शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

विजेअभावी पन्नास एकरातील पिके होरपळली

By admin | Updated: July 18, 2015 00:18 IST

बागलवाडीतील स्थिती : अधिकारी दाखवा, बक्षीस मिळवा; शेतकऱ्यांची योजना

ढेबेवाडी : वीजवितरण कंपनीच्या तळमावले येथील उपभियंत्याने शेतकऱ्यांनाच वेठीस धरल्याने सुमारे पन्नास एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दीड महिन्यापूर्वी जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी करूनही दुर्लक्ष करणारा हा अधिकारीच नुकसानीस जबाबदार असल्याचा आरोप करीत ‘अधिकारी दाखवा, बक्षीस मिळावा,’ अशी योजनाच शेतकऱ्यांनी जाहीर करून आपला संताप व्यक्त केला. काढणे- बागलवाडी, ता. पाटण येथील शेतकऱ्यांनी निवदेनाद्वारे ही माहिती दिली. यामध्ये शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, दीड महिन्यापूर्वी पेरण्या केल्या आहेत. पेरणीनंतर पावसाने दडी मारली; मात्र नदीला पाणी आहे. शेतीपंपांची योजनाही आहे. पण, वीज नसल्याने पिके अडचणीत आली आहेत. दीड महिन्यापूर्वी बागलवाडीनजीकचा ‘यदवडी’ नावाच्या शिवारात असलेला ट्रान्सफॉर्मर जळाला. याबाबतची तक्रारही आम्ही तळमावले येथील विद्युत कार्यालयात केली. दररोज हेलपाटेही मारतो; पण येथील अधिकारी नेहमीच गैरहजर असतात. याबद्दल वारंवार कार्यालयात जाऊनसुध्दा संबंधित अधिकारी भेटत नसल्याने ‘अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा,’ अशी योजनाच आम्ही जाहीर केली आहे. संबंधित ट्रान्सफॉर्मरवर काढणे-बागलवाडी येथील नऊ शेतकऱ्यांची शेतीपंपांची कनेक्शन आहेत. या योजनांद्वारे सुमारे ५० एकर क्षेत्रातील पिकांना पाणी दिले जाते. सध्या पाऊसही नाही आणि विजेअभावी योजनाही बंद असल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. ट्रान्सफॉर्मर बदलून मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आरोप केले आहेत. रणजित गायकवाड, मनोहर मदने, वसंत पाटील, सिदू तुपे, सतीश मदने आदी शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत. (वार्ताहर) बिल भरले; पण वीज नाही!ट्रान्सफॉर्मरबाबत तक्रार करण्यासाठी गेलो असता, संबंधित अधिकाऱ्यांनी ‘पहिले बिले भरा; मगच ट्रान्सफॉर्मरचे बघू,’ अशी तंबी दिल्याने शेतकऱ्यांनी बिले भरली. तरीसुध्दा ट्रान्सफॉर्मर बदलून मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वाहतुकीचे पैसेही दिलेयापूर्वीही ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला होता. त्यावेळीही आम्ही तक्रार केली; मात्र तीच परिस्थिती. कोणी लक्षच देईना. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर वाहतुकीचे तीन हजार रुपये आम्हालाच द्यायला लावले. पैसे देऊन आम्ही ट्रान्सफॉर्मर बदलून घेतला होता. आता अधिकारीच भेटेनासे झालेत, असेही शेतकरी म्हणाले.