शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

‘वीजवितरण’च्या कारभारावरून संतापाची ठिणगी

By admin | Updated: January 5, 2016 00:40 IST

कऱ्हाडात सदस्य आक्रमक : अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; वेळ घालवण्यापेक्षा कामे करण्याच्या सूचना

कऱ्हाड : कऱ्हाड पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य तालुक्यातील जनतेच्या विजेबाबतच्या तक्रारी वेळोवेळी मांडत असतात. परंतु त्याची वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून जनतेच्या वीज वितरणबाबतच्या बहुतेक तक्रारी सोडवण्यात आलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांकडून नुसती कोरडी आश्वासनेच दिली जातात. त्यामुळे आम्ही काय नुसत्या समस्याच मांडायच्या काय ? त्याची कार्यवाही अधिकारी कधी करणार, अशा शब्दात वीजवितरणच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांनी ताशेरे ओढले. येथील यशवंतराव चव्हाण बचत भवन येथे सभा पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. यावेळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. वीजवितरण कंपनीच्या आढाव्यावेळी सर्वच पंचायत समिती सदस्य व उपस्थित अधिकाऱ्यांच्यांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी तालुक्यातील गावांमध्ये वीज कनेक्शन देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून केली जाणारी टाळाटाळ, आटके परिसरात सिंंगल फेज योजनेची प्रलंबित असलेली कामे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील विजेचा खांबांची दुरवस्था अशा वीजवितरण कंपनीकडून प्रलंबित असलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांवर सभेदरम्यान सदस्यांनी आगपाखड केली.याप्रश्नांबाबत प्रत्येक मासिक सभेमध्ये चर्चा होऊनही अधिकाऱ्यांकडून यावर मार्ग काढला जात नसल्याने वीजकंपनीच्या कामाबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी कोळेवाडी येथील शेतकऱ्याला गेल्या दीड वर्षापासून वारंवार मागणी करूनही वीज कनेक्शन मिळालेले नाही. वीजकंपनीचे अधिकारी केवळ आश्वासनेच देत असतात. त्यांची प्रत्यक्ष कृती मात्र शून्य असते, अशी टीका लक्ष्मण जाधव यांनी केली. विंंग परिसरात गेल्या दोन वर्षांपासून नवीन शेती पंपांना वीज कनेक्शन देण्यात आली नाहीत. वारंवार मागणी करूनही त्याकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी विजेच्या खांबासाठी पैसे भरण्यास तयार असूनही त्यांची दखल घेतली जात नाही. अपार्टमेंटसाठी तातडीने वीज कनेक्शन दिली जातात शेतकऱ्यांच्या ङ्कमागणीकडे मात्र, दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप शिरवाडकर यांनी केला. अनिता निकम यांंनी विजेच्या उच्च दाबामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली असून, त्यासाठी वीजकंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी ङ्कमागणी केली. भाऊसाहेब चव्हाण यांनी राज्य सरकारच्या निर्णयानुसार टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावांमधील जनतेला सवलतीचे वीज दर त्वरित लागू करण्यात यावेत. चोरून वीज वापरणाऱ्यांंवर वीजकंपनी कारवाई करणार नसेल, तर शेतकऱ्यांनीही त्याच प्रकारे वीज चोरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये अशी टीका चव्हाण यांंनी केली. ग्रामपंचायत विभागाच्या कामाकाजाचा आढावा सादर केला जात असताना अनिता निकमङ्क यांंनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसेवक आपल्या कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची दैनंदिन कामे खोळंबून राहत असल्याचे सांगितले. रूपाली यादव यांनी शासनाच्या निर्णयामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुली बंद करण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतींना दैनंदिन खर्च करणे कठीण होत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतनही मिळालेले नाही. लक्ष्मण जाधव यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालकांना मानधन देण्याची मागणी केली.यावेळी पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शालेय पोषण आहार, एसटी प्रशासन तसेच उपजिल्हा रुग्णालय या विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाचा आढावा सादर केला. (प्रतिनिधी) सदस्यांनी काय फक्त समस्यांच मांडायच्या काय.. मासिक सभेवेळी सदस्यांकडून भागातील कामांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या जात असतात. याचे अधिकाऱ्यांना गांभीर्यच वाटत नाही. तसेच त्यांच्याकडून सदस्यांची मागणी पूर्ण केली जात नाही. त्यामुळे सदस्यांनी नुसत्या समस्याच मांडायच्या काय. असे सदस्या रूपाली यादव यांनी सभागृहात सभेदरम्यान सांगितले.