शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कऱ्हाड तालुक्यातील तब्बल पन्नास गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

कऱ्हाड : वीजबिल थकल्यामुळे महावितरणने कऱ्हाड तालुक्यातील तब्बल पन्नास गावांमधील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे संबंधित गावे ...

कऱ्हाड : वीजबिल थकल्यामुळे महावितरणने कऱ्हाड तालुक्यातील तब्बल पन्नास गावांमधील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे संबंधित गावे अंधारात चाचपडत आहेत. गत काही दिवसांपासून टप्प्याटप्प्याने हा वीज तोडणी कार्यक्रम महावितरणकडून राबविला जात असून, गावागावातून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, शासनाने ताबडतोब वीजबिले भरून पथदिवे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील सुपने, वसंतगडसह विविध गावांमधील सरपंच, उपसरपंचांनी पंचायत समिती सभापती प्रणव ताटे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

कऱ्हाड तालुक्यातील वीज तोडलेल्या गावांमधील सरपंच, उपसरपंचांनी शुक्रवारी सभापती प्रणव ताटे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवाजी पाटील, वसंतगडचे उपसरपंच अ‍ॅड. अमित नलवडे, पाडळीतील बाबासाहेब कळके, तांबवेचे माजी सरपंच जावेद मुल्ला, माजी उपसरपंच रवी ताठे, पश्चिम सुपनेचे उपसरपंच अर्जुन कळंबे उपस्थित होते.

सरपंच व उपसरपंचांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे कोट्यवधीचे वीजबिल थकल्याने महावितरणने गावोगावी पथदिव्यांची वीज तोडली आहे. वास्तविक ही वीजबिले शासनाकडून भरली जातात. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांकडून दिवाबत्ती कर रितसर वसूल केला जातो. असे असताना शासनाच्या अन्यायी कारभारामुळे गावोगावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शासनाने याआधीही ‘लॉकडाऊन’ काळातील वीजबिले माफ करण्याचे आश्वासन न पाळता घरगुती, व्यवसाय, उद्योग यांची वीज कनेक्शन तोडून कोरोनाच्या भयाण काळातही सामान्यांवर अन्याय केला आहे. आता ग्रामपंचायतींना विकासकामांच्या निधीतून बिले भरण्याचा अन्यायी आदेश काढल्याने त्याचा ग्रामीण विकासावर परिणाम होणार आहे.