शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

चारशे वर्षांपूर्वीचे मंदिर दुर्लक्षित

By admin | Updated: February 4, 2015 23:53 IST

कार्वेचे धानाई देवी : रस्ता रूंदीकरणासह निवासस्थान होणे गरजेचे, सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

युवराज मोहिते - कार्वे  येथील ग्रामादैवत व पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकचे श्रद्धास्थान असणाऱ्या चारशे वर्षांपूर्वीच्या धानाईदेवी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. सोयी-सुविधा मिळत नसल्याने देवीच्या दर्शनासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.  कार्वे गावापासून तीन किलोमीटर व कऱ्हाड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर ‘वाघ’ नावाच्या शिवारात सुमारे चारशे वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेले धानाईदेवी मंदीर आहे. एक-एकर क्षेत्रात मोठ्या घडीव दगडांमध्ये या मुळ मंदिराची उभारणी करण्यात आली होती़ मात्र, कालांतराने या मंदिराची पडझड झाली. त्यामुळे मंदिराचा जिर्णोध्दार करावा, अशी ग्रामस्थांसह भाविकांचीही मागणी होती.  त्याबाबत देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापकांनाही ग्रामस्थांकडून विनंती करण्यात आली. मंदीराच्या जिर्णाेद्धारासाठी अर्थिक मदत देण्याची तयारीही ग्रामस्थांकडून दर्शविली. वैद्यकीय अधिकारी डॉ़ भगवान थोरात यांनी याबाबत काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला. मंदीराच्या जिर्णाेद्धारासाठी त्यांनी गावातील युवकांना हाक दिली़ मंदिर जिर्णाेध्दाराबाबत चर्चा करण्यासाठी संबंधित युवकांना त्यांनी मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन केले़ त्यानुसार मोठ्या संख्येने युवक मंदिरामध्ये जमले. पुरातन दुरवस्था झालेले मंदिर उतरवून त्याठिकाणी नवीन मंदिर बांधण्याचा निर्धार त्यावेळी व्यक्त करण्यात आला. श्रमदानातून जुने मंदिर उतरविण्यात आले. तसेच जिर्णाेध्दारासाठी अपेक्षित सुमारे दोन कोटींच्या घरात असलेल्या खर्चाची रक्कम उभी करण्यासाठी ग्रामस्थांनी त्याच्या शेतातील ऊस उत्पादनातून प्रतिटन २५ ते ४० रूपये मंदिराच्या उभारणीसाठी दिले. तसेच संबंध महाराष्ट्रातील भाविकांनीही मंदीराच्या जिर्णाेद्धारासाठी सढळ हस्ते मदत केली.  मंदिर परिसरात निवासस्थानची सोय नाही. त्यामुळे परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. मंदी परीसरात स्वच्छताही ठेवली जात नाही. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदिकरण करणेही गरजेचे आहे. तसेच परिसरात वाहनतळाची व्यवस्था करावी. उन्हात तसेच पावसात दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना दर्शनमार्गात शेडची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मंदिर परिसरातील वाढलेली झुडपे-गवत काढून बगिचा करण्यात यावा, अशा मागण्या भाविकांकडून होत आहेत़ तसेच मंदिर आवारात सी़ सी़ टी. व्ही. बसविणेही आवश्यक आहे. ऐतिहासिक वारसा जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टबरोबरच प्रशासनानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. कायम सुरक्षा रक्षकाची गरजमंदीराचा जिर्णाेद्धार झाल्यामुळे येथील रूपडेच पालटल्याचे सध्या दिसून येत आहे. मात्र, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अद्यापही म्हणाव्या तशा सोयीसुविधा मिळत नाहीत. येथे सेवकांचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारीही उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसरात येत असलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरुप रक्षक नेमण्याची गरज आहे.