शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा : सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

फलटण : ‘हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, कीड रोग व नैसर्गिक आपत्तीशी सामना करताना शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत ...

फलटण : ‘हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, कीड रोग व नैसर्गिक आपत्तीशी सामना करताना शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा कष्टकरी व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा,’ अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे.

काळज, ता. फलटण येथील पेरु बागांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी फलटण तालुक्यातील गिरवी, निरगुडी येथील द्राक्ष, डाळींब बागा, शेवगा शेती व शेत तळ्यातील मत्स्य शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य रामदास कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग व शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.

निरगुडी येथे भानुदास जगन्नाथ तावरे यांच्या सुमारे १७ एकर क्षेत्रातील द्राक्ष बागेची पाहणी द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन, मिळणारा बाजारभाव याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. त्यानंतर गिरवी फलटण येथे प्रगतशील शेतकरी रामदास कदम यांच्या द्राक्ष बाग, शेवगा शेती, शेत तळ्यातील मत्स्य शेती या प्रकल्पांची पाहणी करून तेथील उत्पादन, बाजार पेठ, नैसर्गिक आपत्तीमधून पिके वाचविण्यासाठीच्या उपाय योजना याबाबत सविस्तर माहिती घेतली. अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

द्राक्ष व इतर फळ पिकांसाठी अच्छादन करताना वापरण्यात येणारे कागद व त्यासाठी उभारावा लागणारा लोखंडी सांगाडा ही खर्चिक बाब असल्याने त्यासाठी शासकीय अनुदान मिळावे, अशी मागणी यावेळी रामदास कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

फोटो : १२ नसीर शिकलगार

फलटण तालुक्यातील काळज येथील शेतीची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाहणी केली. यावेळी भाऊसाहेब काटे, ब्रम्हदेव दुधाळ, उमेश निंबाळकर, गजानन ठोंबरे, रामदास कदम उपस्थित होते.