शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

इथं किड्यांसोबत गहूसुद्धा रगडतायत!

By admin | Updated: February 23, 2015 00:22 IST

भारनियमन : वीजवितरण कंपनीच्या अजब फतव्यानं वर्णे परिसर अंधारात

सातारा : ‘गव्हासोबत किडे रगडले जातात,’ ही म्हण आपण नेहमी ऐकतो; पण याच म्हणीला उलट्या पद्धतीने म्हणण्याची वेळ सातारा तालुक्यातील वर्णे परिसरावर आलेली आहे. वीजबिल थकविणारे अन् आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करायची सोडून वीजवितरण कंपनीने येथील वीस गावांमध्ये सात तासांचे अघोषित भारनियमन सुरू केलेले आहे.‘गुन्हा एकाने करायचा अन् शिक्षा मात्र समूहाला’ देण्याचाच हा प्रकार असल्याचे मत वर्णे परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करत आहेत. वीज वितरण तर्फे देगाव, निगडी, तासगाव, राजेवाडी व इतर गावांमध्ये सात तास सक्तीचे भारनियमन सुरू केले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरुवारी रात्री अडीच वाजता वीज गुल होते, ती सकाळी साडेआठ वाजता येते. तर शुक्रवार, शनिवार, रविवारी सकाळी ८.३० वाजता वीज जाते, ती दुपारी २.३० वाजता येते. भारनियमनामुळे या परिसरात अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. या परिसरामध्ये पोल्ट्रींची संख्या आहे. तसेच शेतीक्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. बहुतांश शेतकऱ्यांची शेतामध्येच वस्ती आहे. तुरळक वस्ती असल्याने चोरट्यांची भीती आणखी वाढली आहे. रात्रीच्या वेळी भारनियमन होत असल्याने दरोड्यासारखे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वीजवितरण कंपनी येथील भारनियमन बंद करणार का?, असा सवाल शेतकरी व्यक्त करत आहेत.दरम्यान, जे शेतकरी अथवा ग्राहक वीज चोरी करत आहेत, त्यांचा शोध वीजवितरणने घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. किंवा जे ग्राहक वीजबिले थकवत आहेत. त्यांचे वीजकनेक्शन तोडावेत. वीज बिले प्रामाणिकपणे भरणाऱ्यांवर कारवाई का केली जात आहे?, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. भारनियमनाच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना व्यवसाय करणे मुश्किल झाले असून, शेतीला पाणी देता येत नसल्याने पिकेही करपू लागली आहेत. वीज वितरण कंपनीने गुन्हेगारांवर कारवाई करावी; परंतु प्रामाणिक ग्राहकांना त्यात रगडू नये, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)काय आहे ‘झेड’ ग्रुप?वीज वितरणतर्फे ज्या भागातील ग्राहक वीजबिले मोठ्या प्रमाणावर थकवितात तसेच ज्या ठिकाणी वीज गळती व वीज चोरी केली जाते, त्या भागाला ‘झेड’ दर्जा दिला जातो. या दर्जात वीज विभागाचा जो फिडर समाविष्ट केला जातो, त्या ठिकाणी अतिरिक्त भारनियमन सुरू केले जाते.वर्णे परिसरात शेतीपंपाची वीस लाख रुपये व घरगुती ग्राहकांची २९ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. एकूण १५ हजार ग्राहकांपैकी ५ हजार ग्राहकांनी वीजबिले वेळेत भरली नसल्याने या संपूर्ण परिसरात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. ही थकबाकी लवकर भरली जाणे आवश्यक आहे.- एस. एस. सय्यद, शाखा अभियंतावीजवितरण, वर्णे, ता. सातारा