शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

इथं किड्यांसोबत गहूसुद्धा रगडतायत!

By admin | Updated: February 23, 2015 00:22 IST

भारनियमन : वीजवितरण कंपनीच्या अजब फतव्यानं वर्णे परिसर अंधारात

सातारा : ‘गव्हासोबत किडे रगडले जातात,’ ही म्हण आपण नेहमी ऐकतो; पण याच म्हणीला उलट्या पद्धतीने म्हणण्याची वेळ सातारा तालुक्यातील वर्णे परिसरावर आलेली आहे. वीजबिल थकविणारे अन् आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करायची सोडून वीजवितरण कंपनीने येथील वीस गावांमध्ये सात तासांचे अघोषित भारनियमन सुरू केलेले आहे.‘गुन्हा एकाने करायचा अन् शिक्षा मात्र समूहाला’ देण्याचाच हा प्रकार असल्याचे मत वर्णे परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करत आहेत. वीज वितरण तर्फे देगाव, निगडी, तासगाव, राजेवाडी व इतर गावांमध्ये सात तास सक्तीचे भारनियमन सुरू केले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरुवारी रात्री अडीच वाजता वीज गुल होते, ती सकाळी साडेआठ वाजता येते. तर शुक्रवार, शनिवार, रविवारी सकाळी ८.३० वाजता वीज जाते, ती दुपारी २.३० वाजता येते. भारनियमनामुळे या परिसरात अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. या परिसरामध्ये पोल्ट्रींची संख्या आहे. तसेच शेतीक्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. बहुतांश शेतकऱ्यांची शेतामध्येच वस्ती आहे. तुरळक वस्ती असल्याने चोरट्यांची भीती आणखी वाढली आहे. रात्रीच्या वेळी भारनियमन होत असल्याने दरोड्यासारखे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वीजवितरण कंपनी येथील भारनियमन बंद करणार का?, असा सवाल शेतकरी व्यक्त करत आहेत.दरम्यान, जे शेतकरी अथवा ग्राहक वीज चोरी करत आहेत, त्यांचा शोध वीजवितरणने घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. किंवा जे ग्राहक वीजबिले थकवत आहेत. त्यांचे वीजकनेक्शन तोडावेत. वीज बिले प्रामाणिकपणे भरणाऱ्यांवर कारवाई का केली जात आहे?, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. भारनियमनाच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना व्यवसाय करणे मुश्किल झाले असून, शेतीला पाणी देता येत नसल्याने पिकेही करपू लागली आहेत. वीज वितरण कंपनीने गुन्हेगारांवर कारवाई करावी; परंतु प्रामाणिक ग्राहकांना त्यात रगडू नये, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)काय आहे ‘झेड’ ग्रुप?वीज वितरणतर्फे ज्या भागातील ग्राहक वीजबिले मोठ्या प्रमाणावर थकवितात तसेच ज्या ठिकाणी वीज गळती व वीज चोरी केली जाते, त्या भागाला ‘झेड’ दर्जा दिला जातो. या दर्जात वीज विभागाचा जो फिडर समाविष्ट केला जातो, त्या ठिकाणी अतिरिक्त भारनियमन सुरू केले जाते.वर्णे परिसरात शेतीपंपाची वीस लाख रुपये व घरगुती ग्राहकांची २९ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. एकूण १५ हजार ग्राहकांपैकी ५ हजार ग्राहकांनी वीजबिले वेळेत भरली नसल्याने या संपूर्ण परिसरात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. ही थकबाकी लवकर भरली जाणे आवश्यक आहे.- एस. एस. सय्यद, शाखा अभियंतावीजवितरण, वर्णे, ता. सातारा