शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
4
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
5
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
6
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
7
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
8
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
9
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
10
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
11
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
12
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
13
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
14
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
15
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
16
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
17
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
18
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
19
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
20
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना आर्थिक भार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:38 IST

कुडाळ : कोरोनाच्या परिस्थितीत सामान्यांचे जीवन अतिशय हलाखीचे झाले आहे. याचा सर्वच उद्योग व्यवसायांना फटका सहन करावा लागला. ...

कुडाळ : कोरोनाच्या परिस्थितीत सामान्यांचे जीवन अतिशय हलाखीचे झाले आहे. याचा सर्वच उद्योग व्यवसायांना फटका सहन करावा लागला. अशा कठीण प्रसंगात शेतकऱ्यांची अवस्था मात्र फारच बिकट झाली आहे. वाढत्या महागाईने यांचे कंबरडे मोडले आहे. यातच शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या वाढलेल्या किमतीने शेतकऱ्याला आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

कोरोनाचे अस्मानी संकट, शेतमालालाही पुरेसा भाव नाही. ऊसतोडणीही झाली. मात्र, अजूनही काही कारखान्यांनी पाठवलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांना दिले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. एकीकडे कोरोनाने सर्व काही बंद. अशा परिस्थितीत जगावं की मरावं, अशी काही शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. गतवर्षीपेक्षा खतांच्या वाढलेल्या किमतीने शेतकऱ्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. सरासरी १०० ते ३०० रुपयांनी खतांच्या किमती वाढल्या आहेत. आज खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून जशी खताची किंमत ठरवली जाते, तशी शेतकऱ्याला त्यांच्या मालाची किंमत ठरवता येत नाही. मिळेल त्या भावात कमी-अधिक करत आपला माल विकावा लागतो. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. या परिस्थितीत मात्र शेतकरी पुरता भरडला जात आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात आपल्याला शेती चित्रात आणि मोबाईलमध्येच बघायची वेळ येईल.

काळ्या आईची पूजा करणारा जगाचा पोशिंदा मात्र अशा कठीण काळातही आपल्याला जीवनावश्यक धान्य, भाजीपाला देण्याचे काम करत आहे. या सर्वांसाठी पाणी, खते ही महत्त्वपूर्ण बाब आहे. निदान कोरोना काळात तरी शेतीमालासाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमतीत वाढ न करता आटोक्यात ठेवायला हव्यात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

(कोट)

आत्ताच्या कोरोना महामारी परिस्थितीत सर्व जग थांबलेले आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा कुठेही थांबलेला नाही. महाराष्ट्रातील ऊस कारखानदारांनी, शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. यातच खत उत्पादक खतांची दरवाढ करून, शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. यामुळे या कारखानदारांची मनमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही. याबाबत शेतकरी संघटनेकडून आवाज उठवला जाईल.

-कमलाकर भोसले, शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख