शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST

ओढ्यावर अतिक्रमणे सातारा : पालिकेच्या हद्दवाढीत विलासपूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भागातील प्लॉटधारकांनी अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात केल्याने ...

ओढ्यावर अतिक्रमणे

सातारा : पालिकेच्या हद्दवाढीत विलासपूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भागातील प्लॉटधारकांनी अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या परिसरातील रहदारी वाढल्याने आता पालिकेने अनधिकृत बांधकामे पाडून मुख्य रस्ते मोठे करण्याची गरज आहे.

पाण्याची टंचाई

खटाव : सतत भेडसावणार्‍या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने १९७२ च्या दुष्काळात मांजरवाडी शिवारात ‘गव्हल’ आणि ‘पवारवस्ती’नजीक अशा दोन हजार तलावांची निर्मिती केली. मात्र, या तलावांना लागलेले गळतीचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही.

मोबाईल चोरटे सक्रिय

वाई : वाई शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. त्यांचा शहरात सुळसुळाट झाला असून, सध्या भाजी मंडई चोरट्यांच्या रडारवर आहे. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकरांना मंडईतूनच मोबाईलविना घरी परतावे लागत आहे.

वाहनचालक त्रस्त

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर आनेवाडी येथील टोलनाक्यावर फास्टट्रॅक असूनही वाहतुकीची कोंडी ही रोजचीच बाब बनली आहे. व्यवस्थापन मात्र याबाबत निष्काळजी दिसत असून वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. तरी फास्टट्रॅक यंत्रणा सुरळीत सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

घाटरस्ते धोकादायक

सातारा : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढली असून, अरुंद घाट रस्त्यांवर अधुन-मधून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व प्रवाशांची गैरसोय होत आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस कास पठार, सज्जनगड, यवतेश्वर, तापोळा, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी घाट मार्गातून जावे लागते.

प्राण्यांचा संचार वाढला

सातारा : लॉकडाऊनमध्ये बाहेर मानवाचा वावर कमी झाल्याने पशु-पक्षी व वन्यजीवांचा वावर वाढला होता. रस्त्यांवर वाहनांची संख्या रोडावल्याने पशु-पक्षी व वन्यजीव मुक्तसंचार करत होते. मात्र आता सर्व पूर्वीप्रमाणेच सुरू झाले आहे. त्यामुळे वारंवार नागरिकांची गर्दी वाढली असली तरी, वन्यजीवांचा मानवी वस्त्यांमध्ये संचार वाढलेलाच आहे.

रिफ्लेक्टरची मागणी

उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर, तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होतो. रिफ्लेक्टर बसविल्यास अपघात कमी होणार आहेत, तसेच अनेकांचे जीवही वाचणार आहेत.

कचरा वर्गीकरण नावालाच...

सातारा : पालिकेने सुका कचरा व ओला कचरा असे वर्गीकरण करण्याचे आवाहन केले होते. त्या पद्धतीने घंटागाड्याही कचरा गोळा करत होत्या. मात्र, सध्या अनेक ठिकाणी घंटागाड्या हा कचरा एकत्रच गोळा करत असल्याने या कचऱ्याचे वर्गीकरणच होत नाही.

कचऱ्याचे साम्राज्य

सातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातील लोटून काढलेला कचरा बाहेरून येणाऱ्या पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या फलाटाच्या कोपऱ्यात टाकण्यात येत आहे. त्यामुळे तो कचरा नियमित उचलला जात नसल्याने या ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचला आहे.

गॅरेजवर वाहनांची गर्दी

सातारा : उन्हाळा वाढू लागल्याने वाहनांची चाके पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक गाड्या गरम होऊन इंजिनही खराब होत असल्याने वाहने गॅरेजवर मोठ्या प्रमाणात न्यावी लागत आहेत. अनेक दिवस बंद असलेली वाहने देखील सुरू होत नसल्याने गॅरेजवर न्यावी लागताना पाहायला मिळत आहेत.

रोपे गेली वाळून

सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालये परिसरात बागा तयार केल्या आहेत. या बागेत विविध प्रकारची झाडे लावली आहेत. या झाडांना मुले घरून आणलेले पाणी घालत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे परिसरातील रोपे जळून चालली आहेत. या ठिकाणी पाणी घालण्यासाठी पर्यायी सोय करण्याची मागणी केली जात आहे.