शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कऱ्हाड तालुक्यातील तब्बल पन्नास गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

कऱ्हाड : वीजबिल थकल्यामुळे महावितरणने कऱ्हाड तालुक्यातील तब्बल पन्नास गावांमधील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे संबंधित गावे ...

कऱ्हाड : वीजबिल थकल्यामुळे महावितरणने कऱ्हाड तालुक्यातील तब्बल पन्नास गावांमधील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे संबंधित गावे अंधारात चाचपडत आहेत. गत काही दिवसांपासून टप्प्याटप्प्याने हा वीज तोडणी कार्यक्रम महावितरणकडून राबविला जात असून, गावागावातून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, शासनाने ताबडतोब वीजबिले भरून पथदिवे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील सुपने, वसंतगडसह विविध गावांमधील सरपंच, उपसरपंचांनी पंचायत समिती सभापती प्रणव ताटे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

कऱ्हाड तालुक्यातील वीज तोडलेल्या गावांमधील सरपंच, उपसरपंचांनी शुक्रवारी सभापती प्रणव ताटे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवाजी पाटील, वसंतगडचे उपसरपंच अ‍ॅड. अमित नलवडे, पाडळीतील बाबासाहेब कळके, तांबवेचे माजी सरपंच जावेद मुल्ला, माजी उपसरपंच रवी ताठे, पश्चिम सुपनेचे उपसरपंच अर्जुन कळंबे उपस्थित होते.

सरपंच व उपसरपंचांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे कोट्यवधीचे वीजबिल थकल्याने महावितरणने गावोगावी पथदिव्यांची वीज तोडली आहे. वास्तविक ही वीजबिले शासनाकडून भरली जातात. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांकडून दिवाबत्ती कर रितसर वसूल केला जातो. असे असताना शासनाच्या अन्यायी कारभारामुळे गावोगावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शासनाने याआधीही ‘लॉकडाऊन’ काळातील वीजबिले माफ करण्याचे आश्वासन न पाळता घरगुती, व्यवसाय, उद्योग यांची वीज कनेक्शन तोडून कोरोनाच्या भयाण काळातही सामान्यांवर अन्याय केला आहे. आता ग्रामपंचायतींना विकासकामांच्या निधीतून बिले भरण्याचा अन्यायी आदेश काढल्याने त्याचा ग्रामीण विकासावर परिणाम होणार आहे.