शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर खत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नावीण्यपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील बळीराजाला यावर्षीच्या खरीप हंगामातही बांधावरच खते पुरविण्यात येणार ...

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नावीण्यपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील बळीराजाला यावर्षीच्या खरीप हंगामातही बांधावरच खते पुरविण्यात येणार आहेत. याची सुरुवातही जिल्ह्यातील काही तालुक्यांत झाली आहे. यासाठी शेतकरी गटांना मागणी करून नोंदणी करावी लागत आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम घेण्यात येतो. सर्व ११ तालुक्यांत मिळून सर्वसाधरणपणे खरिपाचे क्षेत्र हे साडेतीन लाख हेक्टरहून अधिक असते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन घेण्यात येते. याचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टरवर असते. याच्या खालोखाल भाताचे अंदाजे ५० हजार, बाजरी ५० हजारांवर आणि भुईमुगाचे ४० हजार हेक्टरच्या आसपास असते. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर कृषी विभागाने खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. काही प्रमाणात खत आणि बियाणेही उपलब्ध झालेले आहे. मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे.

कृषी विभागाचे खत आणि बियाणांचे नियोजन झाले आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना बांधावर खते देण्यात आली होती. आताही त्याचपद्धतीने खते पोहोच करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खत आणि बियाणे पुरवठा सुरळीत व्हावा हा यामागे हेतू आहे. त्यासाठी गावांतील शेतकऱ्यांच्या गटांनी खते आणि बियाण्यांची नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना खत बांध, गावांत उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत किंवा शहरात ये-जा करावी लागत नाही. अनावश्यक गर्दी होत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वैयक्तिक खर्चही वाचेल, अशी कारणेही या पाठीमागे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शहरापर्यंत ये-जा करावी लागणार नाही व वेळही वाचणार आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यात बांध व गावांत खते पोहोच केली जात आहेत. कारण, पश्चिमेकडे पाऊस लवकर होत असल्याने शेतकऱ्यांची खत मागणी आहे. लवकरच मागणीप्रमाणे इतर तालुक्यातही खते पोहोच केली जाणार आहेत.

कोट :

जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी खते आणि बियाणांचे नियोजन कृषी विभागाने पूर्णपणे केले आहे. पावसाळा जवळ आला असून, शेतकरी गटाने मागणी केल्यानंतर बांध आणि गावांत खते देण्यात येत आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नियोजन झालेले आहे.

- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा

फोटो दि.२०सातारा अ‍ॅग्री फोटो...

फोटो ओळ : सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बांधावर तसेच गावांत खत पोहोच करण्यात येऊ लागले आहे.

....................................................