शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना तीन वर्षांची बिले एकाचवेळी, भरण्यास आठ दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 11:09 IST

कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना २०१४ पासूनची वीजबिले एकाचवेळी देण्यात आलेली असून, वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जात आहे. सद्य:स्थितीत शेतकरी अडचणीत असताना महावितरण कंपनी वीज जोड तोडण्याची धमकी देत आहे.

ठळक मुद्देअन्यायकारक वसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव, वीज जोड तोडण्याची धमकी वसुली न थांबविल्यास २० नोव्हेंबरपासून कामकाज ठप्प केले जाणार महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा भूमाता किसान मंचचा इशारा

कोरेगाव : कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना २०१४ पासूनची वीजबिले एकाचवेळी देण्यात आलेली असून, वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जात आहे. सद्य:स्थितीत शेतकरी अडचणीत असताना वीज जोड तोडण्याची धमकी दिली जात आहे. महावितरण कंपनीने अन्यायकारक वसुली तातडीने न थांबविल्यास दि. २० नोव्हेंबरपासून कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

भूमाता किसान मंचचे जिल्हाध्यक्ष धर्मराज जगदाळे, कार्याध्यक्ष शंकर गोळे, नगरसेवक महेश बर्गे, सुनील बर्गे, सचिन बर्गे, हणमंतराव जगदाळे, जोतिराम वाघ, सुनील वाघ, सम्राट बर्गे, अभय बर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठलराव काळे व तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार श्रीरंग मदने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना प्रशासनापुढे व्यक्त केल्या.

निवेदनात म्हटले आहे की, वीज वितरण कंपनीच्या कोरेगाव उपविभागांतर्गत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या वीज कनेक्शनची बिले २०१४ पासूनची आता देण्यात आलेली आहेत. ही बिले भरण्यास अल्प कालावधी देण्यात आलेला असून, त्याबाबत स्पष्ट शब्दात एकही अभियंता अथवा वीज वितरण कंपनीचा कर्मचारी ठोस माहिती देत नाही.

३० हजार रुपयांच्या आत वीज बिल असल्यास पाच हप्त्यांमध्ये तर ३० हजार रुपयांवर बिल असल्यास दहा हप्त्यांमध्ये भरण्यास सक्ती केली जात आहे. चालू वीज बिलांबरोबरच प्रत्येक हप्ता भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.

याबाबत कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात चौकशी केल्यावर राज्य पातळीवर कंपनीने घेतलेला निर्णय असून, आम्हाला त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत, असे सांगून शेतकऱ्यांची अक्षरश: बोळवण केली जात आहे.

गेल्या वर्षी कोरेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. धोम डाव्या कालव्यातून पाण्याची व्यवस्थित आवर्तने न आल्याने उसाबरोबरच अन्य पिके जळून गेली. शेतकरी संघटनांच्या आंदोलनांमुळे वेळेवर उसाची तोड झाली नाही आणि कारखान्यांकडून वेळेत पेमेंट आलेली नाहीत.

शासनाने कर्जमाफीबाबत केवळ घोषणा केली असून, आॅनलाईन अर्ज भरून घेण्यापलीकडे काही एक केले नाही. त्याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहे. यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, सोयाबीनसह घेवडा ही नगदी पिके हातची गेली आहेत.

शासनाने हमी भाव जाहीर करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण केली असून, शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

कोरेगाव परिसरातील सक्तीने सुरू असलेली वीज बिल वसुली थांबवावी, अभियंत्यांना लेखी स्वरुपात सूचना द्याव्यात अन्यथा आम्ही दि. २० नोव्हेंबर २०१७ पासून कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार असून, जोपर्यंत आमची वसुली थांबवली जात नाही तोपर्यंत या कार्यालयांमधील कामकाज ठप्प केले जाणार आहे. कंपनीच्या कामकाजाच्या पद्धतीत बदल न झाल्यास अन्य मार्गाने तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी समाधान तुपे, उमेश जगदाळे, जयवंत पवार, अरुण पवार, गोरख जगदाळे, बापूसाहेब जाधव, विशाल चव्हाण, प्रमोद बर्गे, बाळकृष्ण बर्गे, सागर जगदाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी