शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

मसूर : मसूर व परिसरात खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत; मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ...

मसूर : मसूर व परिसरात खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत; मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आडसाली लागण केलेल्या उसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून आरफळ कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. पावसाच्या हुलकावणीने भातासह ऐन बहरात असलेल्या पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पावसापूर्वी खरीप हंगामातील पेरणी टोकणीसह आडसाली ऊस लागणीची कामे उरकून घेतली होती. काही अपवाद वगळता सर्व पिकांची उगवण व वाढही झपाट्याने झाली. त्यामुळे शेतकरी आनंदात होता; मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने काही प्रमाणात वाचलेली पिके पावसाअभावी वाया जाणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे. अगोदरच अतिवृष्टीने काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते आणि वादळी वाऱ्याने उसासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीनंतर चांगल्या उगवण झालेल्या पिकांच्या भांगलण, कोळपण आदी आंतरमशागतीची कामे उरकून घेतली होती. आडसाली उसाची उगवण चांगली झालेली असून खते देण्याची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली होती.

सध्या ऊस, भात, आले, हळद आधी पिकांना रोगापासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे खते व औषधे देण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, आरफळ कालव्यावर बहुतांशी बागायती शेती अवलंबून आहे. सध्या आडसाली उसासह भात आले, हळद आदी पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकरी वर्गातून आरफळ कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामात आगाप पेरणी केलेल्या नगदी सोयाबीनच्या पिकासह घेवडा, मूग, चवळी आदी पिके ऐन बहरात आहेत; मात्र पावसाने दडी मारल्याने या पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

२३मसूर

मसूर परिसरात किडीपासून बचावासाठी आले पिकावर औषध फवारणी करण्यात येत आहे. (छाया : जगन्नाथ कुंभार)