शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गावातून निघेना विस्थापितांचा पाय!

By admin | Updated: February 13, 2015 22:56 IST

वांग-मराठवाडीचा प्रश्न : जमिनी, प्लॉट पसंत नसल्याने स्थलांतरास विरोध, उमरकांचनसह चार गावांचे वास्तव्य बाधित क्षेत्रात

बाळासाहेब रोडे- सणबूर -वांग-मराठवाडी धरणाच्या कामास १३ नोव्हेंबर १९९६ मध्ये युती शासनाच्या काळात मान्यता मिळवून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली. २.९८ टीएमसी क्षमतेच्या या धरणाच्या बांधकाम व पुनर्वसनासाठी अंदाजे ८१.४७ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. या धरणामध्ये रेठरेकरवाडी, उमरकांचन, मेंढ, घोटील ही गावे पूर्णपणे बाधित झाली असून, मराठवाडी, जाधववाडी, जिंती, निगडे, कसणी ही अंशता बाधित गावे आहेत. बाधित गावांचे अन्यत्र पुनर्वसनही करण्यात आले आहे. मात्र, काही गावे पुनर्वसनानंतरही आहे त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील ४६ गावांत या वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे सुरुवातीला ठरले होते. मात्र, या दोन तालुक्यांत पुनर्वसनासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नसल्याने त्यांचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यात करण्याचे ठरले. त्याबाबतची कार्यवाहीसुद्धा झाली. या धरणामुळे ४६ गावांतील एकूण ८ हजार ५४७ हेक्टरक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. रेठरेकरवाडी गावाचे सुरुवातीला सांगली जिल्ह्यातील शाळगाव, मेंढचे शिवाजीनगर- तोडोली आणि कळंबी, घोटील, कोतीज, उमरकांचन, नेवरी कार्वे, माहुली, आळसंद या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले असून, घोटीतील उर्वरित कुटुंबांचे पुनर्वसन तळमावले, ताईगडेवाडी. मराठवाडीचे पुनर्वसन कोळे, जाधववाडी, घारेवाडी येथे करण्यात आले आहे.या धरणामुळे १ हजार ८५४ कुटुंबांचे पुनर्वसन सातारा व सांगली जिल्ह्यांत करण्यात आले आहे. त्यातील निगडे, जिंती, कसणी या गावातील ३५९ कुटुंबे अंशत: बाधित असल्याने त्यांचे पुनर्वसन धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणार आहे. धरणक्षेत्रातील संपादित जमिनीतील माती अथवा मुरूम धरणग्रस्तांनी धरणासाठी न दिल्यामुळे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या बाहेर जाऊन संबंधित धरणाच्या ठेकेदारांने माती व मुरूम आणून प्रथम टप्प्याची घळभरणीचे काम पूर्ण केले. त्यामुळे २०११ ते २०१४ पर्यंत गेली तीन वर्षे धरणात साठवलेल्या पाण्यामुळे पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील लाभक्षेत्रातील जमिनीला, जनावरांना व पिण्याच्या पाण्याचा एप्रिल ते जूनपर्यंतचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सुटलेला आहे. सध्या धरणाचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र पुनर्वसनानंतर बाधित क्षेत्रातील काही गावे पूर्वीच्या ठिकाणीच आहेत. जेवढे धरणाचे काम तेवढ्याच वेगात पुनर्वसन झाले पाहिजे, हा मूळ हेतू होता. आतापर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्या आम्ही लढे उभारून मान्य करून घेतल्या. परंतु धरणग्रस्तांना ज्या ठिकाणी जमिनी मिळाल्या आहेत, तेथे प्रत्यक्षात पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांबरोबर लढा उभा करणार आहे. - जगन्नाथ विभूते, राज्य सदस्य, श्रमिक मुक्ती दल धरणासाठी अनेक गावांची जमीनधरणामध्ये मराठवाडी गावचे ४० हेक्टर क्षेत्र, जाधववाडी ३२ हेक्टर, रेठरेकरवाडी ४४ हेक्टर, घोटील ७९ हेक्टर, उमरकांचन १६२ हेक्टर, मेंढ ११८ हेक्टर, कसणी ३ हेक्टर, जिंती २५ हेक्टर, निगडे ९ हेक्टर क्षेत्र गेले आहे.१ हजार ८५४ पैकी ३५१ खातेदारांचे पुनर्वसन धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर होणार आहे. १ हजार ५०३ खातेदारांपैकी ६२ कुटुंबीयांनी पुनर्वसनाऐवजी रोख रकमेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, तो अद्याप प्रलंबित आहे. उर्वरित १ हजार ४४१ खातेदारांचे सांगली जिल्ह्यात व कऱ्हाड, पाटण तालुक्यांत पुनर्वसन करण्यात आले आहे. त्या धरणग्रस्तांना त्याठिकाणी जमीन, भूखंड उपलब्ध आहेत. त्याच्या वाटपाची प्रक्रिया चालू आहे. तसेच अंशत: बाधित गावातील खातेदारांना हातनोळी व बामणी गावातील लाभक्षेत्रात गावठाणे उपलब्ध आहेत. चार वर्षांपासून धरणाचे काम बंदधरणाचे काम १९९६ ते २००१ पर्यंत गतीने सुरू होते. त्यावेळी धरणाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत होता. मात्र, २००२ सालानंतर निधी उपलब्ध होत नसल्याने धरणाचे काम बंद पडले. त्यानंतर राज्यपालांच्या आदेशाने दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या दृष्टीने खासबाब म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळाला. त्यामुळे कृष्णा खोरेचे प्रकल्प पुन्हा सुरू झाले. २००८ साली प्रकल्पाचे काम सुरू झाले ते कसेबसे दोन वर्षे अत्यंत धिम्या गतीने चालले. नंतर पुन्हा २०१० मध्ये पुन्हा निधीअभावी काम बंद पडले. तेव्हापासून आजअखेर धरणाचे काम बंद आहे.