शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

मसूर : मसूर व परिसरात खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत; मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ...

मसूर : मसूर व परिसरात खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत; मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आडसाली लागण केलेल्या उसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून आरफळ कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. पावसाच्या हुलकावणीने भातासह ऐन बहरात असलेल्या पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पावसापूर्वी खरीप हंगामातील पेरणी टोकणीसह आडसाली ऊस लागणीची कामे उरकून घेतली होती. काही अपवाद वगळता सर्व पिकांची उगवण व वाढही झपाट्याने झाली. त्यामुळे शेतकरी आनंदात होता; मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने काही प्रमाणात वाचलेली पिके पावसाअभावी वाया जाणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे. अगोदरच अतिवृष्टीने काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते आणि वादळी वाऱ्याने उसासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीनंतर चांगल्या उगवण झालेल्या पिकांच्या भांगलण, कोळपण आदी आंतरमशागतीची कामे उरकून घेतली होती. आडसाली उसाची उगवण चांगली झालेली असून खते देण्याची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली होती.

सध्या ऊस, भात, आले, हळद आधी पिकांना रोगापासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे खते व औषधे देण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, आरफळ कालव्यावर बहुतांशी बागायती शेती अवलंबून आहे. सध्या आडसाली उसासह भात आले, हळद आदी पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकरी वर्गातून आरफळ कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामात आगाप पेरणी केलेल्या नगदी सोयाबीनच्या पिकासह घेवडा, मूग, चवळी आदी पिके ऐन बहरात आहेत; मात्र पावसाने दडी मारल्याने या पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

२३मसूर

मसूर परिसरात किडीपासून बचावासाठी आले पिकावर औषध फवारणी करण्यात येत आहे. (छाया : जगन्नाथ कुंभार)