शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड पालिकेची वृक्षगणना कागदावरच!

By admin | Updated: May 18, 2016 00:08 IST

चार वर्षांपासून नोंदच नाही : वृक्षसंवर्धन प्राधिकरण समितीच्या नुसत्या बैठकाच; शहरातील वृक्षतोडीला पर्यावरण संघटनांचा विरोध

कऱ्हाड : शहरातील वृक्षांची गणना पालिकेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नाही. वृक्षसंवर्धन प्राधिकरण समितीच्या नुसत्या बैठकाच घेण्याचे काम केले जात आहे. वृक्षगणना फक्त कागदावरच केली जात असल्याने वृक्ष संवर्धनाकडे पालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. दुसरीकडे रस्ता रुंदीकरणामध्ये २५० वृक्षांची तोड करण्यात येणार असल्याने यास पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.पालिकेकडून शहरातील वृक्षांची गणना केली जात नसल्याचे पाहता व शहरात नक्की किती व कोणत्या जातीची वृक्षे आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी २०११-१२ मध्ये एन्व्हायरो नेचर फे्रंडस क्लबच्या वतीने वृक्षगणना करण्यात आली. त्यावेळी शहरात २१ हजार २७६ झाडे असल्याचा अहवाल क्लबच्या वतीने तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतर आजतागायत पालिकेकडून शहरातील वृक्षगणनेबाबत विचार करण्यात आला नाही. पाच वर्षांपूर्वी एन्व्हायरो नेचर फे्रंडस क्लबच्या वतीने वृक्षगणना करण्यात आली. त्या अहवालात शहरात महत्त्वाच्या दुर्मीळ व औषधी जातीची वृक्षे आढळली असल्याची माहिती क्लबच्या वतीने देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पालिकेकडून वृक्षांची निगा राखण्याबाबत कोणतेच लक्ष देण्यात आले नाही.पाच वर्षांनंतर मध्यंतरी वसुंधरा दिनादिवशी पालिकेच्या वतीने कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या रुंदीकरणात येणारी सुमारे २५० वृक्षांचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत वृक्ष संवर्धन प्राधिकरण समितीच्या वतीने महत्त्वाचे निर्णय ही घेण्यात येणार होते. मात्र, यास एक महिना उलटून गेला असला तरी कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही. किंवा वृक्षगणना व सर्व्हे केलेला नाही. सध्या कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल या मार्गावर रस्ता रुंदीकरण केले जाणार असून, रस्त्यामध्ये येणाऱ्या २५० वृक्षांवर पालिका कुऱ्हाड पडणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने शहरातील दत्तचौक ते कृष्णानाका दरम्यानच्या रस्त्याची मोजणी देखील करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शहरात वृक्षसंवर्धन करण्यासाठी पालिकेकडून कोणतेचे उपक्रम राबवले गेलेले नाही. याउलट अनेक ठिकाणी वृक्षतोडीच केल्या असल्याचे पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तर वृक्षारोपणासाठी एकाही लोकप्रतिनिधीकडून पुढाकार घेतला जात नसल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.शहरात अगोदरच वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत चालली असल्याने दुर्मीळ व औषधी वनस्पती लोप पावत चालल्या आहेत. अशा वृक्षांचे जतन करणे, त्यांची लागवड करण्याऐवजी त्याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. वृक्षसंवर्धनाबाबत पालिकेने ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)एन्व्हायरो नेचर क्लबकडून वृक्षगणनाएन्व्हायरो फे्रंडस नेचर क्लब या संस्थेच्या वतीने २०११-१२ रोजी शहरात वृक्षगणना करण्यात आली होती. त्यावेळी शहरात २१ हजार २७६ वृक्ष असल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट केले होते. पालिकेकडूनही त्यावेळी वृक्षगणना करण्यात आली होती. मात्र, चुकीच्या पद्धतीने पालिकेने वृक्षगणना केली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आजतागायत पालिकेकडून शहरात वृक्षगणना करण्यात आलेली नाही. ५दर दहा वर्षांतून एकदा वृक्षगणना करावी असा नियम आहे. मात्र, शहरातील वृक्षांची संख्या पाहता ती पाच वर्षांतून एकदा केली जावी. संबंधित वृक्षगणना करणाऱ्या ठेकेदाराने वृक्षसंगोपण हे आपल्या मुलांसारखे करावे. जेणेकरून वृक्षांची वाढ योग्य प्रकारे होईल.- प्रकाश खोचीकर, उपाध्यक्ष, एन्व्हायरो नेचर फे्रन्डस क्लब, कऱ्हाड