शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

पाण्यासाठी भर उन्हात चार किलोमीटरची पायपीट-पाण्यासाठी डोंगर पालथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:52 IST

सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत काही अंतर पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.शहराच्या पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये ...

ठळक मुद्देपठारावरील गावांतील महिला, मुलं उन्हाचे चटके सोसत भरतायत झऱ्यातलं पाणी

सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत काही अंतर पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

शहराच्या पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील १९ कुंटुबे असणाºया आखाडेवस्तीतील साधारण २०० ते २५० लोकसंख्या असणाºया ग्रामस्थांना आत्तापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. परंतु ज्या झºयातून पाणी टाकीत सोडले जायचे त्या झºयाचेच पाणी कमी होऊ लागले आहे. सद्य:स्थितीला झºयाचे पाणी कमी होत चालल्याने डोंगरातील एकूण चार झºयावर पाणी भरण्यासाठी महिलांची, लहान मुलांची तसेच पुरुष मंडळींचीही गर्दी होताना दिसत आहे.

पाण्याची निकड भागविण्यासाठी लोक शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहेत.तसेच लग्नसराई सुरू असल्याने जवळच्या नातेवाइकांच्या लग्नकार्याला जायचे म्हटले तर पाणी भरण्याचा प्रश्न उरतोच?

यामुळे काहींना लग्नकार्याला जाण्यासाठी देखील मुकावे लागत आहे. दिवसंरात्र पाणी भरण्याचे एकच काम त्यांना करावे लागत आहे. मुलांना उन्हाळी सुटी असल्यामुळे त्यांना चार-चार किलोमीटर पाणी भरण्याच्या कामासाठी मदतीला घेतले जात आहे.रात्रभर जागरण..सध्या उन्हाळी सुटी असल्याने तसेच लग्नकायार्मुळे परगावी कामानिमित्त असणारे स्थानिक आपल्या गावी येऊ लागले आहेत. झºयाचे पाणी कमी होत असल्याने पाणी पुरत नाही. झºयावर जो लवकर जाईल त्यालाच लवकर पाणी उपलब्ध होत आहे. एक हंडा भरण्यासाठी एक तास लागत आहे. 

उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाकडून बोअर मिळावी, तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा. एखादे लग्नकार्य अथवा कार्यक्रम असल्यास चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते.- ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडे

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर