शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
2
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
3
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
4
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
5
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
6
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
7
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
8
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
9
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
10
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
11
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
12
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
13
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
14
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
16
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
17
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
18
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
19
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
20
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?

वनसंपदा अन् वन्यजिवांची वणव्यात होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

कुडाळ : जावळीचा भूभाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला प्रदेश. या ठिकाणच्या जंगलात नानाविध दुर्मीळ वनस्पती आहेत. हा भाग शेकडो ...

कुडाळ : जावळीचा भूभाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला प्रदेश. या ठिकाणच्या जंगलात नानाविध दुर्मीळ वनस्पती आहेत. हा भाग शेकडो वन्यजिवांचे आश्रयस्थान आहे. मात्र, या डोंगरांवर वारंवार लागत असलेल्या वणव्यांमुळे येथील वनसंपदा आणि वन्यजिवांना धोका पोहोचत असून, दुर्मीळ वनस्पती नामशेष होत आहे. हा अधिवास टिकून राहावा, यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

तालुक्याचा पश्चिम भाग डोंगर-दऱ्यांनी वेढलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात वणवे लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नैसर्गिक वणव्यांपेक्षा मानवनिर्मित वणव्यांचीच चर्चा अधिक आहे. वैराटगडचा परिसर, दिवदेवचा डोंगर, कुसुंबीचा डोंगरमाथा, कास, बामणोली, आदी भागांत अनेकदा वणवे लागतात. वनविभागामार्फत या परिसरात अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत. दाट जंगलाच्या ठिकाणी वन्यप्राण्यांची राहुटी असते. येथे बिबट्या, तरस, वाघ, लांडगे, भेकर, अस्वल आदी जंगली प्राणी याठिकाणी आढळतात. वणव्यात या साऱ्यांचीच हानी होत आहे.

जावळी तालुका दुर्गम असून, या तालुक्याला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून येथील जंगलात, डोंगरमाथ्यांवर व पठारावर वणवे लावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वणवे लावणाऱ्या विघ्नसंतोषींवर वनविभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

(चौकट)

अधिवास संकटात

प्राण्यांना चराईसाठी गवताची चांगली वाढ व्हावी, शेतातील पीक बदल व्हावा म्हणून स्थानिक शेतकरी शेती भाजतात. याची झळ जंगलांना पोहोचत आहे. आगीच्या वणव्यात जंगलांची अपरिमित हानी होत आहे. यामुळे या अधिवासात राहणारे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत.

(कोट)

निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वनसंपदेची जपणूक होणे आज काळाची गरज आहे. वनविभागामार्फत वणव्याची शक्यता लक्षात घेऊन ठिकठिकाणी जाळपट्टेही काढले जातात. मात्र, मानवनिर्मित वणव्याने येथील बहुतांश वनसंपदा नष्ट होत आहे. वन्यजिवांचा अधिवास नाहीसा होत असल्याने मानवी वस्तीवर याचे दर्शन घडत आहे. यासाठी वणवा लावणाऱ्या विघातक प्रवृत्तीला आळा घालणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.

- अंकुश शिंदे, वन कर्मचारी.

फोटो : १६ वणवा