शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

कऱ्हाड पालिकेची वृक्षगणना कागदावरच!

By admin | Updated: May 18, 2016 00:08 IST

चार वर्षांपासून नोंदच नाही : वृक्षसंवर्धन प्राधिकरण समितीच्या नुसत्या बैठकाच; शहरातील वृक्षतोडीला पर्यावरण संघटनांचा विरोध

कऱ्हाड : शहरातील वृक्षांची गणना पालिकेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नाही. वृक्षसंवर्धन प्राधिकरण समितीच्या नुसत्या बैठकाच घेण्याचे काम केले जात आहे. वृक्षगणना फक्त कागदावरच केली जात असल्याने वृक्ष संवर्धनाकडे पालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. दुसरीकडे रस्ता रुंदीकरणामध्ये २५० वृक्षांची तोड करण्यात येणार असल्याने यास पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.पालिकेकडून शहरातील वृक्षांची गणना केली जात नसल्याचे पाहता व शहरात नक्की किती व कोणत्या जातीची वृक्षे आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी २०११-१२ मध्ये एन्व्हायरो नेचर फे्रंडस क्लबच्या वतीने वृक्षगणना करण्यात आली. त्यावेळी शहरात २१ हजार २७६ झाडे असल्याचा अहवाल क्लबच्या वतीने तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतर आजतागायत पालिकेकडून शहरातील वृक्षगणनेबाबत विचार करण्यात आला नाही. पाच वर्षांपूर्वी एन्व्हायरो नेचर फे्रंडस क्लबच्या वतीने वृक्षगणना करण्यात आली. त्या अहवालात शहरात महत्त्वाच्या दुर्मीळ व औषधी जातीची वृक्षे आढळली असल्याची माहिती क्लबच्या वतीने देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पालिकेकडून वृक्षांची निगा राखण्याबाबत कोणतेच लक्ष देण्यात आले नाही.पाच वर्षांनंतर मध्यंतरी वसुंधरा दिनादिवशी पालिकेच्या वतीने कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या रुंदीकरणात येणारी सुमारे २५० वृक्षांचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत वृक्ष संवर्धन प्राधिकरण समितीच्या वतीने महत्त्वाचे निर्णय ही घेण्यात येणार होते. मात्र, यास एक महिना उलटून गेला असला तरी कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही. किंवा वृक्षगणना व सर्व्हे केलेला नाही. सध्या कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल या मार्गावर रस्ता रुंदीकरण केले जाणार असून, रस्त्यामध्ये येणाऱ्या २५० वृक्षांवर पालिका कुऱ्हाड पडणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने शहरातील दत्तचौक ते कृष्णानाका दरम्यानच्या रस्त्याची मोजणी देखील करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शहरात वृक्षसंवर्धन करण्यासाठी पालिकेकडून कोणतेचे उपक्रम राबवले गेलेले नाही. याउलट अनेक ठिकाणी वृक्षतोडीच केल्या असल्याचे पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तर वृक्षारोपणासाठी एकाही लोकप्रतिनिधीकडून पुढाकार घेतला जात नसल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.शहरात अगोदरच वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत चालली असल्याने दुर्मीळ व औषधी वनस्पती लोप पावत चालल्या आहेत. अशा वृक्षांचे जतन करणे, त्यांची लागवड करण्याऐवजी त्याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. वृक्षसंवर्धनाबाबत पालिकेने ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)एन्व्हायरो नेचर क्लबकडून वृक्षगणनाएन्व्हायरो फे्रंडस नेचर क्लब या संस्थेच्या वतीने २०११-१२ रोजी शहरात वृक्षगणना करण्यात आली होती. त्यावेळी शहरात २१ हजार २७६ वृक्ष असल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट केले होते. पालिकेकडूनही त्यावेळी वृक्षगणना करण्यात आली होती. मात्र, चुकीच्या पद्धतीने पालिकेने वृक्षगणना केली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आजतागायत पालिकेकडून शहरात वृक्षगणना करण्यात आलेली नाही. ५दर दहा वर्षांतून एकदा वृक्षगणना करावी असा नियम आहे. मात्र, शहरातील वृक्षांची संख्या पाहता ती पाच वर्षांतून एकदा केली जावी. संबंधित वृक्षगणना करणाऱ्या ठेकेदाराने वृक्षसंगोपण हे आपल्या मुलांसारखे करावे. जेणेकरून वृक्षांची वाढ योग्य प्रकारे होईल.- प्रकाश खोचीकर, उपाध्यक्ष, एन्व्हायरो नेचर फे्रन्डस क्लब, कऱ्हाड