शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पाण्यासाठी भर उन्हात चार किलोमीटरची पायपीट-पाण्यासाठी डोंगर पालथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:52 IST

सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत काही अंतर पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.शहराच्या पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये ...

ठळक मुद्देपठारावरील गावांतील महिला, मुलं उन्हाचे चटके सोसत भरतायत झऱ्यातलं पाणी

सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत काही अंतर पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

शहराच्या पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील १९ कुंटुबे असणाºया आखाडेवस्तीतील साधारण २०० ते २५० लोकसंख्या असणाºया ग्रामस्थांना आत्तापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. परंतु ज्या झºयातून पाणी टाकीत सोडले जायचे त्या झºयाचेच पाणी कमी होऊ लागले आहे. सद्य:स्थितीला झºयाचे पाणी कमी होत चालल्याने डोंगरातील एकूण चार झºयावर पाणी भरण्यासाठी महिलांची, लहान मुलांची तसेच पुरुष मंडळींचीही गर्दी होताना दिसत आहे.

पाण्याची निकड भागविण्यासाठी लोक शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहेत.तसेच लग्नसराई सुरू असल्याने जवळच्या नातेवाइकांच्या लग्नकार्याला जायचे म्हटले तर पाणी भरण्याचा प्रश्न उरतोच?

यामुळे काहींना लग्नकार्याला जाण्यासाठी देखील मुकावे लागत आहे. दिवसंरात्र पाणी भरण्याचे एकच काम त्यांना करावे लागत आहे. मुलांना उन्हाळी सुटी असल्यामुळे त्यांना चार-चार किलोमीटर पाणी भरण्याच्या कामासाठी मदतीला घेतले जात आहे.रात्रभर जागरण..सध्या उन्हाळी सुटी असल्याने तसेच लग्नकायार्मुळे परगावी कामानिमित्त असणारे स्थानिक आपल्या गावी येऊ लागले आहेत. झºयाचे पाणी कमी होत असल्याने पाणी पुरत नाही. झºयावर जो लवकर जाईल त्यालाच लवकर पाणी उपलब्ध होत आहे. एक हंडा भरण्यासाठी एक तास लागत आहे. 

उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाकडून बोअर मिळावी, तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा. एखादे लग्नकार्य अथवा कार्यक्रम असल्यास चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते.- ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडे

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर