शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

लोकसहभागातून बांधणार वनराई बंधारे

By admin | Updated: October 13, 2015 23:56 IST

विसापूर ग्रामसभेत निर्धार : जलयुक्त शिवाराच्या कामास प्रारंभ

पुसेगाव : खटाव तालुका दुष्काळी पट्यात मोडत असल्याने विसापूर हे गाव देखील अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडते. गावच्या पश्चिम, दक्षिण बाजूस डोंगर, पठार व गावओढा, रामओढा व नाले ही फार मोठी नैसर्गिक संपत्ती लाभली आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरला जावा, याकरीता महात्मा गांधी जयंती सप्ताह व जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विसापूर ग्रामपंचायत व लोकसहभागातून गावओढ्यावर वनराई बंधारा करुन कामास सुरुवात करणार आहे, अशी माहिती सरपंच सागर साळुंखे यांनी दिली.विसापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच पै. सागर साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहाला श्री हनुमान मंदिरात सुरु झाली. ग्रामपंचायत सदस्य शहाजी साळुंखे यांनी ग्रामस्थांचे स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यानंतर शितोळे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आहार कशापध्दतीने दिला जातो, याविषयी माहिती दिली. रोजगार हमी योजनेतंर्गत मजुराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे करता येते. त्यासाठी १ लाख २५ हजार रुपये तर फळबाग लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० हजार रुपये या दरम्यान निधी मिळत आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, यामुळे मजुरांना कामही मिळेल. पाणलोट कामाविषयी कृषी अधिकारी एस. के. जगदाळे माहिती दिली, ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार, तलाठी एच. आर. बाबर आरोग्य सेवक देशमुख यांनी आपआपल्या विभागाची माहिती दिली. आरसीसी गटर, पाणी पुरवठा, पाणंद रस्ते यासह विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी सरपंच सागर साळुंखे म्हणाले की, ‘यावर्षी पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी सिमेंट बंधाऱ्याच्या माध्यमातून अडविले जावे, याकरीता शासन व प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले असून त्यामध्ये विसापूरचा समावेश आहे. या योजनेतून एका सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये पाणीसाठी चांगला झाला आहे. जिल्हाधिकारी व प्रांत यांच्याकडे जलयुक्तमधून ४ सिमेंट बंधारे तसेच कृषी विभागाचे जुने ६ दगडी सिमेंट बंधारे, लघु पाटबंधारे विभागाचे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारेची दुरूती व पाझर तलावाची उंची व गळत काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून निधी मिळावा. याकरीता मागणी करणार आहे. गावातील गटतट विसरुन गावच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.’ (प्रतिनिधी)‘राजस्व’ अभियानातून दाखले देणार‘राजस्व’ अभियानातून विद्यार्थ्यांना जातीचे, डोमासाईल, दाखले, रेशनिंंगकार्डसह विविध दाखले देण्याची व्यवस्था महसूल विभागाच्या माध्यमातून केली जाईल. महात्मा गांधी जयंती सप्ताह व जलयुक्त चे औचित्य साधून यापुढील काळात लोकसहभागातून वनराई बंधारा व तलावातील गाळ काढण्याची कामे लोकवर्गणी व लोकसहभागातून केली जातील. वनराई बंधारा केला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी व युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा.