शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सातारा : एका एकरात पंधरा लाखांचे आले!, दुष्काळी परिस्थितीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 11:55 IST

खटाव तालुक्यातील औंध येथील एका युवा शेतकऱ्याने एका एकरावर लागण केलेल्या आले पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उत्पादित सर्व आल्याचा बाजारभावाने पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. दुष्काळी पट्ट्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देएका एकरात पंधरा लाखांचे आले!, दुष्काळी परिस्थितीवर मात औंध येथील युवा शेतकऱ्याचा अनोखा विक्रम

औंध : खटाव तालुक्यातील औंध येथील एका युवा शेतकऱ्याने एका एकरावर लागण केलेल्या आले पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उत्पादित सर्व आल्याचा बाजारभावाने पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. दुष्काळी पट्ट्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.औंध येथील उमेश गोविंद जगदाळे हे गेली अनेक वर्षे शिकूनही नोकरी न लागल्याने आपल्या घरची शेती करतात. त्यांनी या वेळेस आले पिकाची लागण केली. त्यानंतर वेळच्या वेळी लक्ष देऊन त्यांनी वर्षभर पिकाची निगा राखली. पिकास आवश्यक त्यावेळी खते, कीटकनाशके भर टाकणे, भांगलण यासह इतर मशागतीची कामे त्यांनी वेळेत केल्याने विक्रमी उत्पादन त्यांच्या पदरात पडले. मजुरांच्या टीमबरोबर अख्खं कुटुंब शेतात काम करीत असते. 

फायदा, तोटा याचा विचार पीक लागण करण्यापासूनच कोणी करू नये, आपले पीक दर्जेदार व उत्तम येण्यासाठी काय करावे, याचे नियोजन डोक्यात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही पिकास जीव लावून कष्ट केले. सुयोग्य नियोजन केले तरी माझ्यापेक्षा अनेकजण या दुष्काळी खटाव तालुक्यात विक्रमी उत्पादन घेतील.-उमेश जगदाळे, शेतकरी, औंध

 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर