शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

राज्यात साडेपाच हजार किडनी, तर १ हजार जण यकृताच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST

दीपक शिंदे सातारा : मानवासाठी प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. मृत्यूनंतर आपला अवयव एखाद्याच्या जीवनाला उभारी देणारा ठरला तर जीवन ...

दीपक शिंदे

सातारा : मानवासाठी प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. मृत्यूनंतर आपला अवयव एखाद्याच्या जीवनाला उभारी देणारा ठरला तर जीवन सार्थक होईल. सध्या राज्यात ५ हजार ४८७ जणांना किडनीची, तर १०९५ जणांनी यकृताची आवश्यकता आहे. १९ जण फुप्फुसाच्या, तर ८९ जण हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. आज नाही तर उद्या एखादा अवयव मिळेल म्हणून अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात चकरा मारतात.

दररोज उगवणारा दिवस अनेक पालकांसाठी नवी आशा घेऊन उगवत असतो. आज नाही तर उद्या अवयव मिळेल या प्रतीक्षेत अनेक जण आहेत. रुग्णालयातून आपल्या नातेवाइकाला अवयव मिळाला असा निरोप येण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत; पण आपल्या समाजात देहदानाऐवजी मृत्यूनंतर पंचतत्त्वात विलीन करण्याकडे अधिक कल आहे. आपले एक देहदान अनेकांसाठी जीवनदान असते याचा विचार होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

मृत व्यक्तीचे सर्वच अवयव उपयोगी येतात असे नाही. मात्र, अपघातामध्ये एखादी व्यक्ती गंभीर जखमी होऊन तिचा मेंदू मृत झाला तर तिच्या पालकांच्या संमतीने त्या व्यक्तीचे अवयव इतरांसाठी वरदान ठरू शकतात. अवयव दानामध्येही रक्तगट जुळणे आणि अवयव जुळणे महत्त्वाचे असते. त्याबरोबरच याठिकाणी कोणताही वशिला उपयोगाचा ठरत नाही. त्यामुळे सरकारी प्रतीक्षा यादीनुसार अवयव आवश्यक असलेल्या व्यक्तीला ते दिले जातात. एखादी व्यक्ती खरंच अंतिम स्टेजवर असेल तरच त्याचा प्राधान्यक्रम लागतो. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होत असते. तोपर्यंत अनेकांना अवयवाच्या प्रतीक्षेत जीवही गमवावा लागतो. त्यासाठी अवयवदान ही एक चळवळ होणे आवश्यक आहे. काही सामाजिक संस्था यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांना समाजाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

कोट

अवयव प्रत्यारोपनापूर्वी आणि प्रत्यारोपनानंतर दोन्ही वेळेस रुग्णांची मानसिक तयारी करावी लागते. जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याला काही अंशी यशही येत आहे. तरीदेखील राज्य आणि देशभरात अनेक ठिकाणी अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते.

धीरज गोडसे,

संस्थापक, कोमल न्यू लाइफ फाउंडेशन, सातारा

चौकट

अवयवांसाठी प्रतीक्षेत असलेले लोक

किडनी - ५४८७

यकृत - १०९५

हृदय - ८९

फुप्फुस - १९

स्वादुपिंड - ४८

छोटे आतडे - ५