शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Satara: ‘जाळरेषा’ रोखणार वणव्याची धग !, वन विभागाने केले सूक्ष्म नियोजन

By संजय पाटील | Updated: February 17, 2025 17:14 IST

कऱ्हाड तालुक्यात महादेव डोंगररांगेवर विशेष लक्ष

संजय पाटीलकऱ्हाड : तालुक्यात डोंगररांगांची संख्या जास्त असून त्याठिकाणी वनसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, दरवर्षी वणव्यात या वनसंपदेला हानी पोहोचते. वृक्ष, प्राणी आणि पक्ष्यांची आश्रयस्थाने तसेच सरपटणारे जीव वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडतात. यंदा वणव्याची ही धग रोखण्यासाठी वन विभागाने सूक्ष्म नियोजन केले असून तालुक्यात १६ हजार ५०० हेक्टर वनक्षेत्रात जाळरेषा आखली जात आहे.कऱ्हाड तालुक्यातील विविध भागातील वनहद्दीत गड तसेच डोंगररांगा आहेत. या डोंगरांना उन्हाळ्यात लागणारा वणवा आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाने जाळरेषा आखण्याचे काम हाती घेतले आहे. तब्बल १६ हजार ५०० हेक्टर वनक्षेत्रात जाळ रेषा आखली जात असल्यामुळे गड व डोंगरांवरील वणवा आटोक्यात येण्यास हातभार लागणार आहे. वनहद्दीपासून पाच फुट नागरी वस्तीच्या दिशेने सर्व गड आणि डोंगरांच्या कडांवर ही जाळरेषा काढली जात आहे. त्यामुळे डोंगरांवरील औषधी वनस्पती, इतर वृक्ष, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांची आश्रयस्थाने वाचविण्यात यश येण्याची अपेक्षा वन विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.तालुक्यातील सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्र प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीत येते. तो भाग डोंगरदऱ्यांचा व गडकोटांचा आहे. त्यामध्ये वसंतगड, सदाशिवगड, आगाशिवगड आदी ऐतिहासिक गडांसहीत अन्य डोंगररांगांचा समावेश आहे. महादेव डोंगररांग ही अत्यंत महत्त्वाची डोंगररांग आहे. या रांगेत वनविभागातर्फे मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे.

वणवा लागू नये म्हणून..

  • डोंगरालगत शेतीचा बांध जाळताना वन कार्यालयाला माहिती द्या.
  • वनात फिरायला जाताना अग्निजन्य वस्तू घेऊन जाऊ नका.
  • डोंगरात किंवा डोंगरातून जाणाऱ्या रस्त्याने सिगारेट ओढू नका.
  • कोणत्याही कारणाने आग लावण्याचा प्रयत्न करू नका.

वनक्षेत्र का महत्त्वाचे ?

  • डोंगरात गवत किंवा झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात.
  • जमिनीतल्या पाणी पातळीत वाढ होऊन जलस्रोत वाढतात.
  • गवतामुळे डोंगराची माती वाहून जात नाही.
  • गवताने उन्हाची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते.
  • पशुपक्ष्यांना निवारा मिळाल्याने निसर्गचक्र सुधारते.
  • वनक्षेत्र हिरवे राहिल्यास मानव-वन्यप्राणी संघर्ष टळतो.

वणवा लावणाऱ्यास शिक्षेची तरतूदवणवा लावताना कोणी सापडल्यास त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल होतो. त्यामध्ये शिक्षेचीही तरतूद आहे. कऱ्हाडात काही महिन्यांपूर्वी एकास २० हजार रुपये दंड व कैदेची शिक्षा झाली आहे. वनसंपत्तीचे जास्त नुकसान झाल्यास जास्त शिक्षा व दंड होवू शकतो.

पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा डोंगररांगांवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. इतर झाडे झुडूपेही वाढली आहेत. वणव्यात ही वनसंपदा नष्ट होऊ नये तसेच प्राणी व पक्ष्यांना हानी पोहोचू नये, यासाठी जाळरेषा काढण्यात येत आहे  - ललिता पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforestजंगलforest departmentवनविभागfireआग