शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

शेंद्रेत ग्रामविकास पॅनेलविरुद्ध अजिंक्य पॅनेलमध्ये अटीतटीची लढत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

शेंद्रे : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान गावा-गावात सुरू आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे जिल्हा परिषद गटातील राजकीयदृष्या संवेदनशील असलेल्या शेंद्रे ...

शेंद्रे : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान गावा-गावात सुरू आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे जिल्हा परिषद गटातील राजकीयदृष्या संवेदनशील असलेल्या शेंद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनेल विरुद्ध अजिंक्य पॅनेल यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’ रंगली आहे. १३ सदस्य असलेल्या शेंद्रे ग्रामपंचायतीत २६ अर्ज शिल्लक राहिल्याने दोन्ही पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शेंद्रे हे जिल्हा परिषद गटातील सर्वात जास्त मतदान असलेले गाव असल्याने या निवडणुकीवर संपूर्ण जिल्हा परिषद शेंद्रे गटाचे लक्ष असते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंद्रे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. ग्रामविकास पॅनेलमार्फत प्रभाग क्रमांक एकमधून दीपाली संजय माने, बापूसाहेब रामचंद्र पोतेकर, कोमल विशाल विभुते. वाॅर्ड दोनमध्ये सारिका संभाजी बर्गे, पाकीजा यासीन मुलाणी, मारुती रामचंद्र पडवळ, वाॅर्ड तीनमध्ये सुरेखा सुरेश घोलप, विजय रामचंद्र जाधव, वाॅर्ड चारमध्ये भानुदास विष्णू विभुते, निर्मला विजय पोतेकर, विष्णू ज्योती जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच अशोकराव मोरे विचार मंचचे अजिंक्य पॅनेलमधून वाॅर्ड एकमध्ये मनीषा दत्तात्रय क्षीरसागर, सागर बाळकृष्ण पोतेकर, स्वाती स्वप्निल पडवळ, वाॅर्ड दोनमध्ये नंदिनी किशोर भोसले, सुरेखा राजेंद्रकुमार दीक्षित, हणमंत श्रीरंग पडवळ, वाॅर्ड तीनमध्ये पूनम सोमनाथ जाधव, श्रीरंग लक्ष्मण वाघमारे, वाॅर्ड चारमधून रेखा सुनील पडवळ, आस्लम हुसेन मुलाणी, सोपान शिवाजी भोसले या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

चौकट :

वॉर्ड चारच्या निकालावर सत्तेचे गणित

शेंद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत तीन सदस्य असलेल्या वॉर्ड चारवर ज्या गटाचे वर्चस्व राहणार, त्या गटाच्या ताब्यात ग्रामपंचायतीची सत्ता जाणार, याची दाट शक्यता आहे. या वॉर्डात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीचे मतदान जास्त आहे.

चौकट :

दोन्ही राजेंची भूमिका तटस्थ

या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांचे कार्यकर्ते दोन्ही पॅनेलमध्ये विभागले असल्याने दोन्ही राजे या निवडणुकीत कोणत्याही गटाला ताकद न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत कोणताही गट विजयी झाला तरी दोन्हीही गट आमदार व खासदार यांचेच नेतृत्व मानणारे आहेत.