शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर खत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नावीण्यपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील बळीराजाला यावर्षीच्या खरीप हंगामातही बांधावरच खते पुरविण्यात येणार ...

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नावीण्यपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील बळीराजाला यावर्षीच्या खरीप हंगामातही बांधावरच खते पुरविण्यात येणार आहेत. याची सुरुवातही जिल्ह्यातील काही तालुक्यांत झाली आहे. यासाठी शेतकरी गटांना मागणी करून नोंदणी करावी लागत आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम घेण्यात येतो. सर्व ११ तालुक्यांत मिळून सर्वसाधरणपणे खरिपाचे क्षेत्र हे साडेतीन लाख हेक्टरहून अधिक असते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन घेण्यात येते. याचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टरवर असते. याच्या खालोखाल भाताचे अंदाजे ५० हजार, बाजरी ५० हजारांवर आणि भुईमुगाचे ४० हजार हेक्टरच्या आसपास असते. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर कृषी विभागाने खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. काही प्रमाणात खत आणि बियाणेही उपलब्ध झालेले आहे. मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे.

कृषी विभागाचे खत आणि बियाणांचे नियोजन झाले आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना बांधावर खते देण्यात आली होती. आताही त्याचपद्धतीने खते पोहोच करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खत आणि बियाणे पुरवठा सुरळीत व्हावा हा यामागे हेतू आहे. त्यासाठी गावांतील शेतकऱ्यांच्या गटांनी खते आणि बियाण्यांची नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना खत बांध, गावांत उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत किंवा शहरात ये-जा करावी लागत नाही. अनावश्यक गर्दी होत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वैयक्तिक खर्चही वाचेल, अशी कारणेही या पाठीमागे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शहरापर्यंत ये-जा करावी लागणार नाही व वेळही वाचणार आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यात बांध व गावांत खते पोहोच केली जात आहेत. कारण, पश्चिमेकडे पाऊस लवकर होत असल्याने शेतकऱ्यांची खत मागणी आहे. लवकरच मागणीप्रमाणे इतर तालुक्यातही खते पोहोच केली जाणार आहेत.

कोट :

जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी खते आणि बियाणांचे नियोजन कृषी विभागाने पूर्णपणे केले आहे. पावसाळा जवळ आला असून, शेतकरी गटाने मागणी केल्यानंतर बांध आणि गावांत खते देण्यात येत आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नियोजन झालेले आहे.

- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा

फोटो दि.२०सातारा अ‍ॅग्री फोटो...

फोटो ओळ : सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बांधावर तसेच गावांत खत पोहोच करण्यात येऊ लागले आहे.

....................................................