शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पाण्यासाठी भर उन्हात चार किलोमीटरची पायपीट-पाण्यासाठी डोंगर पालथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:52 IST

सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत काही अंतर पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.शहराच्या पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये ...

ठळक मुद्देपठारावरील गावांतील महिला, मुलं उन्हाचे चटके सोसत भरतायत झऱ्यातलं पाणी

सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत काही अंतर पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

शहराच्या पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील १९ कुंटुबे असणाºया आखाडेवस्तीतील साधारण २०० ते २५० लोकसंख्या असणाºया ग्रामस्थांना आत्तापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. परंतु ज्या झºयातून पाणी टाकीत सोडले जायचे त्या झºयाचेच पाणी कमी होऊ लागले आहे. सद्य:स्थितीला झºयाचे पाणी कमी होत चालल्याने डोंगरातील एकूण चार झºयावर पाणी भरण्यासाठी महिलांची, लहान मुलांची तसेच पुरुष मंडळींचीही गर्दी होताना दिसत आहे.

पाण्याची निकड भागविण्यासाठी लोक शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहेत.तसेच लग्नसराई सुरू असल्याने जवळच्या नातेवाइकांच्या लग्नकार्याला जायचे म्हटले तर पाणी भरण्याचा प्रश्न उरतोच?

यामुळे काहींना लग्नकार्याला जाण्यासाठी देखील मुकावे लागत आहे. दिवसंरात्र पाणी भरण्याचे एकच काम त्यांना करावे लागत आहे. मुलांना उन्हाळी सुटी असल्यामुळे त्यांना चार-चार किलोमीटर पाणी भरण्याच्या कामासाठी मदतीला घेतले जात आहे.रात्रभर जागरण..सध्या उन्हाळी सुटी असल्याने तसेच लग्नकायार्मुळे परगावी कामानिमित्त असणारे स्थानिक आपल्या गावी येऊ लागले आहेत. झºयाचे पाणी कमी होत असल्याने पाणी पुरत नाही. झºयावर जो लवकर जाईल त्यालाच लवकर पाणी उपलब्ध होत आहे. एक हंडा भरण्यासाठी एक तास लागत आहे. 

उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाकडून बोअर मिळावी, तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा. एखादे लग्नकार्य अथवा कार्यक्रम असल्यास चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते.- ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडे

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर