शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वारदान ठरणारे पावसातही तलाव कोरडेच!

By admin | Updated: September 9, 2014 23:46 IST

फलटण : गाळ काढण्याची शेतकऱ्यांची मागणी

लखन नाळे -- वाठार निंबाळकर --फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वारदान ठरणारे तालुक्यातील सर्वच पाझर तलाव, तलाव दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.फलटण तालुक्यात दुष्काळात १९७२ साली व त्यानंतर १९८० व १९८५ साली तालुक्यातील कायमदुष्काळी पट्ट्यातील ताथवडा, ढवळ, मानेवाडी, शेरेचीवाडी, खडकी, मलवडी, तरडफ, वाठार निंबाळकर, वेळोशी, दरेवाडी, जाधवनगर, दालवडी, मिरेवाडी, वाखरी, दुधेबावी, बोडकेवाडी, तिरकवाडी, सासकल, धुमाळवाडी, गिरवी आदी गावांसह आदर्की ते आंदरुढ या पट्ट्यातील सर्वच गावांमध्ये लहान-मोठे तलाव बांधण्यात आले होते. या तलावांमुळे त्या-त्या परिसरातील विहिरींना पाणीपातळी टिकून राहण्यास मदत झाली होती.मात्र, तलाव निर्मितीपासून आज अखेर त्या तलावांची दुरुस्ती न झाल्याने तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला गेला असून तलावांच्या दगड मातीच्या भिंती जीर्ण होऊन त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. परिणामी कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी तलावात पाणी येऊनही ते पाणी वाहून जाऊन तलाव कोरडा पडला जात आहे. सध्या फलटण तालुक्यात उपळवे गावापर्यंत धोम-बलकवडीचे पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पाट फाट्यांचे काम पूर्ण नसल्याने हे पाणी ठिकठिकाणी तलावांमध्ये सोडले आहे. मात्र, हे तलाव नादुरुस्त असल्याने सोडलेले पाणीही वाहून वाया जात आहे. तलाव दुरुस्त्यांबाबतचे प्रस्ताव संबंधित सर्वच गावांनी पाटबंधारे व लघू पाटबंधारे विभागांना दिले असून शासनाकडून या तलाव दुरुस्ती कामांची दखल घेऊन तातडीने तलाव दुरुस्ती करण्याची मागणी तलावाचा लाभ मिळणारे सर्व गावातील शेतकरी करीत आहेत. काही ंिठकाणी टॅँकरने पाणीपुरवठाफलटण तालुक्याच्या बहुतांश ठिकाणी गेली काही दिवस टॅँकरने पाणीपुरवठा सुरू होता. धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये पाणी सोडल्याने सध्या काही ठिकाणचा पाणी प्रश्न मिटला आहे. वेळोशी, सावंतवाडी या ठिकाणी सुरू असणारे टॅँकर बंद करण्यात आले आहेत. मात्र, दरेचीवाडी, ठाकुरकी-गोळेगाव या ठिकाणी अजुनही पाणीटंचाई जाणवत असल्याने दररोज अडीच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळा संपला तरी पाण्यासाठी परवड सुरू असल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. १९६० साली सासकल गावच्या हद्दीत मोठा तलाव ओढ्यावर बांधण्यात आला. त्यामुळे भाडळी, सासकल, सोनवडी, तिरकवाडी, झिरपवाडी आदी गावांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना कायम पाणी राहात होते. मात्र, गेली १५-२० वर्षांपूर्वी तलावाची भिंत जीर्ण होऊन वाहून गेली असल्याने आता कितीही मोठा पाऊस झाला तरी तलावात पाणी थांबत नाही.- मोहनदादा डांगे , ज्येष्ठ नागरिकवाखरी-वाठार निंबाळकर, शेरेवाडी व ढवळ या गावांना वरदान ठरणाऱ्या वाखरी तलावांची दुरवस्था झाली असून तलाव दुरुस्ती झाल्यास आमचा शेती पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात तरी मार्गी लागेल.- रामभाऊ ढेकळे, शेतकरी