शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

चाळीस वर्षांनंतर मंदिरं उघड्यावर!

By admin | Updated: May 31, 2016 00:33 IST

कोयनेच्या इतिहासातील भीषण चित्र : शिवसागर जलाशयात जिथं फिरायच्या बोटी, तिथं आता पायी चालतायत माणसं -- आॅन दि स्पॉट --रिपोर्ट

सागर चव्हाण -- पेट्री  -कोयना धरणाच्या निर्मितीपासून यंदा प्रथमच शिवसागर जलाशयात कमालीची घट झाली आहे. ज्या जलाशयातून लोक लाँचने ये-जा करत होते, तिथं आता जलाशयाच्या भेगाळलेल्या जमिनीवरून लोक चालत जातानाचे दृश्य पाहायला मिळत आहे. एवढे नव्हे १९९४ आणि २०१४ मध्येही पाणी कमी झाल्यामुळे जलाशयातील मंदिर उघडी पडली होती, मा यंदा पाणी एवढे कमी झाले आहे की, गेल्या चाळीस वर्षांपासूनची ग्रामदैवतांची मंदिरं पूर्णपणे उघडी पडली आहेत.सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ तसेच मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या तापोळ्यासह आजूबाजूच्या परिसरात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचे पाणी पसरले आहे. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी तसेच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने व अवकाळी पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने तुलनेत पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. यंदा केवळ ६७ टक्के एवढाच पाणीसाठा नदीपात्रात होता. परिणामी येथील बहुतांशी सर्वच ठिकाणी पाण्याखाली असणारी जमीन उघड्यावर पडलेली आहे. त्यामुळे दूर दूरपर्यंत फक्त मृगजळासारखा भास होत आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बामणोलीपर्यंत (कसबे) एसटी बसेसद्वारे वाहतूक करून कांदाटी, कोयना, सोळशी खोऱ्यातील १०५ गावांचा संपर्क जिल्हा परिषदेच्या सर्व्हिस लाँचेस व खाजगी लाँचेसद्वारेच होतो. गेल्या काही आठवड्यापासून पाण्याअभावी लाँचेस बंद असून खासगी वाहनांतून काही जण प्रवास करत आहेत. तर काही गावांना पायपीट करूनच संपर्क ठेवावा लागत आहे. बहुतांशी येथील काही गावांचा संपर्क लाँचेसद्वारे होत असून पावसाळ्यात कोयनेच्या पाणीपातळीत वाढ झाल्यावर लाँच बंद ठेवावी लागत असल्यामुळे काही गावे संपर्कहीन होतात. मात्र, यंदा पाणीच नसल्यामुळे लाँच बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. त्यामुळे नागरिकांना कित्येक मैल बाजारहाट डोक्यावर घेऊन तापोळ्यातून पायपीट करावी लागत आहे. साताराहून बामणोली मार्गे तेटली, गोगवेपर्यंत जाण्यासाठी बसेसची सोय आहे.याठिकाणी पर्जन्यमान अधिक असल्याने मोठ्या स्वरूपात पाऊस पडून संपूर्ण जलाशय पाण्याने काठोकाठ व्यापलेला असतो. सध्या या जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याने पावसाळ्यात पाण्याखाली असणाऱ्या जमिनी उघड्यावर आलेल्या आहेत. यामुळे सर्व लाँचेस काठाला लागलेल्या दिसून येत आहेत. पर्यटनासाठी बहुतांशी सर्व महाबळेश्वर येथे आलेले पर्यटक पाण्याअभावी नौकाविहाराचा आनंद घेता येत नसल्याने या भागाकडे पाठ फिरवू लागले आहेत. बामणोलीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरजावळी तालुक्यातील बामणोली हे पर्यटनस्थळ सातारा शहराच्या पश्चिमेस ३५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे प्राचीन भैरवनाथ मंदिर पडलेल्या स्थितीत आहे. मंदिराचा फक्त चौथरा पाहायला मिळतो. तसेच विविध प्रकारची शिल्पे, मूर्ती, पिंड, याचे दर्शन होते. पाणी कमी झाल्यामुळे हे मंदिरही पूर्णपणे उघडे पडले आहे. यापूर्वी १९९७, २०१४ मध्ये अशी स्थिती झाली होती. पिंपरीचा शंभू महादेवबामणोलीपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर वाघळी शेंबडी येथील कांदाटी-कोयना नदीच्या संगमावर पिंपरी, ता. महाबळेश्वर येथे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिरही पडलेले आहे. धरणनिर्मिती झाल्यानंतर गाव दुसरीकडं वसलं अन् मंदिर जागेवरच राहिलं. ते पाण्याखाली गेल्यानं पडलं आहे. आता पाण्याची पातळी खालवल्यामुळे नदीपात्रातील मंदिराच्या खुणा स्पष्ट दिसू लागल्या आहेत. याठिकाणी असलेल्या महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. बोटी लागल्या किनारीशिवसागर जलाशयाचा पाणीसाठा प्रचंड प्रमाणात घटल्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटी आता किनारी लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाहतुकीसाठी काही गावांना एकमेव साधन असणाऱ्या लाँचेस बंद पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना कित्येक मैल दूर पायपीट करावी लागत आहे.२०१३-१४ च्या तुलनेत यंदा जलाशयाच्या पाण्याची पातळी अधिक खालावलेली आहे. गेल्या वर्षी पाऊस सुरू होईपर्यंत लाँचेस चालू होत्या. मात्र सध्या पर्यटनाचे नंदनवन असणाऱ्या तसेच नौकाविहाराचा आनंद देणाऱ्या या परिसरात कमी पाणीपातळी असल्याने पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद घेता येत नाही. - बाबूराव भोसले, गोगवे, सोळशी खोरेशिवसागर जलाशयाचा फुगवटा असणाऱ्या कांदाटी, कोयना, सोळशी खोऱ्यात पात्रातील बहुतांशी पाणी कमी झाले असून ठिकठिकाणी डोह तयार झाले आहेत. अशा डोहाच्या ठिकाणी पर्यटक नौकाविहार करतात. परंतु बऱ्याच ठिकाणी गाळ वर आला असून दलदलीचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे लाँच बंद ठेवाव्या लागल्या आहेत. परिणामी भेगाळलेल्या पात्रातून दीड तास पायी बामणोलीतून तापोळ्याकडे चालत जाण्याशिवाय पर्याय नाही.