शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

खतांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना आर्थिक भार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:38 IST

कुडाळ : कोरोनाच्या परिस्थितीत सामान्यांचे जीवन अतिशय हलाखीचे झाले आहे. याचा सर्वच उद्योग व्यवसायांना फटका सहन करावा लागला. ...

कुडाळ : कोरोनाच्या परिस्थितीत सामान्यांचे जीवन अतिशय हलाखीचे झाले आहे. याचा सर्वच उद्योग व्यवसायांना फटका सहन करावा लागला. अशा कठीण प्रसंगात शेतकऱ्यांची अवस्था मात्र फारच बिकट झाली आहे. वाढत्या महागाईने यांचे कंबरडे मोडले आहे. यातच शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या वाढलेल्या किमतीने शेतकऱ्याला आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

कोरोनाचे अस्मानी संकट, शेतमालालाही पुरेसा भाव नाही. ऊसतोडणीही झाली. मात्र, अजूनही काही कारखान्यांनी पाठवलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांना दिले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. एकीकडे कोरोनाने सर्व काही बंद. अशा परिस्थितीत जगावं की मरावं, अशी काही शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. गतवर्षीपेक्षा खतांच्या वाढलेल्या किमतीने शेतकऱ्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. सरासरी १०० ते ३०० रुपयांनी खतांच्या किमती वाढल्या आहेत. आज खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून जशी खताची किंमत ठरवली जाते, तशी शेतकऱ्याला त्यांच्या मालाची किंमत ठरवता येत नाही. मिळेल त्या भावात कमी-अधिक करत आपला माल विकावा लागतो. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. या परिस्थितीत मात्र शेतकरी पुरता भरडला जात आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात आपल्याला शेती चित्रात आणि मोबाईलमध्येच बघायची वेळ येईल.

काळ्या आईची पूजा करणारा जगाचा पोशिंदा मात्र अशा कठीण काळातही आपल्याला जीवनावश्यक धान्य, भाजीपाला देण्याचे काम करत आहे. या सर्वांसाठी पाणी, खते ही महत्त्वपूर्ण बाब आहे. निदान कोरोना काळात तरी शेतीमालासाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमतीत वाढ न करता आटोक्यात ठेवायला हव्यात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

(कोट)

आत्ताच्या कोरोना महामारी परिस्थितीत सर्व जग थांबलेले आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा कुठेही थांबलेला नाही. महाराष्ट्रातील ऊस कारखानदारांनी, शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. यातच खत उत्पादक खतांची दरवाढ करून, शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. यामुळे या कारखानदारांची मनमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही. याबाबत शेतकरी संघटनेकडून आवाज उठवला जाईल.

-कमलाकर भोसले, शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख