शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ब्रेक लागलेल्या खासगी प्रवासी गाड्यात सॅनिटायझरचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:36 IST

सातारा : कोरोनाने शिरकाव केल्यापासून गेल्या वर्षी सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद केली होती. आताही ती बंद करण्यात आली होती. ...

सातारा : कोरोनाने शिरकाव केल्यापासून गेल्या वर्षी सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद केली होती. आताही ती बंद करण्यात आली होती. तेव्हा कडक अंमलबजावणी करण्यात येत होती. आता दुसऱ्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातून वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी गाड्यांची संख्या अत्यल्प असली तरी त्यामध्ये सॅनिटायझरचा विसर पडत असल्याचे चित्र आहे. तसेच मास्क वापरण्याबाबतही सक्ती केली जात नाही.

जिल्ह्यात साधारणत: मार्चपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली. एप्रिल महिन्यात तर दररोज सरासरी दोन हजार रुग्णसंख्या वाढत होते. त्यामुळे कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. तरीही रुग्णसंख्या कमी होत नाहीत. त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद करून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाका तयार केले आहेत. त्यामुळे प्रवास करणे कमीच झाले आहे. तरीही अत्यावश्यक काम असेल तर खासगी प्रवासी बसने जाण्याचा मार्ग निवडला जातो.

सातारा जिल्ह्यातून पुणे, मुंबईला दर पंधरा मिनिटांनी एसटीच्या फेऱ्या असतात. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक या मार्गावर कमी प्रमाणात चालते. मात्र सध्या प्रवासी संख्याच कमी असल्याने एसटीची चाकं एकाच ठिकाणी थांबली आहेत. या उलट खासगी प्रवासी व्यावसायिकांचाही व्यवसाय ठप्प आहे. बँकांचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे खासगी व्यावसायिक रात्रीच्या वेळी मिळेल तसे फेऱ्या करत आहेत. ही संख्या जिल्ह्यातून खूपच कमी असली तरी कोल्हापूर, सांगली, गोवा व कर्नाटकातून येणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. त्यांचाच आधार सातारकरांना होत आहे. मात्र काळजी घेतली जात नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.

अशी आहेत आकडेवारी

रोज जाणाऱ्या सरासरी ट्रॅव्हल्स

रोज शहरात येणाऱ्या सरासरी ट्रॅव्हल्स

६०

सरासरी प्रवासीसंख्या

चौकट

प्रवासीच मारतात सॅनिटायझर

खासगी प्रवासी चालक व त्यांचे सहायक प्रवाशांना गाडी बाहेर काढताना निर्जंतुक केली जात असल्याचे सांगत असले तरी तसे होत नाही. तसेच आत आल्यानंतर प्रवाशांसाठी सॅनिटायरची सोय केलेली नसते. प्रवासीच स्वत: आसनस्थ होण्यापूर्वी स्वत: आणलेले सॅनिटायझर सीट, हॅण्डलवर मारत असतात.

चौकट :

ई-पास ना चौकशी

या काळात जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पास सक्तीचा केला आहे. मात्र कोणाकडेही प्रवासी वाहतूकदार चौकशी करत नाहीत. मात्र गाडीत बसण्यापूर्वी गाडी चेक होईल.. याची आठवण करून देतात. पण शक्यतो रात्रीच्या वेळी प्रवास करत असल्याने प्रवासी अडचणीत येणार नाहीत, याचीही काळजी घेतात.

चौकट

रोज सरासरी वीस कारवाई

सातारा जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ व कऱ्हाडजवळ तपासणी पथके तैनात केले आहेत. ते रात्रंदिवस तपासणी करत आहेत. यामधून दररोज सरासरी पंधरा ते वीस वाहनांवर कारवाई केली जाते. यामध्ये ई-पास, प्रवासी संख्येबरोबरच प्रादेशिक वाहनांच्या नियमांचा भंग केला असल्यास ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.