शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाचशे ग्रामस्थांकडे शौचालय नसूनही गाव हागणदारीमुक्त

By admin | Updated: March 27, 2017 12:07 IST

यशवंतनगर ग्रामपंचायत : भीमनगर ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; उपोषणाचा इशारा

आॅनलाईन लोकमतवाई : यशवंतनगर ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाली असून, तशा आशयाचा मोठा फ्लेक्सबोर्ड ग्रामपंचायतीच्या वतीने यशवंतनगर परिसरात लावण्यात आला आहे. यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या भीमनगरमधील पाचशे ग्रामस्थांकडे ना स्वत:चे शौचालय आहे, ना सार्वजनिक शौचालय आहे, ते आजही उघड्यावर शौचालयासाठी बसतात मग यशवंतनगर ग्रामपंचायत हागणदारीमुक्त कशी, असा प्रश्न उपस्थित करीत यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या भीमनगर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हागणदारीमुक्त घोषित करण्याला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, हागणदारीमुक्तीचा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास भीमनगर ग्रामस्थ तीव्र आंदोलन करून ग्रामपंचायती समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.निवेदनात असेही म्हटले आहे की, यशवंतनगर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाल्याचे कारण पुढे करत, ग्रामस्थांवर अनेक निर्बंध लादून दंड आकारण्यासाठी ग्रामस्थांना नाहक त्रास देण्याचा कुटील डाव सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यांनी आखला आहे. हागणदारीमुक्त ग्रामपंचायत आहे याचा खोटा दाखला देऊन पुरस्कार मिळवून शासनाकडून सन्मान व बक्षीस लाटण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. भीमनगर ग्रामस्थ हे कदापिही होऊ देणार नाहीत. उघड्यावर शौचास बसल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र येथील चारशे-पाचशे लोकांनी शौचालयास जावे कोठे? हाच मोठा प्रश्न आहे. याची स्वत: ग्रामपंचायतीने पाहणी करावी. उघड्यावर शौच करणाऱ्यांचे रेशनिंगकार्ड व मतदार ओळखपत्र रद्द करण्यात यावे, असे निर्देश सरकारने ग्रामपंचायतीला दिले असताना, ग्रामपंचायतीने भीमनगर ग्रामस्थांसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. ग्रामपंचायातीने भीमनगरमधील रहिवाशांसाठी शौचालयाची स्वत: व्यवस्था करावी, खोटी माहिती पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन करून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर बापूसाहेब शिंदे, दादासाहेब काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, लक्ष्मण भोसले यांच्यासह पाचशे ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)