शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वारदान ठरणारे पावसातही तलाव कोरडेच!

By admin | Updated: September 9, 2014 23:46 IST

फलटण : गाळ काढण्याची शेतकऱ्यांची मागणी

लखन नाळे -- वाठार निंबाळकर --फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला वारदान ठरणारे तालुक्यातील सर्वच पाझर तलाव, तलाव दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.फलटण तालुक्यात दुष्काळात १९७२ साली व त्यानंतर १९८० व १९८५ साली तालुक्यातील कायमदुष्काळी पट्ट्यातील ताथवडा, ढवळ, मानेवाडी, शेरेचीवाडी, खडकी, मलवडी, तरडफ, वाठार निंबाळकर, वेळोशी, दरेवाडी, जाधवनगर, दालवडी, मिरेवाडी, वाखरी, दुधेबावी, बोडकेवाडी, तिरकवाडी, सासकल, धुमाळवाडी, गिरवी आदी गावांसह आदर्की ते आंदरुढ या पट्ट्यातील सर्वच गावांमध्ये लहान-मोठे तलाव बांधण्यात आले होते. या तलावांमुळे त्या-त्या परिसरातील विहिरींना पाणीपातळी टिकून राहण्यास मदत झाली होती.मात्र, तलाव निर्मितीपासून आज अखेर त्या तलावांची दुरुस्ती न झाल्याने तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला गेला असून तलावांच्या दगड मातीच्या भिंती जीर्ण होऊन त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. परिणामी कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी तलावात पाणी येऊनही ते पाणी वाहून जाऊन तलाव कोरडा पडला जात आहे. सध्या फलटण तालुक्यात उपळवे गावापर्यंत धोम-बलकवडीचे पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पाट फाट्यांचे काम पूर्ण नसल्याने हे पाणी ठिकठिकाणी तलावांमध्ये सोडले आहे. मात्र, हे तलाव नादुरुस्त असल्याने सोडलेले पाणीही वाहून वाया जात आहे. तलाव दुरुस्त्यांबाबतचे प्रस्ताव संबंधित सर्वच गावांनी पाटबंधारे व लघू पाटबंधारे विभागांना दिले असून शासनाकडून या तलाव दुरुस्ती कामांची दखल घेऊन तातडीने तलाव दुरुस्ती करण्याची मागणी तलावाचा लाभ मिळणारे सर्व गावातील शेतकरी करीत आहेत. काही ंिठकाणी टॅँकरने पाणीपुरवठाफलटण तालुक्याच्या बहुतांश ठिकाणी गेली काही दिवस टॅँकरने पाणीपुरवठा सुरू होता. धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये पाणी सोडल्याने सध्या काही ठिकाणचा पाणी प्रश्न मिटला आहे. वेळोशी, सावंतवाडी या ठिकाणी सुरू असणारे टॅँकर बंद करण्यात आले आहेत. मात्र, दरेचीवाडी, ठाकुरकी-गोळेगाव या ठिकाणी अजुनही पाणीटंचाई जाणवत असल्याने दररोज अडीच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळा संपला तरी पाण्यासाठी परवड सुरू असल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. १९६० साली सासकल गावच्या हद्दीत मोठा तलाव ओढ्यावर बांधण्यात आला. त्यामुळे भाडळी, सासकल, सोनवडी, तिरकवाडी, झिरपवाडी आदी गावांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना कायम पाणी राहात होते. मात्र, गेली १५-२० वर्षांपूर्वी तलावाची भिंत जीर्ण होऊन वाहून गेली असल्याने आता कितीही मोठा पाऊस झाला तरी तलावात पाणी थांबत नाही.- मोहनदादा डांगे , ज्येष्ठ नागरिकवाखरी-वाठार निंबाळकर, शेरेवाडी व ढवळ या गावांना वरदान ठरणाऱ्या वाखरी तलावांची दुरवस्था झाली असून तलाव दुरुस्ती झाल्यास आमचा शेती पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात तरी मार्गी लागेल.- रामभाऊ ढेकळे, शेतकरी