शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

पाच रुपये किलो दर निघाल्याने टोमॅटो रस्त्यावर : उत्पादनाचा खर्चही निघेना; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 20:41 IST

मात्र, निसर्गाने पुन्हा घात केला अन् नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यात सलग पंधरा दिवस पडत असलेल्या पावसाने भाजीपाला आणि फळबागांचे अतोनात नुकसान केले. काढणीस आलेला कांदा शेतातच सडला.

सातारा : राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्रमी दरवाढ झाल्याने सर्वत्र महागाईची चर्चा होत आहे. दोन महिन्यांतील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना त्यातून उभारी घेताच मागील काही दिवसांमध्ये बाजारात टोमॅटोची आवक वाढली. सोमवारी सातारा बाजार समितीमध्ये ७० क्विंटल आवक झाल्याने टोमॅटोची तीन ते पाच रुपये किलोने विक्री झाली. बाजारात टोमॅटो आणण्याचा खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून दिला.

 

सातारा जिल्'ामध्ये आॅगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कºहाड आदी तालुक्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कृष्णा, कोयना नद्यांना पूर आल्याने नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे भाजीपाल्याची पिके कुजल्याने बागायतदार शेतक-यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याचवेळी खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण, खटावमध्ये एक चांगली संधी म्हणून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. मात्र, निसर्गाने पुन्हा घात केला अन् नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यात सलग पंधरा दिवस पडत असलेल्या पावसाने भाजीपाला आणि फळबागांचे अतोनात नुकसान केले. काढणीस आलेला कांदा शेतातच सडला.

या संकटात खचतील ते शेतकरी कसले. त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली. हजारो रुपयांची रासायनिक खते आणि औषधांचा वापर करून भाजीपाल्याच्या बागा जगविल्या. टोमॅटो उत्पादकांना तर अच्छे दिनची स्वप्ने पडू लागली. त्यासाठी त्यांनी जीवतोड मेहनत घेतली. बाजारात कांदा आणि इतर भाजीपाल्यास विक्रमी दर मिळू लागले. सुरुवातीला काही दिवस टोमॅटोला १५ ते २० रुपये दर मिळत होता; पण ही परिस्थिती जास्त दिवस टिकली नाही. आवक वाढल्याने बाजार गडगडू लागे अन् दर २ ते ५ रुपयांवर येऊन ठेपले. त्यामुळे उत्पादन खर्च सोडा, साधा वाहतूक आणि हमालीचा खर्चही निघेनासा झाला आहे. अच्छे दिनच्या अपेक्षेने लाखो रुपये खर्च करून फुलवलेली टोमॅटोची बाग आज अशीच सोडावी लागत आहे. अनेकांनी टोमॅटोला दर न मिळाल्याने ते रस्त्यावर टाकले आहेत.

  • कर्जबाजारी शेतक-यांच्या पाठी वसुलीचा तगादा

टोमॅटो आणि भाजीपाल्याच्या बागा पावसात भिजल्याने फळावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करून त्या जगविल्या; पण आज बाजारात शेतमाल मातीमोल ठरत आहे. पावसाने शेतक-याचे जे अतोनात नुकसान झाले असून, त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबेना. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांच्या पाठीमागे बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे.

 

बाजार समित्यांमध्ये जो काही उच्चांकी भाव मिळतो, तो मोजक्या व चांगल्या प्रतिच्या टोमॅटोला; पण चर्चा होते ती सरसकटच्या उच्चांकी दराची. टोमॅटो घसरला असून, दोन ते सहा रुपये किलोला दर दिला जात आहे. शेतातून बाजार समितीमध्ये टोमॅटो वाहून आणण्याचा खर्चही निघत नाही, अशी ही स्थिती आहे. लागवड खर्च व वाहतूक खर्च लाखोत आहे.-रामचंद्र यादव, उत्पादक शेतकरी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीMarketबाजार