शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

पहिले शहीद अपशिंगेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:19 PM

प्रगती जाधव- पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील २५४ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील मुगुटराव भोसले यांना १५ मार्च १९४१ रोजी देशसेवा बजावताना वीरमरण आहे. देशासाठी हुतात्मा झालेले ते पहिले सातारकर आहेत.सातारा जिल्ह्याला शूरांची मोठी परंपरा आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे ...

प्रगती जाधव- पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील २५४ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील मुगुटराव भोसले यांना १५ मार्च १९४१ रोजी देशसेवा बजावताना वीरमरण आहे. देशासाठी हुतात्मा झालेले ते पहिले सातारकर आहेत.सातारा जिल्ह्याला शूरांची मोठी परंपरा आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावात प्रत्येक घरात एक सैनिक जन्माला येतो. लहानपणापासूनच गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फौजेत जाण्याचे बाळकडू दिले जाते. पणजोबांचा वारसा तिसरी पिढी फौजेत दाखल होऊन चालविला जातो, अशी शेकडो घरं मिलिटरी अपशिंगेमध्ये आढळतात. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक सैनिक अपशिंगे गावाने दिल्यामुळे या गावाला मिलिटरी अपशिंगे असे नाव पडले आहे. गावात ठिकठिकाणी तरुणांसाठी प्रेरणास्थाने म्हणून फौजेत शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने येथे जतन करण्यात आल्या आहेत.देशासाठी जिल्ह्यातून पहिले बलिदान दिले ते मुगुटराव भोसले यांनी. त्यानंतर साताऱ्यातील तुकाराम सीताराम मोरे यांना २८ जुलै १९४१ रोजी, कोरेगाव तालुक्यातील बोबडेवाडी येथील मारुती जाधव यांना २२ मे १९४४, सातारा तालुक्यातील सोनगाव येथील खाशाबा जाधव यांना १६ जून १९४४, सातारा तालुक्यातील निगडी येथील अंतू देवकर यांना ११ मार्च १९४५, सातारा तालुक्यातील भरतगाववाडी येथील रघुनाथ जाधव यांना २८ आॅक्टोबर १९४५, खटाव तालुक्यातील अनपटवाडी येथील राजाराम घाडगे यांना २९ आॅक्टोबर १९४५ आणि खटाव तालुक्यातील कुरोली येथील महादेव फडतरे यांना १ जून १९४७ रोजी यांना वीरमरण आले.देशसेवा बजावताना दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना वीरमरण पत्करणारे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कर्नल संतोष महाडिक यांच्या नावाची नोंद आहे. शहिदांमध्ये शिपाई, हवालदार यांच्यासह लान्स नाईक आणि नाईक या पदावरील जवानांचा समावेश आहे. अद्यापही जिल्ह्यातील जवानांची संख्या वाढत गेली.सर्वाधिक शहीद सातारा तालुक्यातील...सातारा जिल्ह्यात सर्वाधिक शहीद सातारा तालुक्यातील आहेत. यातही मिलिटरी अपशिंगे येथील शहिदांची संख्या मोठी आहे. सातारा तालुक्यात ९२, कोरेगाव तालुक्यात ३०, वाई तालुक्यात ९, पाटण तालुक्यात १७, खटाव तालुक्यात ३९, कºहाड तालुक्यात २३, फलटण तालुक्यात ६, माण तालुक्यात ११, खंडाळा तालुक्यात ९ तर जावळी तालुक्यात २ जवान शहीद झाले आहेत. शहीद होणाºयांमध्ये शिपाई पदावरील जवानांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या २६ हजारांच्या घरात आहे. तर सेवेत कार्यरत असणाºया जवानांची संख्या अर्ध्या लाखाच्या सुमारास आहे. यातही मिलिटरी अपशिंगे आघाडीवर आहे.जिलेबी वाटून आंनदोत्सवसातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी मोठ्या प्रमाणावर जिलेबीची खरेदी केली जाते. परस्परांना भेटून जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम सर्वत्र जोरकसपणे सुरू असतो. देश स्वतंत्र झाला म्हणून अनेकांनी साताºयातील मुख्य चौकात मोफत जिलेबी वाटून हा आनंद साजरा केला. त्यानंतर गेली ७० वर्षे सातारकर परस्परांना जिलेबी देतात.