शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वारदान ठरणारे पावसातही तलाव कोरडेच!

By admin | Updated: September 9, 2014 23:46 IST

फलटण : गाळ काढण्याची शेतकऱ्यांची मागणी

लखन नाळे -- वाठार निंबाळकर --फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वारदान ठरणारे तालुक्यातील सर्वच पाझर तलाव, तलाव दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.फलटण तालुक्यात दुष्काळात १९७२ साली व त्यानंतर १९८० व १९८५ साली तालुक्यातील कायमदुष्काळी पट्ट्यातील ताथवडा, ढवळ, मानेवाडी, शेरेचीवाडी, खडकी, मलवडी, तरडफ, वाठार निंबाळकर, वेळोशी, दरेवाडी, जाधवनगर, दालवडी, मिरेवाडी, वाखरी, दुधेबावी, बोडकेवाडी, तिरकवाडी, सासकल, धुमाळवाडी, गिरवी आदी गावांसह आदर्की ते आंदरुढ या पट्ट्यातील सर्वच गावांमध्ये लहान-मोठे तलाव बांधण्यात आले होते. या तलावांमुळे त्या-त्या परिसरातील विहिरींना पाणीपातळी टिकून राहण्यास मदत झाली होती.मात्र, तलाव निर्मितीपासून आज अखेर त्या तलावांची दुरुस्ती न झाल्याने तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला गेला असून तलावांच्या दगड मातीच्या भिंती जीर्ण होऊन त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. परिणामी कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी तलावात पाणी येऊनही ते पाणी वाहून जाऊन तलाव कोरडा पडला जात आहे. सध्या फलटण तालुक्यात उपळवे गावापर्यंत धोम-बलकवडीचे पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पाट फाट्यांचे काम पूर्ण नसल्याने हे पाणी ठिकठिकाणी तलावांमध्ये सोडले आहे. मात्र, हे तलाव नादुरुस्त असल्याने सोडलेले पाणीही वाहून वाया जात आहे. तलाव दुरुस्त्यांबाबतचे प्रस्ताव संबंधित सर्वच गावांनी पाटबंधारे व लघू पाटबंधारे विभागांना दिले असून शासनाकडून या तलाव दुरुस्ती कामांची दखल घेऊन तातडीने तलाव दुरुस्ती करण्याची मागणी तलावाचा लाभ मिळणारे सर्व गावातील शेतकरी करीत आहेत. काही ंिठकाणी टॅँकरने पाणीपुरवठाफलटण तालुक्याच्या बहुतांश ठिकाणी गेली काही दिवस टॅँकरने पाणीपुरवठा सुरू होता. धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये पाणी सोडल्याने सध्या काही ठिकाणचा पाणी प्रश्न मिटला आहे. वेळोशी, सावंतवाडी या ठिकाणी सुरू असणारे टॅँकर बंद करण्यात आले आहेत. मात्र, दरेचीवाडी, ठाकुरकी-गोळेगाव या ठिकाणी अजुनही पाणीटंचाई जाणवत असल्याने दररोज अडीच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळा संपला तरी पाण्यासाठी परवड सुरू असल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. १९६० साली सासकल गावच्या हद्दीत मोठा तलाव ओढ्यावर बांधण्यात आला. त्यामुळे भाडळी, सासकल, सोनवडी, तिरकवाडी, झिरपवाडी आदी गावांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना कायम पाणी राहात होते. मात्र, गेली १५-२० वर्षांपूर्वी तलावाची भिंत जीर्ण होऊन वाहून गेली असल्याने आता कितीही मोठा पाऊस झाला तरी तलावात पाणी थांबत नाही.- मोहनदादा डांगे , ज्येष्ठ नागरिकवाखरी-वाठार निंबाळकर, शेरेवाडी व ढवळ या गावांना वरदान ठरणाऱ्या वाखरी तलावांची दुरवस्था झाली असून तलाव दुरुस्ती झाल्यास आमचा शेती पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात तरी मार्गी लागेल.- रामभाऊ ढेकळे, शेतकरी