शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक लागलेल्या खासगी प्रवासी गाड्यात सॅनिटायझरचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:36 IST

सातारा : कोरोनाने शिरकाव केल्यापासून गेल्या वर्षी सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद केली होती. आताही ती बंद करण्यात आली होती. ...

सातारा : कोरोनाने शिरकाव केल्यापासून गेल्या वर्षी सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद केली होती. आताही ती बंद करण्यात आली होती. तेव्हा कडक अंमलबजावणी करण्यात येत होती. आता दुसऱ्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातून वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी गाड्यांची संख्या अत्यल्प असली तरी त्यामध्ये सॅनिटायझरचा विसर पडत असल्याचे चित्र आहे. तसेच मास्क वापरण्याबाबतही सक्ती केली जात नाही.

जिल्ह्यात साधारणत: मार्चपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली. एप्रिल महिन्यात तर दररोज सरासरी दोन हजार रुग्णसंख्या वाढत होते. त्यामुळे कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. तरीही रुग्णसंख्या कमी होत नाहीत. त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद करून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाका तयार केले आहेत. त्यामुळे प्रवास करणे कमीच झाले आहे. तरीही अत्यावश्यक काम असेल तर खासगी प्रवासी बसने जाण्याचा मार्ग निवडला जातो.

सातारा जिल्ह्यातून पुणे, मुंबईला दर पंधरा मिनिटांनी एसटीच्या फेऱ्या असतात. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक या मार्गावर कमी प्रमाणात चालते. मात्र सध्या प्रवासी संख्याच कमी असल्याने एसटीची चाकं एकाच ठिकाणी थांबली आहेत. या उलट खासगी प्रवासी व्यावसायिकांचाही व्यवसाय ठप्प आहे. बँकांचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे खासगी व्यावसायिक रात्रीच्या वेळी मिळेल तसे फेऱ्या करत आहेत. ही संख्या जिल्ह्यातून खूपच कमी असली तरी कोल्हापूर, सांगली, गोवा व कर्नाटकातून येणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. त्यांचाच आधार सातारकरांना होत आहे. मात्र काळजी घेतली जात नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.

अशी आहेत आकडेवारी

रोज जाणाऱ्या सरासरी ट्रॅव्हल्स

रोज शहरात येणाऱ्या सरासरी ट्रॅव्हल्स

६०

सरासरी प्रवासीसंख्या

चौकट

प्रवासीच मारतात सॅनिटायझर

खासगी प्रवासी चालक व त्यांचे सहायक प्रवाशांना गाडी बाहेर काढताना निर्जंतुक केली जात असल्याचे सांगत असले तरी तसे होत नाही. तसेच आत आल्यानंतर प्रवाशांसाठी सॅनिटायरची सोय केलेली नसते. प्रवासीच स्वत: आसनस्थ होण्यापूर्वी स्वत: आणलेले सॅनिटायझर सीट, हॅण्डलवर मारत असतात.

चौकट :

ई-पास ना चौकशी

या काळात जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पास सक्तीचा केला आहे. मात्र कोणाकडेही प्रवासी वाहतूकदार चौकशी करत नाहीत. मात्र गाडीत बसण्यापूर्वी गाडी चेक होईल.. याची आठवण करून देतात. पण शक्यतो रात्रीच्या वेळी प्रवास करत असल्याने प्रवासी अडचणीत येणार नाहीत, याचीही काळजी घेतात.

चौकट

रोज सरासरी वीस कारवाई

सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ व कऱ्हाडजवळ तपासणी पथके तैनात केले आहेत. ते रात्रंदिवस तपासणी करत आहेत. यामधून दररोज सरासरी पंधरा ते वीस वाहनांवर कारवाई केली जाते. यामध्ये ई-पास, प्रवासी संख्येबरोबरच प्रादेशिक वाहनांच्या नियमांचा भंग केला असल्यास ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.