शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वनसंपदा अन् वन्यजिवांची वणव्यात होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

कुडाळ : जावळीचा भूभाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला प्रदेश. या ठिकाणच्या जंगलात नानाविध दुर्मीळ वनस्पती आहेत. हा भाग शेकडो ...

कुडाळ : जावळीचा भूभाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला प्रदेश. या ठिकाणच्या जंगलात नानाविध दुर्मीळ वनस्पती आहेत. हा भाग शेकडो वन्यजिवांचे आश्रयस्थान आहे. मात्र, या डोंगरांवर वारंवार लागत असलेल्या वणव्यांमुळे येथील वनसंपदा आणि वन्यजिवांना धोका पोहोचत असून, दुर्मीळ वनस्पती नामशेष होत आहे. हा अधिवास टिकून राहावा, यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

तालुक्याचा पश्चिम भाग डोंगर-दऱ्यांनी वेढलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात वणवे लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नैसर्गिक वणव्यांपेक्षा मानवनिर्मित वणव्यांचीच चर्चा अधिक आहे. वैराटगडचा परिसर, दिवदेवचा डोंगर, कुसुंबीचा डोंगरमाथा, कास, बामणोली, आदी भागांत अनेकदा वणवे लागतात. वनविभागामार्फत या परिसरात अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत. दाट जंगलाच्या ठिकाणी वन्यप्राण्यांची राहुटी असते. येथे बिबट्या, तरस, वाघ, लांडगे, भेकर, अस्वल आदी जंगली प्राणी याठिकाणी आढळतात. वणव्यात या साऱ्यांचीच हानी होत आहे.

जावळी तालुका दुर्गम असून, या तालुक्याला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून येथील जंगलात, डोंगरमाथ्यांवर व पठारावर वणवे लावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वणवे लावणाऱ्या विघ्नसंतोषींवर वनविभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

(चौकट)

अधिवास संकटात

प्राण्यांना चराईसाठी गवताची चांगली वाढ व्हावी, शेतातील पीक बदल व्हावा म्हणून स्थानिक शेतकरी शेती भाजतात. याची झळ जंगलांना पोहोचत आहे. आगीच्या वणव्यात जंगलांची अपरिमित हानी होत आहे. यामुळे या अधिवासात राहणारे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत.

(कोट)

निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वनसंपदेची जपणूक होणे आज काळाची गरज आहे. वनविभागामार्फत वणव्याची शक्यता लक्षात घेऊन ठिकठिकाणी जाळपट्टेही काढले जातात. मात्र, मानवनिर्मित वणव्याने येथील बहुतांश वनसंपदा नष्ट होत आहे. वन्यजिवांचा अधिवास नाहीसा होत असल्याने मानवी वस्तीवर याचे दर्शन घडत आहे. यासाठी वणवा लावणाऱ्या विघातक प्रवृत्तीला आळा घालणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.

- अंकुश शिंदे, वन कर्मचारी.

फोटो : १६ वणवा