शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

शेतकऱ्याच्या आंदोलनाला बैलजोडी होणार साक्षी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:24 IST

विदेशी पेटा प्राणीमित्र संघटनेने राज्य शासनाच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सोमवार, दि. १६ रोजी सातारा येथे होणाऱ्या आंदोलनास बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्धार बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी कऱ्हाड येथे केला.

ठळक मुद्देबैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्याची कऱ्हाड येथे नियोजन बैठक बैलगाडी शर्यत बचाव समितीचा निर्णयआंदोलनास राज्यभरातून बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी होणार मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्धार

कऱ्हाड , दि. १४ : विदेशी पेटा प्राणीमित्र संघटनेने राज्य शासनाच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सोमवार, दि. १६ रोजी सातारा येथे होणाऱ्या आंदोलनास बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्धार बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी कऱ्हाड येथे केला.

सातारा येथे सोमवारी (दि. १६) रोजी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाची कऱ्हाड येथे शनिवारी बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनेचे सदस्य धनाजी शिंदे, पै. आनंदराव मोहिते, उदय पाटील, नाथाजी गरुड, पोपट गायकवाड, पै. रफिक इनामदार, विवेक पाटील आदींसह कऱ्हाड तालुक्यातील बैलगाडी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी धनाजी शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतींसदर्भांत मोठे बेमुदत आंदोलन होणार आहे. यास हजारो बैलगाडी चालक-मालक आपल्या बैलांसह उपस्थित राहणार आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातारा-सांगली जिल्ह्यांसह राज्यभरातून बैलगाडी चालक-मालक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

हे आंदोलन घरचे असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे सुरूच ठेवण्यात येणार आहे. अगदी दिवाळी आंदोलनस्थळी करावी लागली तरी चालेल. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासंदर्भात पुढाकार घेतला जात आहे. मात्र, प्राणीमित्र याला विरोध करण्याचे काम करीत आहेत. तालुक्यातील दोनशेहून अधिक बैलगाड्या चालक-मालक हे आपल्या बैलांसह यामध्ये सहभागी होतील. चार वर्षे झाली शर्यतींसाठी लढत आहोत. आता कोणत्याही परिस्थिती मागे हटणार नाही. जोपर्यंत प्राणीमित्र संघटनेवर बंदी घातली जात नाही. आणि शर्यती सुरू केल्या जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे.

सातारा येथे होणाऱ्या बेमुदत आंदोलनात कऱ्हाड तालुक्यातील हजारो बैलगाडी चालक-मालक व शेतकऱ्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे आवश्यक आहे. सर्वत्र जोरदार तयारी करून मतदान केल्यानंतर लगेच या आंदोलनासाठी सातारा येथे एकत्रित यावे, असे आवाहन पै. आनंदराव मोहिते यांनी केले.

टॅग्स :Chakka jamचक्काजामFarmerशेतकरी