शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

शेंद्रेत ग्रामविकास पॅनेलविरुद्ध अजिंक्य पॅनेलमध्ये अटीतटीची लढत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

शेंद्रे : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान गावा-गावात सुरू आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे जिल्हा परिषद गटातील राजकीयदृष्या संवेदनशील असलेल्या शेंद्रे ...

शेंद्रे : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान गावा-गावात सुरू आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे जिल्हा परिषद गटातील राजकीयदृष्या संवेदनशील असलेल्या शेंद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनेल विरुद्ध अजिंक्य पॅनेल यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’ रंगली आहे. १३ सदस्य असलेल्या शेंद्रे ग्रामपंचायतीत २६ अर्ज शिल्लक राहिल्याने दोन्ही पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शेंद्रे हे जिल्हा परिषद गटातील सर्वात जास्त मतदान असलेले गाव असल्याने या निवडणुकीवर संपूर्ण जिल्हा परिषद शेंद्रे गटाचे लक्ष असते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंद्रे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. ग्रामविकास पॅनेलमार्फत प्रभाग क्रमांक एकमधून दीपाली संजय माने, बापूसाहेब रामचंद्र पोतेकर, कोमल विशाल विभुते. वाॅर्ड दोनमध्ये सारिका संभाजी बर्गे, पाकीजा यासीन मुलाणी, मारुती रामचंद्र पडवळ, वाॅर्ड तीनमध्ये सुरेखा सुरेश घोलप, विजय रामचंद्र जाधव, वाॅर्ड चारमध्ये भानुदास विष्णू विभुते, निर्मला विजय पोतेकर, विष्णू ज्योती जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच अशोकराव मोरे विचार मंचचे अजिंक्य पॅनेलमधून वाॅर्ड एकमध्ये मनीषा दत्तात्रय क्षीरसागर, सागर बाळकृष्ण पोतेकर, स्वाती स्वप्निल पडवळ, वाॅर्ड दोनमध्ये नंदिनी किशोर भोसले, सुरेखा राजेंद्रकुमार दीक्षित, हणमंत श्रीरंग पडवळ, वाॅर्ड तीनमध्ये पूनम सोमनाथ जाधव, श्रीरंग लक्ष्मण वाघमारे, वाॅर्ड चारमधून रेखा सुनील पडवळ, आस्लम हुसेन मुलाणी, सोपान शिवाजी भोसले या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

चौकट :

वॉर्ड चारच्या निकालावर सत्तेचे गणित

शेंद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत तीन सदस्य असलेल्या वॉर्ड चारवर ज्या गटाचे वर्चस्व राहणार, त्या गटाच्या ताब्यात ग्रामपंचायतीची सत्ता जाणार, याची दाट शक्यता आहे. या वॉर्डात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीचे मतदान जास्त आहे.

चौकट :

दोन्ही राजेंची भूमिका तटस्थ

या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांचे कार्यकर्ते दोन्ही पॅनेलमध्ये विभागले असल्याने दोन्ही राजे या निवडणुकीत कोणत्याही गटाला ताकद न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत कोणताही गट विजयी झाला तरी दोन्हीही गट आमदार व खासदार यांचेच नेतृत्व मानणारे आहेत.