शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार मोटार, ताडपत्री, कडबाकुट्टी, दुधाळ जनावरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST

फोटो झेडपीचा लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणूमुळे जिल्हा परिषदेचे मूळ अंदाजपत्रक ४१ कोटींचे असलेतरी कृषी आणि पशुसंवर्धन ...

फोटो झेडपीचा

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना विषाणूमुळे जिल्हा परिषदेचे मूळ अंदाजपत्रक ४१ कोटींचे असलेतरी कृषी आणि पशुसंवर्धन विभागासाठी चांगली तरतूद असल्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांना विविध योजनांचा फायदा घेता येणार आहे. ताडपत्री, कडबाकुट्टी, विद्युत मोटार, दुधाळ जनावरे अनुदानावर मिळणार आहेत. त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. यामध्ये विविध विभागांसाठी तरतूद करण्यात येते. बुधवारी जिल्हा परिषदेचे २०२०-२१चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपेक्षा चार कोटींनी हे अंदाजपत्रक कमी आहे. कारण स्व-उत्पन्न कमी झाले आहे. मागीलवर्षी ४५, तर यावर्षी ४१ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये कृषी विभागासाठी २ कोटी २५ लाख, तर पशुसंवर्धनसाठी एक कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये विविध योजना राबविण्यात येणार आहेत. या अंदाजपत्रकानुसार नवीन कोणतीही योजना सुरू करण्यात आली नसलीतरी जुन्या योजना कायम पुढे सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना होणार आहे.

जिल्ह्यातील ७० टक्के जनता अधिक करून कृषी उत्पन्नावर आधारित आहे. यामुळे शेती हाच महत्त्वाचा व्यवसाय असल्याने यावर आधारित शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेने विविध योजना सुरू ठेवल्या आहेत. यामध्ये सवलतीच्या दरात ताडपत्री, कडबाकुटी, तसेच सुधारित संकरित बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे कोळपी, विद्युत मोटार किंवा इंजिन अनुदानावर देण्यात येणार आहे. तर सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठीही काही निश्चित धोरण ठरविण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत जनावरांसाठी औषध पुरवठा करने, विविध शिबिरे आयोजित करणे. कामधेनु योजनेअंतर्गत एक दूध किंवा संकरित देशी गाईंचे वाटप करण्यात येणार आहे. यातून संकरित, दुभती जनावरे तसेच पशुधन वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. कृषी व पशुसंवर्धनच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा हातभारच लागणार आहे. विशेष करून ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना या योजनांचा मोठा फायदा होणार आहे.

कोट :

जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकात कृषी आणि पशुसंवर्धन विभागासाठी चांगली तरतूद करण्यात आलेली आहे. नवीन योजना नसल्यातरी जुन्या योजना पुढे सुरू ठेवण्यात आल्या आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना होणार आहे. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या या योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.

- मंगेश धुमाळ, सभापती कृषी व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद

.........................................................................