शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:37 IST

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात यांना देण्यात आले ...

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात यांना देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, संजय सत्रे, राहुल संकपाळ, चंद्रकांत बामणे, अनिल कांबळे, संभाजी चव्हाण, समाधान खरात यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, कऱ्हाड-चिपळूण महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले असून, खड्डे पडले आहेत. कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. नियोजनशून्य कारभारामुळे महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून अनेकांचे नाहक बळी गेले आहेत.

महामार्गाचे काम मंजूर होऊन हे काम पूर्ण करण्याचा कालावधी ११ जुलै २०१७ ते १० जुलै २०१९ असा होता. मात्र, संबंधित विभागाने आणखी १९ महिन्यांचा कालावधी वाढवून कसा दिला? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम अर्धवट सोडून ही कंपनी जात असेल, तर या कंपनीवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असेही निवेदनात म्हटले आहे.