग ३

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा परिषदेतील कार्यरत काही शाखा व कनिष्ठ अभियंत्यांनी शैक्षणिक कागदपत्रे सादर केली आहेत. पण, काही तालुक्यांतील विभागांनी माहिती अधिकारातील (त्र) कलमाचा आधार घेत अभियंत्यांची शैक्षणिक कागदपत्रे दिली नाहीत. यावरून काही विभाग माहिती देतात तर काही देत नाहीत, अशी विसंगती दिसून आली आहे.

‘वास्तविक माहिती अधिकारातील कलम (ख) नुसार प्रत्येक शासकीय विभागात कार्यरत कर्मचारी, अभियंत्यांची आणि अधिका-यांच्या पदाची माहिती ही दिसेल, अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. पण, या नियमाकडे जवळपास सर्वच विभागांत दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. तर, आतापर्यंत टपालाने अनेक विभागांनी अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेची माहिती दिली आहे. पण, काही तालुक्यांतून तीन महिन्यांपासून माहितीच प्राप्त झालेली नाही. यासाठी संबंधित जनमाहिती अधिका-यांनी शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१२/८८९/प्र.क्र. ४७९ /सहा १७ ऑक्टोबर २०१४ नुसार माहिती देण्याबाबत बंधन नाही, असे कळवून खरी शैक्षणिक माहिती देण्यास टाळल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष शेंडे यांचे म्हणणे आहे.

मागूनही माहिती न देणे हे यंत्रणेने आपली पदे शाबीत राहण्यासाठी केलेली शासनाची फसवणूक आहे. त्यामुळे शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून सत्य समोर आणावे, असेही माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष शेंडे यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, संतोष शेंडे यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांनाही निवेदन देऊन जिल्हा परिषदेतील अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

चौकट :

नियमांचे उल्लंघन...

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये कलम (ख) नुसार शासनाच्या सर्व कार्यालयात कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांची संपूर्ण माहिती दिसेल, अशा फलकावर लावणे बंधनकारक आहे. असे असूनसुद्धा सातारा जिल्हा परिषदेत या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे, असेही माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष शेंडे यांचे म्हणणे आहे.

...............................................