शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

मसूर : मसूर व परिसरात खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत; मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ...

मसूर : मसूर व परिसरात खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत; मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आडसाली लागण केलेल्या उसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून आरफळ कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. पावसाच्या हुलकावणीने भातासह ऐन बहरात असलेल्या पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पावसापूर्वी खरीप हंगामातील पेरणी टोकणीसह आडसाली ऊस लागणीची कामे उरकून घेतली होती. काही अपवाद वगळता सर्व पिकांची उगवण व वाढही झपाट्याने झाली. त्यामुळे शेतकरी आनंदात होता; मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने काही प्रमाणात वाचलेली पिके पावसाअभावी वाया जाणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे. अगोदरच अतिवृष्टीने काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते आणि वादळी वाऱ्याने उसासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीनंतर चांगल्या उगवण झालेल्या पिकांच्या भांगलण, कोळपण आदी आंतरमशागतीची कामे उरकून घेतली होती. आडसाली उसाची उगवण चांगली झालेली असून खते देण्याची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली होती.

सध्या ऊस, भात, आले, हळद आधी पिकांना रोगापासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे खते व औषधे देण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, आरफळ कालव्यावर बहुतांशी बागायती शेती अवलंबून आहे. सध्या आडसाली उसासह भात आले, हळद आदी पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकरी वर्गातून आरफळ कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामात आगाप पेरणी केलेल्या नगदी सोयाबीनच्या पिकासह घेवडा, मूग, चवळी आदी पिके ऐन बहरात आहेत; मात्र पावसाने दडी मारल्याने या पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

२३मसूर

मसूर परिसरात किडीपासून बचावासाठी आले पिकावर औषध फवारणी करण्यात येत आहे. (छाया : जगन्नाथ कुंभार)