शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : अन्न पाकिटावरच भागतेय भूक, साताऱ्यातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:25 IST

नितीन काळेल  सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामानिमित्त आलेले अनेकजण साताऱ्यात अडकलेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनाही खोलीतच बसावे लागले ...

ठळक मुद्देअन्न पाकिटावरच भागतेय भूक, साताऱ्यातील वास्तव २५ दिवसांपासून भाजी-भाकरी दूरच; शिक्षण, कामासाठी आलेल्यांचा प्रश्न मोठा

नितीन काळेल सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामानिमित्त आलेले अनेकजण साताऱ्यात अडकलेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनाही खोलीतच बसावे लागले आहे. मात्र, या सर्वांपुढे पोटाचा प्रश्न असून, सध्या विविध संस्थांकडून मिळणाऱ्या अन्न पाकिटावरच त्यांची गुजराण सुरू आहे. २५ दिवसांपासून त्यांना भाकरी, चपती व भाजीही मिळाली नसल्याचे वास्तव आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यापासून विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यानंतर केंद्र शासनाने लॉकडाऊनच जाहीर केला. संपूर्ण देशात संचारबंदी आहे. आता लॉकडाऊनचा दुसरा भाग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसारच काम सुरू आहे. पण, याचा फटका साताऱ्यात कामासाठी आलेल्या अनेकांना बसलाय. तसेच बाहेरच्या शहरातील विद्यार्थ्यांनाही याची चांगलीच झळ बसली आहे.पहिला लॉकडाऊन जाहीर व्हायच्या अगोदर साताऱ्यात काहीजण कामानिमित्त आले होते. लॉकडाऊननंतर त्यांना घरी जाणे जमलेच नाही. अशामधील अनेकजण हे लॉजिंगमध्ये अडकून पडले आहेत. यामधील एकजण आहेत संदीप पिसाळ. मुंबईतील रहिवासी असणारे पिसाळ हे डेंटल चेअरचे सर्व्हिसिंग, मेंटेनन्सचे काम करतात. त्यासाठी पिसाळ हे मार्च महिन्यात साताऱ्यात आले होते. लॉकडाऊन झाल्यानंतर त्यांना साताऱ्याच्या बाहेर पडताच आले नाही.

सध्या त्यांचे येथील एका लॉजिंगमध्ये वास्तव्य आहे. कंपनीच्यावतीने त्यांना सोयी सुविधा मिळत असल्यातरी जेवणाचा प्रश्न आहे. हॉटेल्स सुरू नसल्याने जेवणच मिळत नाही. सध्या साताऱ्यातील काही संस्था त्यांना दोनवेळ अन्नाचे पाकीट देत आहेत. त्यामध्ये भात, दालच्या यांचा समावेश असतो. पण, एवढ्यावर भूक भागणे तसे अवघडच आहे.

विकत घ्यायचे झाले तर काहीच मिळत नाही. त्यामुळे भाजी-भाकरी आणि चपाती त्यांच्यापासून २५ दिवस झाले दूरच आहे. अशीच स्थिती पिसाळ यांच्याबरोबर अडकलेल्या अनेक जणांची आहे. यामध्ये कोणी वृद्ध आहेत. पण, त्यांनाही लॉकडाऊनमुळे लॉजबाहेर पडणे अवघड झाले आहे. पोटाचा प्रश्न असल्याने त्यांनाही अन्न पाकिटांचाच आधार आहे.साताऱ्यातील एका कॉलेजमध्ये काही तरुणी कोर्स करतात. त्यातील एकजण रायगड जिल्ह्यातील तर दुसरी मुंबईची आहे. गेल्या २५ दिवसांपासून दोघीही रुममध्येच अडकून पडल्यात. त्यांची मेसही बंद झालीय. त्यातच रुममध्ये काही बनवायचे म्हटले तर तशी सोयही नाही. त्यामुळे त्यांनाही एका संस्थेकडून घरपोच अन्न पाकीट मिळत आहे.

या दोघींनाही पोटाची भूक मारूनच राहावे लागत आहे. जवळ पैसे असलेतरी काहीच खरेदी करता येत नाही, अशीही त्यांची स्थिती आहे. अशाप्रकारे अनेक विद्यार्थीही साताऱ्यात अडकून पडलेत. ज्यांच्यापुढे जेवणाचा प्रश्न मोठाआहे.घरी मोबाईलवरूनच संपर्क...साताऱ्यात अडकलेल्यांना आपल्या गावी जाता येत नाही. पोटाची आबाळ सुरूच आहे. पण, पर्याय नसल्याने त्यांना आहे तेथेच थांबावं लागतंय. त्यातच जवळ पैसे असूनही उपयोग होत नाही. दिवसभर एकमेकांशी गप्पा मारायच्या. अन्न पाकिटे आले की खायचे एवढेच त्यांच्या हाती आहे. तर सायंकाळच्या सुमारास मोबाईलवरून घरच्यांशी संपर्क साधला जातो. कधी-कधी व्हिडीओ कॉल केला जातो. लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत या सर्वांना साताºयातच थांबावे लागणार असल्याने त्यांनी मनाची तशी तयारीही केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर