शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

भाजपला रोखण्यासाठी आघाडी धर्म पाळा : पृथ्वीराज चव्हाण --काँगे्रसचा मुडदा पाडून आघाडी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:01 IST

‘राष्ट्रवादी काँगे्रसने मलासुद्धा सोडलेले नाही. गतवेळी त्यांनीच माझे सरकार पाडले. मला माजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरावे लागले. तरीही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला

ठळक मुद्देकºहाडात कार्यकर्त्यांचा मेळावा

कºहाड : ‘राष्ट्रवादी काँगे्रसने मलासुद्धा सोडलेले नाही. गतवेळी त्यांनीच माझे सरकार पाडले. मला माजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरावे लागले. तरीही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला रोखण्यासाठी त्यांना बरोबर घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या त्यांनी आपल्या मदतीची जाण ठेवो न ठेवो आपण मात्र आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळायचा आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.कºहाड येथे मंगळवारी सातारा जिल्ह्णातील काँगे्रस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, धैर्यशील कदम, हिंदुराव पाटील, शिवराज मोरे, डॉ. इंद्रजित मोहिते, मनोहर शिंदे, भीमराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी आजच माझी भेट घेतली. त्यांनी मदतीचा हात मागितला. त्यावेळी मी त्यांना अगोदर तुम्ही प्रमुख काँगे्रस कार्यकर्त्यांना भेटा. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात जे मळब आहे. ते दूर करा, अशी सुचना केली. त्यानंतर आम्ही मदत करणारच आहोत.’

जयकुमार गोरे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्णाच्या राजकारणात राष्ट्रवादीला सगळे चालते; पण काँगे्रसचा कार्यकर्ता चालत नाही. डीपीडीसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची युती भाजप-सेनेशी होते; पण काँगे्रसशी होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळायचा असेल तर अगोदर या आघाडीत काँगे्रस कार्यकर्त्याचं स्थान काय असणार? हे समजले पाहिजे. जातिवाद्यांना रोखण्यासाठी आघाडी गरजेची आहे; पण काँगे्रसचा मुडदा पाडून आघाडी होणार असेल तर त्या आघाडीचा काय उपयोग?’ असा सवाल त्यांनी केला.आनंदराव पाटील म्हणाले, ‘काँगे्रस कार्यकर्त्यांतील आपापसातील मतभेद दूर झाल्यावर आपण काय करू शकतो, याचा अनुभव अनेकदा घेतला आहे. त्यामुळे यापुढेही आपण मतभेद बाजूला सारून कामाला लागले पाहिजे.’

रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘जिल्ह्णाच्या राजकारणात आपली दखल घ्यावी लागेल, एवढी काँगे्रसची ताकद आहे. राष्ट्रवादीच्या मागून काँगे्रस फरफटत येणार नाही. आता आपला शत्रू बदलला असून, तो भाजप झाला आहे. त्यासाठी आघाडी धर्म जरूर पाळू; पण विधानसभेला जिल्ह्णात चार जागा काँगे्रसला मिळाल्यापाहिजेत.’मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. झाकीर पठाण यांनी आभार मानले.अगोदर राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाऊ द्याखासदार उदयनराजेंची उमेदवारी सातारा मतदारसंघातून जाहीर झाली असली तरी त्यांच्यातील धुसफूस अजून थांबलेली नाही. अगोदर सगळी राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जाऊ द्या, मग आपण त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेऊ. आता उगाच घाई करायला नको, असे मत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी या बैठकीत व्यक्त केले.

काँगे्रसच्या सहा तालुक्यांच्या कार्यकारिणी बरखास्त...सातारा जिल्ह्णातील कोरेगाव, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर, सातारा या सहा तालुक्यांतील काँगे्रस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी लवकरच कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन नवीन कार्यकारिणीचे गठण करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रणजित नाईक-निंबाळकर यांनी आपल्या भाषणात दिली. 

बाबा आमच्या पाठीवरील वळ बघाराष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय काँगे्रसच्या कार्यकर्त्यांवर नेहमीच घाव घातला आहे. ग्रामपंचायतीपासून आमदारकीपर्यंत ते कधीच कोणाला सोडत नाहीत. तेव्हा आमच्या पाठीवर उठलेले वळ जरा तुम्ही बघा आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या हाताला लकवा भरला आहे, अशी भाषा वापरणाऱ्यांबरोबर कसे वागायचे? याचा विचार तुम्हीच करा, असे मत धैर्यशील कदम यांनी यावेळी व्यक्त केले. 

लगीन ठरवा; पण याद्या करूनराष्ट्रवादीच्या नेत्यांवर विश्वास ठेवण्याची परिस्थिती सध्यस्थितीत राहिलेली नाही. तुम्ही दोन्ही पक्षांच्या आघाडीचं लगीन जरूर ठरवा; पण त्याच्या याद्या करून घेऊनच. मानपान दोघांना समान राहील, असा याद्यात उल्लेख करा, असे मत अजितराव पाटील-चिखलीकर यांनी व्यक्त करताच उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर