शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:34 IST

नितीन काळेल, सातारा : शेतीतील योगदानाबद्दल जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना राज्य शासनाने यावर्षी कृषी पुरस्कार जाहीर केला. मात्र, या पुरस्कारार्थींचा ...

नितीन काळेल, सातारा : शेतीतील योगदानाबद्दल जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना राज्य शासनाने यावर्षी कृषी पुरस्कार जाहीर केला. मात्र, या पुरस्कारार्थींचा जिल्हा परिषदेला विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारण, आतापर्यंत त्यांचा ना सन्मान झाला, ना कोणी अभिनंदन केले. आतातरी कºहाडातील कृषी प्रदर्शनात तरी या राज्य पुरस्कारार्थींचा सन्मान होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.भारत देश कृषीप्रधान आहे. देशातील ६० टक्क्यांहून अधिक जनता ही शेतीवरच अवलंबून आहे. ग्रामीण भागाचा शेती हाच प्रमुख आर्थिक कणा राहिलाय. त्यामुळे शेतीच महत्त्वाचा घटक ठरलेला आहे. शेती चांगली साधली तरच बाजारपेठेतही भरभराट असते. शेतकºयांच्या कुटुंबातही आनंद असतो. त्यामुळे शेतीक्षेत्रात योगदान देण्याºया, पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पन्न घेणाºया, इतर शेतकºयांपुढे आदर्श निर्माण करणाºया शेतकºयांचा जिल्हा परिषद तसेच राज्य शासनही गौरव करते. त्यामुळे संबंधित शेतकºयांना प्रोत्साहन मिळून त्यांच्याकडून शेतीक्षेत्रात अनेक नवनवीन पीकपद्धती पुढे येतात. यामधून इतर शेतकºयांनाही नवीन काही शिकता येते.राज्य शासनाचे दीड महिन्यापूर्वीच कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील काही शेतकºयांना हे पुरस्कार मिळालेत. हे पुरस्कार २०१७ वर्षातील असून, यामध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा कोल्हापूर कृषी विभागाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला प्रथमच मिळालाय. याबरोबरच कृषिभूषण, शेतीनिष्ठ आणि इतरही पुरस्कार जिल्ह्यातील शेतकºयांना मिळाले आहेत. या पुरस्कारामुळे जिल्हा परिषदेचे नाव राज्यस्तरावर पोहोचले आहे. मात्र, आता पुरस्कारार्थींचा सर्वांनाच विसर पडला की काय ? अशी चर्चा सुरू आहे.कºहाडमध्ये १६ वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन सुरू झाले आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन असून, याचे आयोजक कºहाडची शेती उत्पन्न बाजार समिती असलीतरी सहआयोजक राज्याचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषदही आहे. खºया अर्थाने कºहाडमधील या प्रदर्शनाततरी राज्य पुरस्कारप्राप्त शेतकºयांचा सन्मान होईल का याचीही चर्चा आहे. कारण, आतापर्यंत पुरस्कारप्राप्त शेतकºयांना जिल्हा परिषदेने गौरविले नाही. आतातरी कºहाडच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने तरी या शेतकºयांचा गौरव व्हावा, अशी अपेक्षा असणार आहे;ऐकीकडे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन घ्यायचे तर दुसरीकडे जिल्ह्णाचे नाव राज्यस्तरावर पोहोचविणाºया शेतकºयांचा विसर पडावा, हे विसंगत आहे. त्यामुळे शेतीत योगदान देणाºया व राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाºया शेतकºयांचा सत्कार कधी होणार हे पाहणेही महत्वाचे ठरले आहे.सन्मानाला आताच उशीर का ?राज्य कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकºयांचे प्रस्ताव हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच राज्यस्तरावर पाठविले होते. आता २०१७ मधील राज्यस्तरावरील कृषी पुरस्कार जाहीर होऊन दोन महिने झाले आहेत. राज्याचे पुरस्कार मिळाले त्या शेतकºयांचे जिल्हा परिषदेतील कोणी साधे अभिनंदनही केले नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. तर काही वर्षांपूर्वीच राज्यस्तर पुरस्कार मिळालेल्या शेतकºयांना कºहाडच्या याच कृषी प्रदर्शनात सन्मानित केले होते. आताच्या पुरस्कारार्थींसाठी एवढा उशीर का? असाही प्रश्न आहे.