शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सातारा शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले असले तरी सातारा शहरात याचा फज्जा उडाला आहे. खरेदी ...

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले असले तरी सातारा शहरात याचा फज्जा उडाला आहे. खरेदी करतेवेळी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे नागरिकांवर बंधने आली होती. मात्र, आता शासनाने नियम शिथील केले आहेत तसेच किराणा दुकानांच्या वेळेतही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सातारा शहरात तर सोशल डिस्टन्सिगंचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या अनेक नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. काही नागरिक तर मास्क तोंडावर न ठेवता हनुवटीवर ठेवत असल्याचेही दिसून येते. यामुळे शासन नियमांना तिलांजली मिळत आहे.

......................................

वीजचोरांवर कारवाईची गरज

सातारा : माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजचोरी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून वीजचोरांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. घरासाठी वीजचोरी करणारे सायंकाळच्या सुमारास वीजतारांवर आकडे टाकतात. त्यानंतर रात्रभर वीज पुरवठा सुरू राहतो. अशा वीजचोरांवर कारवाईची गरज आहे.

.................................................

पार्किंगमध्ये अस्ताव्यस्त वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येत आहेत. त्यामुळे गाड्या काढताना व उभ्या करताना अडचणी निर्माण होत आहेत. याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेसमोर दुचाकीसाठी पार्किंग आहे. याठिकाणी नोकरदार दुचाकी लावतात तसेच कामानिमित्त येणाऱ्यांच्या गाड्याही असतात. पण, अनेकवेळा पार्किंगमध्ये जागा उरत नाही. त्यावेळी नागरिक कशाही पध्दतीने दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे इतरांना गाडी बाहेर काढता येत नाही.

...................................................................

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव : सातारा - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. सातारा - पंढरपूर मार्ग जिल्ह्यातील कोरेगाव, पुसेगाव, निढळ, गोंदवले, म्हसवडवरुन जातो. या मार्गाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात झाडे होती. पण, महामार्गाच्या कामावेळी अनेक झाडे तोडण्यात आली. त्यामुळे सध्या या रस्त्याच्या बाजूला अपवादात्मकच झाडे दिसतात. पर्यावरण संतुलनासाठी या महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करुन संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.

....................................................

साताऱ्यात प्लास्टिक पिशवीतून फळे

सातारा : सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरूवातीच्या काळात प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण, त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आजही साताऱ्यातील काही फळ विक्रेते प्लास्टिक पिशवीतून फळे देत आहेत.

.........................................................

मेथीची पेंडी महागली

सातारा : सातारा शहरात पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मेथीची पेंडी तर २० रुपयांवर गेली आहे. सातारा बाजार समितीतून पालेभाज्यांची खरेदी करण्यात येते. त्यानंतर भाज्या मंडईत विक्रीसाठी ठेवण्यात येतात. सध्या मेथी तसेच कोथिंबीर पेंडीचा दर वाढला आहे. मेथी २० रुपये तर कोथिंबीर पेंडी १५ रुपयांपुढे मिळत आहे.

........................................

खड्डेमय रस्त्यातून प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातून क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या पुढील काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रात्रीच्यावेळी तर वाहने या खड्ड्यांत आदळतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधितांनी डांबराने हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

.................................................

कोरोनामुळे आठवडा बाजार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील आठवडा बाजार बंद आहेत. माण तालुक्यातीलही बाजारही बंद आहेत.

...........................................

समर्थ मंदिर चौकात कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकात सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारकांबरोबरच नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

सातारा नगरपालिका - बोगदा मार्गावर समर्थ मंदिर चौक आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, या चौकात अरुंद रस्ता आहे तसेच एस. टी. थांबाही आहे. काही वाहनेही पार्क करण्यात येतात. त्यामुळे सकाळी दहा आणि सायंकाळी सहाच्या सुमारास याठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वाहनधारकांचा बराच वेळ जातो. याठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.