शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

विजेअभावी पन्नास एकरातील पिके होरपळली

By admin | Updated: July 18, 2015 00:18 IST

बागलवाडीतील स्थिती : अधिकारी दाखवा, बक्षीस मिळवा; शेतकऱ्यांची योजना

ढेबेवाडी : वीजवितरण कंपनीच्या तळमावले येथील उपभियंत्याने शेतकऱ्यांनाच वेठीस धरल्याने सुमारे पन्नास एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दीड महिन्यापूर्वी जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी करूनही दुर्लक्ष करणारा हा अधिकारीच नुकसानीस जबाबदार असल्याचा आरोप करीत ‘अधिकारी दाखवा, बक्षीस मिळावा,’ अशी योजनाच शेतकऱ्यांनी जाहीर करून आपला संताप व्यक्त केला. काढणे- बागलवाडी, ता. पाटण येथील शेतकऱ्यांनी निवदेनाद्वारे ही माहिती दिली. यामध्ये शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, दीड महिन्यापूर्वी पेरण्या केल्या आहेत. पेरणीनंतर पावसाने दडी मारली; मात्र नदीला पाणी आहे. शेतीपंपांची योजनाही आहे. पण, वीज नसल्याने पिके अडचणीत आली आहेत. दीड महिन्यापूर्वी बागलवाडीनजीकचा ‘यदवडी’ नावाच्या शिवारात असलेला ट्रान्सफॉर्मर जळाला. याबाबतची तक्रारही आम्ही तळमावले येथील विद्युत कार्यालयात केली. दररोज हेलपाटेही मारतो; पण येथील अधिकारी नेहमीच गैरहजर असतात. याबद्दल वारंवार कार्यालयात जाऊनसुध्दा संबंधित अधिकारी भेटत नसल्याने ‘अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा,’ अशी योजनाच आम्ही जाहीर केली आहे. संबंधित ट्रान्सफॉर्मरवर काढणे-बागलवाडी येथील नऊ शेतकऱ्यांची शेतीपंपांची कनेक्शन आहेत. या योजनांद्वारे सुमारे ५० एकर क्षेत्रातील पिकांना पाणी दिले जाते. सध्या पाऊसही नाही आणि विजेअभावी योजनाही बंद असल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. ट्रान्सफॉर्मर बदलून मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आरोप केले आहेत. रणजित गायकवाड, मनोहर मदने, वसंत पाटील, सिदू तुपे, सतीश मदने आदी शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत. (वार्ताहर) बिल भरले; पण वीज नाही!ट्रान्सफॉर्मरबाबत तक्रार करण्यासाठी गेलो असता, संबंधित अधिकाऱ्यांनी ‘पहिले बिले भरा; मगच ट्रान्सफॉर्मरचे बघू,’ अशी तंबी दिल्याने शेतकऱ्यांनी बिले भरली. तरीसुध्दा ट्रान्सफॉर्मर बदलून मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वाहतुकीचे पैसेही दिलेयापूर्वीही ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला होता. त्यावेळीही आम्ही तक्रार केली; मात्र तीच परिस्थिती. कोणी लक्षच देईना. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर वाहतुकीचे तीन हजार रुपये आम्हालाच द्यायला लावले. पैसे देऊन आम्ही ट्रान्सफॉर्मर बदलून घेतला होता. आता अधिकारीच भेटेनासे झालेत, असेही शेतकरी म्हणाले.