शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

अडगळीतील ओढ्यांवर आता फिल्टर !

By admin | Updated: August 6, 2015 00:40 IST

सातारा पालिकेचा उपक्रम : आराखडा तयार; ओढ्यांना मिळणार नवसंजीवनी, अतिक्रमणाचा प्रश्नही निघणार निकाली

दत्ता यादव / सातारा सातारा : ‘स्वच्छ आणि सुंदर सातारा’ होण्यासाठी पालिका प्रशासन विविध मार्ग अवलंबत असताना आता शहरातील अडगळीत असलेल्या चार ओढ्यांचे सुशोभीकरण करण्याबरोबरच या ओढ्यांवर फिल्टर बसविण्यात येणार आहेत. भविष्यात हे ओढे एखाद्या धबधब्यासारखे दिसणार असून, ओढ्यांचा उपयोग कचरा टाकण्यासाठी न होता, पर्यावरण संतुलनासाठी व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. येत्या काही दिवसांत या कामाला सुरुवात होऊन असे अगळे-वेगळे ओढे सातारकरांना पाहायला मिळणार आहेत. एलईडी सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सातारा पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याची संधी मिळाली आहे. ‘स्वच्छ आणि सुंदर सातारा,’ होण्यासाठी अनेक चांगल्या योजना आखल्या जात आहेत. साताऱ्यातील ओढ्यांची समस्या फार पूर्वीपासून बिकट आहे. पावसाळ्यात ओढे तुंबत असल्यामुळे काहीच्या घरात पाणी जाण्याचेही प्रकार घडत आहेत. शहराची भौगोलिक रचना पाहता मुख्य चार ओढ्यांचा प्रवाह शहरातून बाहेर जात आहे. अनेक घरे ओढ्यांच्या काठी वसली आहेत, तर काही घरे चक्क ओढ्यांवर वसविण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकदा नागरिक ओढ्यामध्ये कचरा टाकतात. परिणामी आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत होता. तसेच अस्वच्छेमुळे ओढ्याच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतींना हे मारक ठरत आहे. त्यामुळे सजीवांना फिल्टर केलेले पाणी तर मिळेलच; शिवाय नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवणार नाहीत.