शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

गावातून निघेना विस्थापितांचा पाय!

By admin | Updated: February 13, 2015 22:56 IST

वांग-मराठवाडीचा प्रश्न : जमिनी, प्लॉट पसंत नसल्याने स्थलांतरास विरोध, उमरकांचनसह चार गावांचे वास्तव्य बाधित क्षेत्रात

बाळासाहेब रोडे- सणबूर -वांग-मराठवाडी धरणाच्या कामास १३ नोव्हेंबर १९९६ मध्ये युती शासनाच्या काळात मान्यता मिळवून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली. २.९८ टीएमसी क्षमतेच्या या धरणाच्या बांधकाम व पुनर्वसनासाठी अंदाजे ८१.४७ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. या धरणामध्ये रेठरेकरवाडी, उमरकांचन, मेंढ, घोटील ही गावे पूर्णपणे बाधित झाली असून, मराठवाडी, जाधववाडी, जिंती, निगडे, कसणी ही अंशता बाधित गावे आहेत. बाधित गावांचे अन्यत्र पुनर्वसनही करण्यात आले आहे. मात्र, काही गावे पुनर्वसनानंतरही आहे त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील ४६ गावांत या वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे सुरुवातीला ठरले होते. मात्र, या दोन तालुक्यांत पुनर्वसनासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नसल्याने त्यांचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यात करण्याचे ठरले. त्याबाबतची कार्यवाहीसुद्धा झाली. या धरणामुळे ४६ गावांतील एकूण ८ हजार ५४७ हेक्टरक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. रेठरेकरवाडी गावाचे सुरुवातीला सांगली जिल्ह्यातील शाळगाव, मेंढचे शिवाजीनगर- तोडोली आणि कळंबी, घोटील, कोतीज, उमरकांचन, नेवरी कार्वे, माहुली, आळसंद या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले असून, घोटीतील उर्वरित कुटुंबांचे पुनर्वसन तळमावले, ताईगडेवाडी. मराठवाडीचे पुनर्वसन कोळे, जाधववाडी, घारेवाडी येथे करण्यात आले आहे.या धरणामुळे १ हजार ८५४ कुटुंबांचे पुनर्वसन सातारा व सांगली जिल्ह्यांत करण्यात आले आहे. त्यातील निगडे, जिंती, कसणी या गावातील ३५९ कुटुंबे अंशत: बाधित असल्याने त्यांचे पुनर्वसन धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणार आहे. धरणक्षेत्रातील संपादित जमिनीतील माती अथवा मुरूम धरणग्रस्तांनी धरणासाठी न दिल्यामुळे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या बाहेर जाऊन संबंधित धरणाच्या ठेकेदारांने माती व मुरूम आणून प्रथम टप्प्याची घळभरणीचे काम पूर्ण केले. त्यामुळे २०११ ते २०१४ पर्यंत गेली तीन वर्षे धरणात साठवलेल्या पाण्यामुळे पाटण व कऱ्हाड तालुक्यांतील लाभक्षेत्रातील जमिनीला, जनावरांना व पिण्याच्या पाण्याचा एप्रिल ते जूनपर्यंतचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सुटलेला आहे. सध्या धरणाचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र पुनर्वसनानंतर बाधित क्षेत्रातील काही गावे पूर्वीच्या ठिकाणीच आहेत. जेवढे धरणाचे काम तेवढ्याच वेगात पुनर्वसन झाले पाहिजे, हा मूळ हेतू होता. आतापर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्या आम्ही लढे उभारून मान्य करून घेतल्या. परंतु धरणग्रस्तांना ज्या ठिकाणी जमिनी मिळाल्या आहेत, तेथे प्रत्यक्षात पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांबरोबर लढा उभा करणार आहे. - जगन्नाथ विभूते, राज्य सदस्य, श्रमिक मुक्ती दल धरणासाठी अनेक गावांची जमीनधरणामध्ये मराठवाडी गावचे ४० हेक्टर क्षेत्र, जाधववाडी ३२ हेक्टर, रेठरेकरवाडी ४४ हेक्टर, घोटील ७९ हेक्टर, उमरकांचन १६२ हेक्टर, मेंढ ११८ हेक्टर, कसणी ३ हेक्टर, जिंती २५ हेक्टर, निगडे ९ हेक्टर क्षेत्र गेले आहे.१ हजार ८५४ पैकी ३५१ खातेदारांचे पुनर्वसन धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर होणार आहे. १ हजार ५०३ खातेदारांपैकी ६२ कुटुंबीयांनी पुनर्वसनाऐवजी रोख रकमेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, तो अद्याप प्रलंबित आहे. उर्वरित १ हजार ४४१ खातेदारांचे सांगली जिल्ह्यात व कऱ्हाड, पाटण तालुक्यांत पुनर्वसन करण्यात आले आहे. त्या धरणग्रस्तांना त्याठिकाणी जमीन, भूखंड उपलब्ध आहेत. त्याच्या वाटपाची प्रक्रिया चालू आहे. तसेच अंशत: बाधित गावातील खातेदारांना हातनोळी व बामणी गावातील लाभक्षेत्रात गावठाणे उपलब्ध आहेत. चार वर्षांपासून धरणाचे काम बंदधरणाचे काम १९९६ ते २००१ पर्यंत गतीने सुरू होते. त्यावेळी धरणाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत होता. मात्र, २००२ सालानंतर निधी उपलब्ध होत नसल्याने धरणाचे काम बंद पडले. त्यानंतर राज्यपालांच्या आदेशाने दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या दृष्टीने खासबाब म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळाला. त्यामुळे कृष्णा खोरेचे प्रकल्प पुन्हा सुरू झाले. २००८ साली प्रकल्पाचे काम सुरू झाले ते कसेबसे दोन वर्षे अत्यंत धिम्या गतीने चालले. नंतर पुन्हा २०१० मध्ये पुन्हा निधीअभावी काम बंद पडले. तेव्हापासून आजअखेर धरणाचे काम बंद आहे.