शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मालवाहू टेम्पो बनला ‘स्कूल बस’-शासनाकडून निधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:52 IST

त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक क्रीडा स्पर्धेत भाग घेणा-या विद्यार्थी संख्येवर खासगी जीप, टेम्पोमध्ये खचाखच विद्यार्थ्यांना बसवून धोकादायक स्थितीत स्पर्धेसाठी आणले जातात. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रशासन सुस्त ।

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : विद्यार्थ्यांना देशाची भावी संपत्ती समजली तर वावगे ठरणार नाही. त्यांची काळजी करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शहरांमध्ये आलिशान स्कूलबस किंवा रिक्षांमधून मुलं शाळेला जातात; पण फलटण तालुक्यात मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोतून मुलांना खेळासाठी नेले जाते आहे. ही वाहतूक विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते.

विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होऊन स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा केंद्र, बीट, तालुकास्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थ्यांना धोकादायक स्थितीत व माल वाहतूक करणाºया छोट्या टेम्पोतून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून शासन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यासाठी केंद्रस्तरीय, बीटस्तरीय, तालुकास्तरावर सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पण केंद्रस्तरावरील स्पर्धा दहा किलोमीटर अंतरावर जेथे माळरान, मैदान उपलब्ध आहे. त्या ठिकाणी स्पर्धांचे आयोजन केले जाते.

बीटस्तरावरील स्पर्धा तीन बिटांतील शाळा एकत्र करून स्पर्धा भरवण्यात येतात. त्या उपलब्घ मैदानावर पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी येतात. त्याप्रमाणे तालुस्तरावर स्पर्धा होतात. त्या ठिकाणी जाण्यासाठी शासन कोणताही निधी देत नाही. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक क्रीडा स्पर्धेत भाग घेणा-या विद्यार्थी संख्येवर खासगी जीप, टेम्पोमध्ये खचाखच विद्यार्थ्यांना बसवून धोकादायक स्थितीत स्पर्धेसाठी आणले जातात. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

पाच किलोमीटर आत स्पर्धा हव्यात...जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक टाळण्यासाठी केंद्र्रस्तरीय स्पर्धेसाठी पाच किलोमीटरच्या आत मैदान उपलब्घ करावे. मुख्य रस्त्याजवळ जागा उपलब्घ करावी, शासनाने विद्यार्थी वाहतुकीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

 

जिल्हा परिषद शाळा स्पर्धेत टिकण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. क्रीडा स्पर्धांना जाण्यासाठी निधी नसल्याने काही शिक्षक आपल्या खासगी कारमधून विद्यार्थ्यांना नेतात; पण मोठ्या शाळेत विद्यार्थी संख्या मोठी असल्याने टेम्पोतून घेऊन जावे लागते. शासन वाहतुकीसाठी निधी देत नाही- अर्जुन भोईटे, निवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी

ग्रामीण भागात खेळाडू घडावेत, त्यासाठी शिक्षक जादा तास घेतात. पण ग्रामीण भागात मैदाने उपलब्घ नाहीत. केंद्रस्तरावर स्पर्धा होतात. त्यावेळी दहा ते अकरा शाळेचे विद्यार्थी असतात. त्यांना ने-आण करण्यासाठी टेम्पोशिवाय पर्याय नसतो.- लहुराज मोहिते, मुळीकवाडी, ता. फलटण.