शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

लोकसहभागातून बांधणार वनराई बंधारे

By admin | Updated: October 13, 2015 23:56 IST

विसापूर ग्रामसभेत निर्धार : जलयुक्त शिवाराच्या कामास प्रारंभ

पुसेगाव : खटाव तालुका दुष्काळी पट्यात मोडत असल्याने विसापूर हे गाव देखील अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडते. गावच्या पश्चिम, दक्षिण बाजूस डोंगर, पठार व गावओढा, रामओढा व नाले ही फार मोठी नैसर्गिक संपत्ती लाभली आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरला जावा, याकरीता महात्मा गांधी जयंती सप्ताह व जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विसापूर ग्रामपंचायत व लोकसहभागातून गावओढ्यावर वनराई बंधारा करुन कामास सुरुवात करणार आहे, अशी माहिती सरपंच सागर साळुंखे यांनी दिली.विसापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच पै. सागर साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहाला श्री हनुमान मंदिरात सुरु झाली. ग्रामपंचायत सदस्य शहाजी साळुंखे यांनी ग्रामस्थांचे स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यानंतर शितोळे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आहार कशापध्दतीने दिला जातो, याविषयी माहिती दिली. रोजगार हमी योजनेतंर्गत मजुराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे करता येते. त्यासाठी १ लाख २५ हजार रुपये तर फळबाग लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० हजार रुपये या दरम्यान निधी मिळत आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, यामुळे मजुरांना कामही मिळेल. पाणलोट कामाविषयी कृषी अधिकारी एस. के. जगदाळे माहिती दिली, ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार, तलाठी एच. आर. बाबर आरोग्य सेवक देशमुख यांनी आपआपल्या विभागाची माहिती दिली. आरसीसी गटर, पाणी पुरवठा, पाणंद रस्ते यासह विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी सरपंच सागर साळुंखे म्हणाले की, ‘यावर्षी पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी सिमेंट बंधाऱ्याच्या माध्यमातून अडविले जावे, याकरीता शासन व प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले असून त्यामध्ये विसापूरचा समावेश आहे. या योजनेतून एका सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये पाणीसाठी चांगला झाला आहे. जिल्हाधिकारी व प्रांत यांच्याकडे जलयुक्तमधून ४ सिमेंट बंधारे तसेच कृषी विभागाचे जुने ६ दगडी सिमेंट बंधारे, लघु पाटबंधारे विभागाचे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारेची दुरूती व पाझर तलावाची उंची व गळत काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून निधी मिळावा. याकरीता मागणी करणार आहे. गावातील गटतट विसरुन गावच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.’ (प्रतिनिधी)‘राजस्व’ अभियानातून दाखले देणार‘राजस्व’ अभियानातून विद्यार्थ्यांना जातीचे, डोमासाईल, दाखले, रेशनिंंगकार्डसह विविध दाखले देण्याची व्यवस्था महसूल विभागाच्या माध्यमातून केली जाईल. महात्मा गांधी जयंती सप्ताह व जलयुक्त चे औचित्य साधून यापुढील काळात लोकसहभागातून वनराई बंधारा व तलावातील गाळ काढण्याची कामे लोकवर्गणी व लोकसहभागातून केली जातील. वनराई बंधारा केला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी व युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा.